शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

...राष्ट्रवादीचा जीवही लहान म्हणावा असाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 03:11 IST

मोदी सरकारच्या लोकविरोधी धोरणांविरुद्ध लढायला सज्ज व्हा, हा शरद पवारांनी त्यांच्या राष्ट्रवादी सेनेला दिलेला आदेश महत्त्वाचा असला तरी त्या सेनेत कितीसे बळ उरले आहे

मोदी सरकारच्या लोकविरोधी धोरणांविरुद्ध लढायला सज्ज व्हा, हा शरद पवारांनी त्यांच्या राष्ट्रवादी सेनेला दिलेला आदेश महत्त्वाचा असला तरी त्या सेनेत कितीसे बळ उरले आहे याचा अदमास त्यांनी घेतलेला दिसत नाही. निवडणुका जवळ आल्याची व लोकसभेसोबत विधानसभेच्याही निवडणुका होणार असल्याची शक्यता पवारांना दिसते. त्यासाठी पक्ष उभा करणे त्यांना गरजेचे वाटते. गेल्या काही वर्षातील पावसाने त्यांच्या पक्षात फार मोठी पडझड केली आहे. भुजबळ हे त्याचे एकेकाळचे उपमुख्यमंत्री सध्या तुरुंगात राहतात. त्यांच्या सुटकेच्या शक्यताही संपल्यागत आहेत.

अजित पवार आणि तटकरे यांच्या डोक्यांवर ईडीच्या तलवारी लटकलेल्या आहेत. सुप्रिया सुळ्यांना त्यांचा प्रभाव वाढवणे जमत नाही आणि प्रफुल्ल पटेलांची निष्ठा तूर्तास वादातीत दिसत असली तरी त्यांचा मोदींकडे असलेला ओढाही लपून राहिलेला नाही. पक्षाचे कार्यकर्ते व मतदार यांच्यात खुद्द पवारांविषयीच संशय आहे. ते काँग्रेसच्या आघाडीसोबत असतील की भाजपच्या आघाडीसोबत जातील याची स्पष्टता त्यांच्या चाहत्यांच्याही मनात नाही. मनात संशय, नेतृत्वाविषयी अविश्वास आणि धोरणशून्यता ही स्थिती पक्षाला बळ कशी देणार आणि त्याला लढायला सज्ज तरी कसे करणार? उद्याची लढत काँग्रेसशी की भाजपशी हेच जर ठाऊक नसेल तर सामान्य कार्यकर्त्याने अखेरची आज्ञा येतपर्यंत वाट पहायची असते काय? पवारांनी फिरून काँग्रेससोबत जावे व त्या पक्षात राहून राज्य व पक्ष यांच्या नेतृत्वात सहभागी व्हावे असे त्यांचेच अनेक जुने व ज्येष्ठ सहकारी आता खासगीत बोलतात.

पवारांची आजवरची प्रवृत्ती पाहिली तर ते भाजप वा संघ यांच्यासोबत मनाने व विचाराने कधी जाणार नाहीत असे वाटते. पण राजकारणात विचार नसेल आणि ते नुसतेच लाभाचे क्षेत्र झाले असेल तर या गोष्टींना फारसे महत्त्व उरत नाही. पवारांना स्वत:चे मोल कळते. आताच्या भाजपला त्यांची गरज नाही हे त्यांना समजते. त्या पक्षासोबत जाऊन कुठली तरी ‘तीन हजारी मनसबदारी’ घेण्यापेक्षा अडचणीत असलेल्या व उभारी धरत असलेल्या काँग्रेससोबत राहणे अधिक श्रेयस्कर आहे हे त्यांना दुसºया कोणी सांगण्याचे कारण नाही. तसे ते एकेकाळी राजीव गांधींसोबत गेलेही आहेत. आताची निवड समोर आहे आणि त्यांच्यापुढची वेळेची निकडही मोठी आहे. निवडणुकांना दीड वर्ष राहिले आहे. त्यात नवी उभारणी करायची, पक्ष सावरायचा, नवी माणसे व संघटना जोडायच्या तर त्यासाठी वेळ द्यावा लागणार आहे. एक गोष्ट स्पष्ट आहे, त्यांचा पक्ष स्वबळावर देशात सोडा, महाराष्ट्रातही कधी सत्तेवर येणार नाही. त्यासाठी त्याला देशातील दोन आघाड्यांपैकी एकीत जावेच लागेल. काँग्रेसचे राजकारण त्यांच्या परिचयाचे आहे. त्यांनी ते केलेही आहे. भाजप ही आतून बंद असलेली संघटना आहे हे राण्यांच्या अनुभवाने साºयांना दिसले आहे. पक्ष नेत्याच्या बळावर उभे राहतात मात्र तो नेता सत्तेची पदे मिळवून देणार अशी आशा असेल तरच ते टिकतात. पवारांनाही आपल्या पक्षानुयायांची परीक्षा फार काळ घेता येणार नाही.

प्रत्येक गावात काँग्रेस व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते वेगळे ओळखता न येण्याएवढे ते एकमेकांच्या जवळचे आहेत. काँग्रेसजवळ प्रबळ नेता नाही हेही त्यांच्या सामर्थ्याचे एक कारण आहे. मात्र ही स्थिती फार काळ टिकणारी नसते. मोदी काही काळातच देशाचे नेते झाले. या स्थितीत पवारांची पावले जलद गतीने पडली पाहिजेत. प्रादेशिक पक्ष प्रासंगिक असतात ही इतिहासाची शिकवण आहे. म्हणून म्हणायचे, ज्यांचा जीव लहान त्यांनी आपली दिशा आताच ठरवली पाहिजे. त्यातून राष्ट्रवादीचा जीवही लहान म्हणावा असाच आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNational Congress Partyनॅशनल काँग्रेस पार्टी