शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

आंबेडकर-गांधी विचारांच्या समन्वयाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 06:02 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर व म. गांधी हे लोकोत्तर नेते होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर व म. गांधी हे लोकोत्तर नेते होते. दोघांचाही लोकशाहीवर विश्वास होता. दोघांचाही रक्तपातास विरोध होता. म. गांधींनी सत्य आणि अहिंसा या तत्त्वांचा अंगीकार केला, तर बाबासाहेबांनी समता, स्वातंत्र्य, बंधुभाव या तत्त्वत्रयींचा पुरस्कार केला. दोघांनीही राजकीय स्वातंत्र्य आणि सामाजिक न्यायासाठी सत्याग्रही मार्गांचा अवलंब केला. महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या वेळी उभारण्यात आलेल्या मंडपात गांधीजींचा फोटो होता.

डॉ. बाबासाहेब व म. गांधी या दोघांनीही अस्पृश्यता निर्मूलनाच्या चळवळी केल्या. अर्थात, दोघांच्या मार्गात भिन्नता होती. बाबासाहेब हे कठोर बुद्धिवादी, तर म. गांधी हे श्रद्धावादी होते. बाबासाहेबांचा धर्म नीतिमत्तेचा आणि समतेचा पुरस्कार करणारा होता, तर म. गांधींचा धर्म आध्यात्मिक आणि परंपरावादी होता. बाबासाहेबांचा दलितांकडे पाहण्याचा दृष्टिकोन जळजळीत अनुभूतीचा होता, तर म. गांधींचा सहानुभूतीचा. सहानुभूती कितीही उत्कट असली तरी ती अनुभूतीची जागा घेऊ शकत नाही, असे बाबासाहेबांचे मत होते. म. गांधी म्हणत, ‘मला पुनर्जन्म नकोय; पण तो यायचाच असेल तर अस्पृश्य जातीत यावा, म्हणजे मला त्यांच्या व्यथा-वेदनांचा अनुभव घेता येईल.’

अस्पृश्यता निवारणासाठी हिंदू समाजाचे मतपरिवर्तन व्हायला हवे, असे म. गांधींना वाटे, तर बाबासाहेबांची वृत्ती मुळावर घाव घालणारी होती. अस्पृश्यांची मुक्ती पारंपरिक ग्रामव्यवस्थेत होऊ शकत नाही, म्हणून खेडी नष्ट करा, असे बाबासाहेब सांगत, तर गाव हाच भारतीय समाजव्यवस्थेचा कणा आहे, म्हणून गांधी ग्रामस्वराज्याची भाषा करीत. गांधींचा राष्ट्रवाद राजकीय स्वातंत्र्याला प्राधान्य देणारा होता, तर बाबासाहेबांचा राष्ट्रवाद राजकीय स्वातंत्र्याबरोबरच स्वातंत्र्य, समता, बंधुभाव या तत्त्वत्रयींवर आधारित होता. धर्मांतरामुळे काहीच साध्य होणार नाही, असे गांधी सांगत; पण धर्मांतराने दलितांना स्वतंत्र ओळख दिली.

हिंदू समाजात फूट पडेल या सबबीखाली म. गांधींचा अस्पृश्यांच्या स्वतंत्र मतदारासंघास विरोध होता. बाबासाहेबांचा मात्र काही काळ विभक्त आणि नंतर अस्पृश्यांच्या संमतीने संयुक्त मतदारसंघ ठेवण्यातच अस्पृश्यांचे हित आहे, असा दावा होता. अस्पृश्यांचे आपणच एकमेव पुढारी आहोत, असा दावा करणाऱ्या म. गांधींनी १९३१ साली म्हटले होते, ‘आंबेडकरांना माझ्या तोंडावर थुंकण्याचा अधिकार आहे, ते आपले डोके फोडत नाहीत, हा त्यांचा संयम आहे.’

मुस्लिमांसाठी पाकिस्तानची निर्मिती झाली याच न्यायाने हिंदूंची बहुसंख्या लक्षात घेऊन भारत हे हिंदुराष्ट्र घोषित करण्याचा मोह आपल्या घटनाकारांनी जाणीवपूर्वक नाकारला. घटनाकारांनी देशाचे बहुवांशिक, बहुधर्मीय, बहुसांस्कृतिक, बहुभाषिक वैशिष्ट्य जपले. म. गांधींचाही धर्माधिष्ठित राष्टÑास विरोध होता; पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर व म. गांधी यांचे धर्मनिरपेक्ष लोकशाही राष्टÑ उभारण्याचे स्वप्नच हिंदुराष्टÑवाद्यांमुळे धूसर झाले आहे. तात्पर्य, सर्व प्रकारचा मूलतत्त्ववाद नि सर्व प्रकारच्या धर्मांधतेविरुद्ध लढताना बाबासाहेबांचा धर्मनिरपेक्ष लढाऊ बाणा आणि म. गांधींच्या अहिंसा, सत्याग्रही मार्गाचाच आपणाला अवलंब करावा लागेल, हे उघड आहे.बी.व्ही. जोंधळे । दलित चळवळीचे अभ्यासक