शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीने पेरले ते उगवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2018 06:12 IST

अहमदनगरला महापौरपदाच्या निवडणुकीत अनपेक्षित काहीच घडलेले नाही. ठरवून सोंगट्या बसवाव्यात अशा नियोजनबद्धपणे ही निवडणूक पार पडली.

- सुधीर लंके(आवृत्तीप्रमुख, लोकमत अहमदनगर)अहमदनगरला महापौरपदाच्या निवडणुकीत अनपेक्षित काहीच घडलेले नाही. ठरवून सोंगट्या बसवाव्यात अशा नियोजनबद्धपणे ही निवडणूक पार पडली. राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर विकासाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीने भाजपाला बिनशर्त पाठिंबा देण्याचे धोरण घेतले होते. तोच इतिहास पवारांच्या ब्रिगेडने नगरला घडविला. त्यामुळे राष्टÑवादीने पेरले ते उगवले. आपल्या नगरसेवकांवर व नेत्यांवर कारवाई करण्याची नैतिकताही राष्ट्रवादी यामुळे गमावून बसली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांचे निर्णय स्थानिक पातळीवर हा जो शहाजोगपणा पक्ष नेहमी दाखवितो त्याची फळे राष्टÑवादीला नगरला भोगावी लागली. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत या पक्षाला याची उत्तरे द्यावी लागतील.नगर महापालिकेत ६८ जागांपैकी सेनेच्या सर्वाधिक २४, तर भाजपाच्या १४ जागा आहेत. या दोन्ही पक्षांची नैसर्गिक युती साकारली असती तर दोन्ही पक्षांचे बहुमत होऊन युतीची सत्ता स्थापन होणे सहज शक्य होते. यात घोडेबाजार टळला असता व जनतेनेही ही नैसर्गिक युती स्वीकारली असती. यात राष्टÑवादीचा दुरान्वयेही कोठे संबंध येत नव्हता. मात्र, सेना-भाजपा या दोन्ही पक्षांत स्थानिक पातळीवर बोलणीच झाली नाही. आमचे मुंबईतील नेते युतीबाबत निर्णय घेतील, असे स्थानिक नेते सांगत राहिले. दुसरीकडे वर अबोला होता.याची दोन कारणे असू शकतात. एक तर उद्धव ठाकरे भाजपाबाबत आक्रमक झालेले आहेत. ‘जागावाटप गेले खड्ड्यात आधी राम मंदिर, पीक कर्जाचे बोला’ असे ते पंढरपूरमध्ये बोलले. त्या आविर्भावात त्यांनी नगरची सत्ताही अक्षरश: खड्ड्यात घातली. दुसरी बाब म्हणजे सेनेची विधानसभेची स्थानिक गणिते. भाजपा व राष्टÑवादी यांची नगर शहरात आघाडी झाल्यास विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आपणाला आयता मुद्दा मिळून या अभद्र युतीचे ढोल वाजविता येतील. त्यातून राष्टÑवादीला ‘डॅमेज’ करता येईल, ही सेनेची स्थानिक गणिते आहेत. त्यामुळे त्यांचे स्थानिक नेते व माजी आमदार अनिल राठोड हे आपला महापौर करण्यासाठी फार आग्रही दिसलेच नाहीत. भाजपाचे महापौरपदाचे उमेदवार बाबासाहेब वाकळे हे त्यांच्या तिसऱ्या अपत्याच्या मुद्द्यामुळे वादग्रस्त ठरले आहेत. सेनेच्या एका पराभूत उमेदवारानेच याबाबत याचिका दाखल केली आहे. मात्र, सेनेच्या नेत्यांनी हा मुद्दा महापौर निवडणुकीत प्रभावीपणे कोठेही मांडला नाही. त्यामुळे सेनेलाच नगरमध्ये सत्ता नको होती, असे म्हणण्यास भरपूर वाव आहे. त्यांच्या उमेदवाराबाबत पक्षातच नाराजी होती.भाजपाला गमावण्यासारखे काही नव्हतेच. गतवेळी त्यांचे नगर महापालिकेत केवळ नऊ नगरसेवक होते. या वेळी ते जेमतेम चौदा जागांवर गेले. महापालिकेत ते ‘नापास’ झाले. तरीही त्यांचा आयता महापौर-उपमहापौर झाला. खरे तर हा मतदारांचा विश्वासघात आहे. हा पक्ष जिल्ह्यात आयात केलेल्या उमेदवारांवरच उभा आहे. नगरला जिल्हा परिषद व इतर निवडणुकांत यश मिळविणे त्यांना जमले नाही. लोकसभा, विधानसभेनंतर त्यांचे हे पहिलेच यश आहे. आमच्या ताब्यात इतक्या पालिका आहेत, अशी शेखी मिरविण्यासाठी ते मोकळे झाले. पण नगरकरांना ही आघाडी रुचेल का, ही शंका आहे.राष्टÑवादी या निवडणुकीत अगोदरपासूनच निरुत्साही होती. राष्टÑवादीचे स्थानिक आमदार संग्राम जगताप हे दोन शिवसैनिकांच्या हत्याकांडाच्या गुन्ह्यात आरोपी आहेत. ते अटकेतही होते. काँग्रेसचे कोतकर पिता-पुत्र हे दुसºया एका खून खटल्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. त्यांचे समर्थकही भाजपामध्ये गेले. सर्व गुन्ह्यांत आपणाला सरकारचे संरक्षण मिळावे यासाठीच कोतकर-जगताप यांनी भाजपासोबत मांडवली केली, अशी चर्चा आहे. गिरीश महाजनांनी नगरला येऊन राष्टÑवादीशी काय ‘बोलणी’ केली ते भविष्यात समोर येईल. आमदार जगताप पिता-पुत्रांनी व नगरसेवकांनी राष्टÑवादीचा आदेश डावलला आहे. त्यांच्यावर कारवाई करू, असे पक्षाने सांगितले. मात्र, जगतापांना बाहेर काढले तर नगरला राष्टÑवादी भुईसपाट होईल. राष्टÑवादीने काढले तरी जगतापांना आता भाजपाचे दार उघडेच आहे.काँग्रेस या निवडणुकीत फायद्यात राहिली. काँग्रेसचे नेतृत्व विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे व त्यांचे पुत्र सुजय विखे करत होते. ‘लोकसभा निवडणुकीसाठी मी कोणत्याही पक्षात जाऊ शकतो’, अशी वादग्रस्त भूमिका सुजय यांनी घेतली आहे. त्यांनी भाजपा-सेना यापैकी कुणालाही पाठिंबा दिला असता तर त्याचे वेगळे अर्थ काढले गेले असते. त्यामुळे ते चाणाक्षपणे तटस्थ राहिले. विखेंनीही यापूर्वी नगरला जिल्हा परिषदेत भाजपा-सेनेचा पाठिंबा घेतला आहे. पण निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी विषाची परीक्षा घेतली नाही. त्यांनी राष्टÑवादीलाही पाठिंबा देण्याचे धोरण घेतले नाही, हेही महत्त्वाचे. शिवरायांचा अवमान करणाºया श्रीपाद छिंदम याने सेनेला मतदान केले म्हणून एकीकडे या पक्षाच्या नगरसेवकांनी त्याला मारहाण केली. दुसरीकडे महापौरपदासाठी त्याचे मतही मागितले. यातून सेनेचा दुतोंडीपणा उघड झाला. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPoliticsराजकारण