शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
2
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
3
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
4
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
5
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
6
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी
7
वयाच्या तिशीत ‘हे’ ५ आर्थिक नियम शिका! तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही
8
Swapna Shastra: स्वप्नात स्वतःचा मृत्यू पाहणे हे शुभ की अशुभ लक्षण? स्वप्नशास्त्र काय सांगते पाहू
9
पंडित नेहरुंच्या शब्दांनी भाषणाची सुरुवात; न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम महापौर ममदानींचा व्हिडिओ व्हायरल...
10
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं दिलाय मोठा इशारा 
11
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
12
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
13
"RJD, काँग्रेसने बिहारला गुन्हेगारी, जातीय हिंसाचाराची राजधानी बनवलं", योगींचा जोरदार हल्लाबोल
14
बॉलिवूड अभिनेत्याचे अनेक अभिनेत्रींसोबत शारीरिक संबंध, पत्नीला संशय येताच मागे लावला डिटेक्टिव्ह अन् मग...
15
समृद्धी महामार्गावर १५०० सीसीटीव्ही कॅमेरे; नागपूर ते मुंबईपर्यंत ‘वॉच’
16
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
17
Banganga Aarti: बाणगंगा महाआरतीसाठी नियमावली कठोर, 'क्यूआर कोड'सह पूर्व-नोंदणी अनिवार्य!
18
"तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
19
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...

हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 11:52 IST

राष्टÑवादी काँग्रेस पक्षाच्या हल्लाबोल आंदोलनाने खान्देशात निवडणूकपूर्व वातावरण तापवले

राष्टÑवादी काँग्रेस पक्षाच्या हल्लाबोल आंदोलनाने खान्देशात निवडणूकपूर्व वातावरण तापवले आणि कार्यकर्त्यांसोबत सामान्य जनतेला आम्ही समर्थ पर्याय देऊ शकतो, असा विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. अस्वस्थ सभोवतालाचा लाभ या आंदोलनाला मिळाला आणि राज्यस्तरीय नेत्यांच्या सभांना चांगली गर्दी झाली. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने पंचवार्षिक कारकिर्दीचा शेवटचा टप्पा सुरु केला आहे; पण जनसामान्यांच्या अपेक्षांची पूर्तता करण्यात दोन्ही सरकारे अपयशी ठरत असल्याने समाजातील सर्वच घटकांमध्ये तीव्र स्वरुपाचा असंतोष आहे. या असंतोषाला वाट करुन देण्याचे काम राष्टÑवादी काँग्रेसने या आंदोलनाच्या माध्यमातून केले. यापूर्वी दोन्ही काँग्रेसने संघर्ष यात्रा काढली होती. परंतु त्यापेक्षा अधिक प्रतिसाद या आंदोलनाला मिळाला. समस्यांनी ग्रस्त असलेली मंडळी विरोधी पक्षाकडे मोठ्या संख्येने निवेदने घेऊन आल्याचे चित्र भाजपाच्या सत्ताकाळात प्रथमच यावेळी दिसून आले. राष्टÑीय महामार्ग चौपदरीकरण कामात जमीन घेऊनही योग्य मोबदला मिळाला नसल्याची विसरवाडी (जि.नंदुरबार) येथील ग्रामस्थांची तक्रार, माझे बाबा चिंताग्रस्त असतात, अशी बलवाडी (जि.जळगाव) येथील केळी उत्पादक शेतकºयाच्या चिमुरडीने मांडलेली कैफीयत, दोंडाईचा येथील विद्यार्थिनीवर शिक्षकाने केलेल्या अत्याचारासंबंधी दाद मागणारे भडगावातील महिलांचे निवेदन...हे सरकारकडून न्याय मिळत नसल्याची व राष्टÑवादीने हा प्रश्न धसास लावण्याची अपेक्षा व्यक्त करणाºया या घटना आहेत. ग्रामपंचायतीपासून तर संसदेपर्यंत शतप्रतिशत भाजपाचा नारा देणाºया सत्ताधारी मंडळींना या आंदोलनाने धोक्याची सूचना दिलेली आहे. जनता नाखूश आहे, असे नाडीपरीक्षण विरोधी पक्षाने जनतेत जाऊन जाणून घेतले. त्याचा परिणाम संसद व विधिमंडळ अधिवेशनात निश्चित दिसून येईल. या आंदोलनात खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, भास्कर जाधव ही नेते मंडळी सहभागी झाली होती. पण सर्वाधिक प्रतिसाद हा सुळे आणि मुंडे यांच्या भाषणांना मिळाला. शिवजयंतीला फागणे (जि.धुळे) ते अमळनेर (जि.जळगाव) दरम्यान काढलेली दुचाकी रॅली, मुक्तार्इंनगरच्या संत मुक्ताई मंदिरात जाऊन घेतलेले दर्शन, विखरण (जि.धुळे) येथे धर्मा पाटील यांच्या शोकग्रस्त कुटुंबियांची घेतलेली भेट यातून राष्टÑवादीच्या नेत्यांनी जाणीवपूर्वक जनसामान्यांशी असलेली नाळ घट्ट करण्याचा प्रयत्न केला. संघर्ष यात्रेदरम्यान भाजपाचे असंतुष्ट नेते एकनाथराव खडसे यांच्या घरी भेट देणाºया नेत्यांनी यावेळी मात्र खडसे यांच्यावर त्यांच्या मतदारसंघात टीका केली. ४० वर्षे निवडून येऊन पाण्याची समस्या सोडविता आली नाही, असा जाब भास्कर जाधव यांनी विचारला. तर जामनेरात जाऊन गिरीश महाजन यांची हुकूमशाही चालू देणार नाही, असा इशारा मुंडे यांनी दिला. भाजपाच्या असंतुष्ट वा निष्ठावंत अशा कोणत्याही नेत्याशी सलगी ठेवायची नाही, असा स्पष्ट संदेश यातून देण्यात आला. राष्टÑवादी कार्यकर्त्यांचा उत्साह या आंदोलनातून दुणावला आहे, हे मात्र खरे.

टॅग्स :JalgaonजळगावNCPराष्ट्रवादी काँग्रेस