शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
4
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
5
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
6
Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 
7
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
8
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
9
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
10
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
11
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
12
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
13
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
14
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
15
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
16
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
17
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
18
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
19
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
20
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा

हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 11:52 IST

राष्टÑवादी काँग्रेस पक्षाच्या हल्लाबोल आंदोलनाने खान्देशात निवडणूकपूर्व वातावरण तापवले

राष्टÑवादी काँग्रेस पक्षाच्या हल्लाबोल आंदोलनाने खान्देशात निवडणूकपूर्व वातावरण तापवले आणि कार्यकर्त्यांसोबत सामान्य जनतेला आम्ही समर्थ पर्याय देऊ शकतो, असा विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. अस्वस्थ सभोवतालाचा लाभ या आंदोलनाला मिळाला आणि राज्यस्तरीय नेत्यांच्या सभांना चांगली गर्दी झाली. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने पंचवार्षिक कारकिर्दीचा शेवटचा टप्पा सुरु केला आहे; पण जनसामान्यांच्या अपेक्षांची पूर्तता करण्यात दोन्ही सरकारे अपयशी ठरत असल्याने समाजातील सर्वच घटकांमध्ये तीव्र स्वरुपाचा असंतोष आहे. या असंतोषाला वाट करुन देण्याचे काम राष्टÑवादी काँग्रेसने या आंदोलनाच्या माध्यमातून केले. यापूर्वी दोन्ही काँग्रेसने संघर्ष यात्रा काढली होती. परंतु त्यापेक्षा अधिक प्रतिसाद या आंदोलनाला मिळाला. समस्यांनी ग्रस्त असलेली मंडळी विरोधी पक्षाकडे मोठ्या संख्येने निवेदने घेऊन आल्याचे चित्र भाजपाच्या सत्ताकाळात प्रथमच यावेळी दिसून आले. राष्टÑीय महामार्ग चौपदरीकरण कामात जमीन घेऊनही योग्य मोबदला मिळाला नसल्याची विसरवाडी (जि.नंदुरबार) येथील ग्रामस्थांची तक्रार, माझे बाबा चिंताग्रस्त असतात, अशी बलवाडी (जि.जळगाव) येथील केळी उत्पादक शेतकºयाच्या चिमुरडीने मांडलेली कैफीयत, दोंडाईचा येथील विद्यार्थिनीवर शिक्षकाने केलेल्या अत्याचारासंबंधी दाद मागणारे भडगावातील महिलांचे निवेदन...हे सरकारकडून न्याय मिळत नसल्याची व राष्टÑवादीने हा प्रश्न धसास लावण्याची अपेक्षा व्यक्त करणाºया या घटना आहेत. ग्रामपंचायतीपासून तर संसदेपर्यंत शतप्रतिशत भाजपाचा नारा देणाºया सत्ताधारी मंडळींना या आंदोलनाने धोक्याची सूचना दिलेली आहे. जनता नाखूश आहे, असे नाडीपरीक्षण विरोधी पक्षाने जनतेत जाऊन जाणून घेतले. त्याचा परिणाम संसद व विधिमंडळ अधिवेशनात निश्चित दिसून येईल. या आंदोलनात खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, भास्कर जाधव ही नेते मंडळी सहभागी झाली होती. पण सर्वाधिक प्रतिसाद हा सुळे आणि मुंडे यांच्या भाषणांना मिळाला. शिवजयंतीला फागणे (जि.धुळे) ते अमळनेर (जि.जळगाव) दरम्यान काढलेली दुचाकी रॅली, मुक्तार्इंनगरच्या संत मुक्ताई मंदिरात जाऊन घेतलेले दर्शन, विखरण (जि.धुळे) येथे धर्मा पाटील यांच्या शोकग्रस्त कुटुंबियांची घेतलेली भेट यातून राष्टÑवादीच्या नेत्यांनी जाणीवपूर्वक जनसामान्यांशी असलेली नाळ घट्ट करण्याचा प्रयत्न केला. संघर्ष यात्रेदरम्यान भाजपाचे असंतुष्ट नेते एकनाथराव खडसे यांच्या घरी भेट देणाºया नेत्यांनी यावेळी मात्र खडसे यांच्यावर त्यांच्या मतदारसंघात टीका केली. ४० वर्षे निवडून येऊन पाण्याची समस्या सोडविता आली नाही, असा जाब भास्कर जाधव यांनी विचारला. तर जामनेरात जाऊन गिरीश महाजन यांची हुकूमशाही चालू देणार नाही, असा इशारा मुंडे यांनी दिला. भाजपाच्या असंतुष्ट वा निष्ठावंत अशा कोणत्याही नेत्याशी सलगी ठेवायची नाही, असा स्पष्ट संदेश यातून देण्यात आला. राष्टÑवादी कार्यकर्त्यांचा उत्साह या आंदोलनातून दुणावला आहे, हे मात्र खरे.

टॅग्स :JalgaonजळगावNCPराष्ट्रवादी काँग्रेस