शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

तावडे, फडणवीस कुणाच्या बाजूने?

By सुधीर लंके | Updated: January 8, 2019 09:25 IST

देशात ‘सध्या’ लेखकांची व विचारांची ज्या पद्धतीने मुस्कटदाबी सुरु आहे त्यावर नयनतारा या आपल्या भाषणात भाष्य करणार होत्या व लेखकांना ‘लिहिते व्हा’ म्हणून आवाहन करणार होत्या.

‘आपला देश एका दुविधेत सापडला आहे. आपण कुठला मार्ग निवडावा- स्वातंत्र्याकडे की स्वातंत्र्यापासून दूर? ही गोष्ट आपण काय लिहितो यावर आणि आपल्याला गप्प राहण्यास भाग पाडणाऱ्यांपुढे मान तुकविण्यास आपण नकार देतो का? यावर अवलंबून असेल’’ इंग्रजी भाषिक लेखिका नयनतारा सहगल यांच्या भाषणातील या अखेरच्या काही ओळी आहेत. हे भाषण त्या यवतमाळ येथे १० जानेवारीपासून सुरु होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात करणार होत्या. त्या संमेलनाच्या उद्घाटक होत्या. मात्र, त्यांचे लिखित भाषण आयोजकांनी व मराठी साहित्य महामंडळाने वाचले व उद्घाटनापूर्वीच त्यांना संमेलनाला येण्यापासून रोखले.

देशात ‘सध्या’ लेखकांची व विचारांची ज्या पद्धतीने मुस्कटदाबी सुरु आहे त्यावर नयनतारा या आपल्या भाषणात भाष्य करणार होत्या व लेखकांना ‘लिहिते व्हा’ म्हणून आवाहन करणार होत्या. यातील ‘सध्या’ हा शब्द थेट मोदी राजवटीचे व त्यांच्या भक्तजणांचे वाभाडे काढतो. संमेलनाच्या व्यासपीठावर देशातील राजवटीचे वाभाडे निघायला नको या भीतीपोटी पाहुणाच रद्द करायचा ही फॅसिस्ट नीती संमेलनाच्या मांडवात देखील आली. यापूर्वी ती होतीच. संमेलनात कोणाला संधी द्यायची व कोणाला नाकारायची? याबाबतचे कावे नेहमी होतात. पण, ते किमान छुपे असायचे. आता ही नीती जाहीरपणे समोर आली.

खरेतर, या देशाच्या राज्यघटनेला जे अपेक्षित आहे तेच नयनतारा बोलत आहेत. जातीच्या-धर्माच्या नावाने माणसांचा जीव घेण्यास त्यांचा तीव्र विरोध आहे. मात्र, तरीही त्यांचे भाषण मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांना व साहित्य महामंडळाला खटकले हे अजबच म्हटले पाहिजे. गोमांस खाणाऱ्यांची कत्तल करणारी झुंड आणि साहित्य महामंडळ यांच्यात त्यामुळेच फरक उरला नाही, असे वाटते.आपले साहित्य महामंडळच शब्दांना घाबरुन मोराचा पिसारा फुलविणेच थांबवू लागले असल्याची ही प्रचिती आहे. नयनतारा यांना संमेलनाचे निमंत्रण दिले व पुन्हा ते रद्द केले ही कृती न आवडल्याने अनेक साहित्यिकांनी व पत्रकारांनीही या संमेलनावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे राज्य सरकारने लगेच हात झटकाझटकी सुरु केली. ‘नयनतारा यांचे निमंत्रण रद्द करण्याचा निर्णय संमेलनाच्या आयोजकांचा आहे, यात सरकारचा काहीही दोष नाही’, असा खुलासा सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी केला आहे. तावडे खरोखरच खरे बोलत असतील तर मग आता सरकारनेच साहित्य महामंडळाचा निषेध करुन त्यांचे कान उपटणे आवश्यक आहे. एवढेच नाही, तर अ.भा. मराठी साहित्य मंहामंडळाने महाराष्ट्राची मान शरमेने खाली झुकेल अशी कृती केल्याने संमेलनाला सरकारने दिलेला निधी ताबडतोबीने परत घेतला पाहिजे. या संमेलनाशी सरकारचा काहीएक संबंध नाही म्हणूनही जाहीर करायला हवे. संमेलनाच्या आयोजकांनी लोकशाहीचीच गळचेपी केली असल्याने मुख्यमंत्री व स्वत: तावडे यांनीही संमेलनावर बहिष्कार टाकणे इष्ट ठरेल. सरकारने अशी कृती केली तर त्यांचे पापक्षालन होऊ शकेल. तरच तावडे खरे बोलत आहेत, असे मानता येईल. हे सगळे करणे सरकारला शक्य नसेल, तर झालेल्या चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त करत सरकारने नयनतारा यांना सन्मानाने पुन्हा संमेलनाला बोलवावे हाही एक पर्याय आहे. त्यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून तावडे यांनी पुढाकार घ्यायला हवा.

नयनतारा आपल्या न झालेल्या भाषणात जे सांगू पाहत होत्या त्याप्रमाणे फडणवीस व तावडे आता कोणता मार्ग निवडणार? ‘स्वातंत्र्याकडे जाणारा की स्वातंत्र्यापासून दूर?’- सुधीर लंके

(आवृत्तीप्रमुख, लोकमत अहमदनगर)

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसVinod Tawdeविनोद तावडे