शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
4
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
5
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
6
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
7
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
8
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
9
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
10
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
11
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
12
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
13
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
14
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
15
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
16
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
17
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
18
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
19
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
20
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

गरज आहे ती पक्षभेद विसरून अर्थव्यवस्थेला गती देण्याची

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2019 00:28 IST

भारतीय अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरची होण्याची स्वप्ने बघत असताना अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर कायम राखणेही आपल्याला जड जात असल्याची वस्तुस्थिती आपले डोळे उघडणारी आहे.

- प्रसाद जोशी (वरिष्ठ उपसंपादक)भारतीय रिझर्व्ह बॅँकेने आपल्या पतधोरणामध्ये सर्वच दर कायम राखून भारतीय अर्थव्यवस्थेच्या प्रकृतीबद्दल अप्रत्यक्षपणे चिंता व्यक्त केली आहे. याचबरोबर अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर केवळ ५ टक्के राहण्याचा व्यक्त केलेला अंदाज, त्याचप्रमाणे कांद्याच्या वाढत्या दरामुळे चलनवाढीचा दर वाढू शकण्याची व्यक्त केलेली भीती चिंता वाढविणारी आहे. भारतीय अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरची होण्याची स्वप्ने बघत असताना अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर कायम राखणेही आपल्याला जड जात असल्याची वस्तुस्थिती आपले डोळे उघडणारी आहे.भारतीय अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीमध्ये ४.५ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. यापाठोपाठ भारतीय रिझर्व्ह बॅँकेने देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकासदर ५ टक्के राहण्याचा सुधारित अंदाज व्यक्त केला आहे. याआधी हा अंदाज ६.१ टक्के होता. याचाच अर्थ देशामध्ये आर्थिक स्थिती गंभीर होत असल्याचे रिझर्व्ह बॅँक मान्य करते आहे; मात्र त्यावर काय उपाययोजना करावयाची याबाबत मात्र त्यांनी फारसे सुचविलेले नाही.देशभरामध्ये वाढलेल्या कांद्याच्या दरांमुळे घाऊक मूल्य निर्देशांकावर आधारित चलनवाढीच्या दरामध्ये वाढ होण्याची भीती आहे. कांद्याबाबतही केंद्र सरकारने एक निश्चित धोरण ठरविणे गरजेचे आहे. चलनवाढ झाल्यास पायाभूत सुविधांसाठी निधी कमी पडतो आणि अर्थव्यवस्थेचा विकास दर मंदावतो. त्यामुळे रिझर्व्ह बॅँकेने विकास दर कमी होण्याची व्यक्त केलेली भीती योग्य आहे.पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील रालोआचे सरकार केंद्रामध्ये अधिकारारूढ झाल्यानंतर सुरुवातीला काही काळ अर्थव्यवस्था ही वेगाने वाटचाल करीत होती; मात्र रघुराम राजन यांनी रिझर्व्ह बॅँकेच्या गव्हर्नरपदाचा राजीनामा दिल्यापासून अर्थव्यवस्थेच्या गाडीचा वेग मंदावलेला आहे. खरे तर यावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज असतानाही सरकारने तात्पुरत्या उपायांनी अर्थव्यवस्थेला ठिगळ लावून दरवर्षाच्या अंदाजपत्रकातील वित्तीय तूट कायम राखण्यात धन्यता मानली. या तात्पुरत्या उपायांनी कागदोपत्री अर्थव्यवस्था बरी वाटत असली तरी ती पोखरली जात होती, हे आता आकडेवारीवरूनही स्पष्ट झाले आहे.रिझर्व्ह बॅँक ही स्वायत्त संस्था असून, देशाच्या आणि अर्थव्यवस्थेच्या हितासाठी तिने कठोर वाटले तरी योग्य निर्णय घेणे गरजेचे असते. नव्हे हे या संस्थेचे कर्तव्यच आहे. रिझर्व्ह बॅँकेच्या पदाधिकाऱ्यांना निवडणुकांना सामोरे जायचे नसल्याने त्यांच्याकडून लोकानुनयी निर्णय होणे अपेक्षित नाही; मात्र सत्ताधाºयांच्या मर्जीप्रमाणे, त्यांना पाहिजे तसे निर्णय घेण्याचा दबाव त्यांच्यावर टाकला जातो आणि येस सर करण्याच्या प्रवृत्तीची माणसे त्याला बळी पडतात, हे रिझर्व्ह बॅँकेचा संचित निधी सरकारला हस्तांतरित करण्याच्या प्रकारात स्पष्टच झाले आहे.भारताची निर्यात दिवसेंदिवस कमी होत असून, आयातीवरील खर्च वाढताना दिसत आहे. आंतरराष्टÑीय बाजारामध्ये होणारी खनिज तेलाची दरवाढ ही आपल्या हाती नसली तरी त्याची आयात कमी करणे आपल्याला शक्य आहे. देशाच्या शासन आणि प्रशासकीय यंत्रणेवर होणारा वारेमाप खर्च कमी करून त्यामधून वाचलेला पैसा हा आपल्याला मूलभूत सोयी-सुविधांसाठी वापरता येऊ शकतो. पंतप्रधान आणि त्यांचे मंत्री यांच्या वारेमाप परदेश दौºयांवरही काही अंकुश असण्याची गरज निर्माण झाली आहे. संसदेमध्ये प्रचंड बहुमत पाठीशी असल्याने सत्ताधारी आज कोणाचे ऐकण्याच्या मन:स्थितीत दिसत नाहीत. ही वृत्ती बदलून देशाच्या हितासाठी सर्वांनी एकत्र येण्याची खरी गरज आहे.सन २००८ मध्ये अमेरिकेसारख्या जगातील अव्वल क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेलाही मंदीचा त्रास झाला; मात्र डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारने भारताला त्यापासून वाचविलेले दिसून आले. अमेरिकेच्या तत्कालीन राष्टÑाध्यक्षांनी भारताचे त्या वेळचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा सल्ला घेऊन आपल्या धोरणांमध्ये काही बदल केले. डॉ. मनमोहन सिंग हे आजच्या परिस्थितीमधून भारतीय अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्यासाठी काही उपाय निश्चितच सुचवू शकतात; मात्र त्यासाठी गरज आहे ती सरकारने त्यांचा सल्ला मागण्याची आणि मानण्याची. केंद्र सरकारने डॉ. सिंग त्याचप्रमाणे विरोधी पक्षातील अन्य जाणकार नेत्यांची मदत घ्यायला हवी. देशाची अर्थव्यवस्था वाचविण्यासाठी सर्व पक्षांनीही एकत्रित प्रयत्न करणे तितकेच गरजेचे आहे.

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक