शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

...राष्ट्रवादीचा जीवही लहान म्हणावा असाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 03:11 IST

मोदी सरकारच्या लोकविरोधी धोरणांविरुद्ध लढायला सज्ज व्हा, हा शरद पवारांनी त्यांच्या राष्ट्रवादी सेनेला दिलेला आदेश महत्त्वाचा असला तरी त्या सेनेत कितीसे बळ उरले आहे

मोदी सरकारच्या लोकविरोधी धोरणांविरुद्ध लढायला सज्ज व्हा, हा शरद पवारांनी त्यांच्या राष्ट्रवादी सेनेला दिलेला आदेश महत्त्वाचा असला तरी त्या सेनेत कितीसे बळ उरले आहे याचा अदमास त्यांनी घेतलेला दिसत नाही. निवडणुका जवळ आल्याची व लोकसभेसोबत विधानसभेच्याही निवडणुका होणार असल्याची शक्यता पवारांना दिसते. त्यासाठी पक्ष उभा करणे त्यांना गरजेचे वाटते. गेल्या काही वर्षातील पावसाने त्यांच्या पक्षात फार मोठी पडझड केली आहे. भुजबळ हे त्याचे एकेकाळचे उपमुख्यमंत्री सध्या तुरुंगात राहतात. त्यांच्या सुटकेच्या शक्यताही संपल्यागत आहेत.

अजित पवार आणि तटकरे यांच्या डोक्यांवर ईडीच्या तलवारी लटकलेल्या आहेत. सुप्रिया सुळ्यांना त्यांचा प्रभाव वाढवणे जमत नाही आणि प्रफुल्ल पटेलांची निष्ठा तूर्तास वादातीत दिसत असली तरी त्यांचा मोदींकडे असलेला ओढाही लपून राहिलेला नाही. पक्षाचे कार्यकर्ते व मतदार यांच्यात खुद्द पवारांविषयीच संशय आहे. ते काँग्रेसच्या आघाडीसोबत असतील की भाजपच्या आघाडीसोबत जातील याची स्पष्टता त्यांच्या चाहत्यांच्याही मनात नाही. मनात संशय, नेतृत्वाविषयी अविश्वास आणि धोरणशून्यता ही स्थिती पक्षाला बळ कशी देणार आणि त्याला लढायला सज्ज तरी कसे करणार? उद्याची लढत काँग्रेसशी की भाजपशी हेच जर ठाऊक नसेल तर सामान्य कार्यकर्त्याने अखेरची आज्ञा येतपर्यंत वाट पहायची असते काय? पवारांनी फिरून काँग्रेससोबत जावे व त्या पक्षात राहून राज्य व पक्ष यांच्या नेतृत्वात सहभागी व्हावे असे त्यांचेच अनेक जुने व ज्येष्ठ सहकारी आता खासगीत बोलतात.

पवारांची आजवरची प्रवृत्ती पाहिली तर ते भाजप वा संघ यांच्यासोबत मनाने व विचाराने कधी जाणार नाहीत असे वाटते. पण राजकारणात विचार नसेल आणि ते नुसतेच लाभाचे क्षेत्र झाले असेल तर या गोष्टींना फारसे महत्त्व उरत नाही. पवारांना स्वत:चे मोल कळते. आताच्या भाजपला त्यांची गरज नाही हे त्यांना समजते. त्या पक्षासोबत जाऊन कुठली तरी ‘तीन हजारी मनसबदारी’ घेण्यापेक्षा अडचणीत असलेल्या व उभारी धरत असलेल्या काँग्रेससोबत राहणे अधिक श्रेयस्कर आहे हे त्यांना दुसºया कोणी सांगण्याचे कारण नाही. तसे ते एकेकाळी राजीव गांधींसोबत गेलेही आहेत. आताची निवड समोर आहे आणि त्यांच्यापुढची वेळेची निकडही मोठी आहे. निवडणुकांना दीड वर्ष राहिले आहे. त्यात नवी उभारणी करायची, पक्ष सावरायचा, नवी माणसे व संघटना जोडायच्या तर त्यासाठी वेळ द्यावा लागणार आहे. एक गोष्ट स्पष्ट आहे, त्यांचा पक्ष स्वबळावर देशात सोडा, महाराष्ट्रातही कधी सत्तेवर येणार नाही. त्यासाठी त्याला देशातील दोन आघाड्यांपैकी एकीत जावेच लागेल. काँग्रेसचे राजकारण त्यांच्या परिचयाचे आहे. त्यांनी ते केलेही आहे. भाजप ही आतून बंद असलेली संघटना आहे हे राण्यांच्या अनुभवाने साºयांना दिसले आहे. पक्ष नेत्याच्या बळावर उभे राहतात मात्र तो नेता सत्तेची पदे मिळवून देणार अशी आशा असेल तरच ते टिकतात. पवारांनाही आपल्या पक्षानुयायांची परीक्षा फार काळ घेता येणार नाही.

प्रत्येक गावात काँग्रेस व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते वेगळे ओळखता न येण्याएवढे ते एकमेकांच्या जवळचे आहेत. काँग्रेसजवळ प्रबळ नेता नाही हेही त्यांच्या सामर्थ्याचे एक कारण आहे. मात्र ही स्थिती फार काळ टिकणारी नसते. मोदी काही काळातच देशाचे नेते झाले. या स्थितीत पवारांची पावले जलद गतीने पडली पाहिजेत. प्रादेशिक पक्ष प्रासंगिक असतात ही इतिहासाची शिकवण आहे. म्हणून म्हणायचे, ज्यांचा जीव लहान त्यांनी आपली दिशा आताच ठरवली पाहिजे. त्यातून राष्ट्रवादीचा जीवही लहान म्हणावा असाच आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNational Congress Partyनॅशनल काँग्रेस पार्टी