शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

राष्ट्रपती राजवटीच्या प्रयत्नांना ‘नॉटी’ पाठबळ

By यदू जोशी | Updated: September 26, 2020 06:10 IST

महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार जावं आणि राष्ट्रपती राजवट लागू व्हावी यासाठीचा पाया तयार करण्याचं काम सध्या चाललं आहे. आता त्या पायावर सरकार बरखास्तीची इमारत उभी राहते की ती कोसळून प्रयत्न करणारेच त्या खाली गाडले जातात ते पहायचे.

- यदू जोशीवरिष्ठ सहाय्यक संपादक, लोकमतमहाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार जावं आणि राष्ट्रपती राजवट लागू व्हावी यासाठीचा पाया तयार करण्याचं काम सध्या चाललं आहे. आता त्या पायावर सरकार बरखास्तीची इमारत उभी राहते की ती कोसळून प्रयत्न करणारेच त्या खाली गाडले जातात ते पहायचे. (पहाटेचा शपथविधी अंगलट आला होता, हा पूर्वानुभव आहेच.) प्रयत्न मात्र नक्कीच जोमाने सुरू आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची वक्तव्यं हीे ‘बिटविन द लाइन्स’ वाचायची असतात. परवा ते म्हणाले की, ‘महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करणे म्हणजे गंमत आहे का?’

- याचा अर्थच असा आहे की असे कुठेतरी प्रयत्न नक्कीच होत असल्याची कुणकुण पवार यांना लागली असणार वा ठोस माहिती मिळाली असणार. सरकार पाडण्याचे प्रयत्न काही आयपीएस अधिकाऱ्यांनी केले होते ही माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांना मिळू शकते तर पवारांना त्यापुढची बरीच माहिती असणार. राष्ट्रपती राजवटीसाठी काही अदृश्य हात कोणाच्या तरी इशाºयावरून नक्कीच कामाला लागले आहेत असं दिसतं.रणनीती अशी ठरली आहे म्हणतात की, कुठला एकच पक्ष फोडण्याऐवजी तिन्ही सत्तारूढ पक्षातील २० ते २५ आमदार गळाला लावायचे आणि त्यांना पोट-निवडणुकीत निवडून आणायचं, पण हे लगेच केलं तर तीन पक्षांच्या आघाडीविरुद्ध आमदार पुन्हा निवडून येण्याची शक्यता कमी. म्हणून आधी या सरकारची विश्वासार्हता आणि प्रतिमा धोक्यात आणायची आणि तीन पक्ष एकत्र लढणार नाहीत अशी व्यवस्था करायची. राष्ट्रपती राजवटीमुळे दोन-तीन महिन्यांचा अवधी मिळेल आणि त्यात हे करणं शक्य होईल. राजभवन हक्काचं आहेच. सरकार पाडण्याचा रोष अंगावर न घेता ‘आॅपरेशन कमळ’ करण्याचं चाललं आहे.

हे सगळं डिसेंबरपर्यंत होईल असा तर्क दिला जातोय. एका रणनीतीचा भाग म्हणून फासे टाकले जात आहेत आणि शिवसेना त्यात अडकत चालली आहे. शिवसेनेतील वाचाळ नेते हरामखोर (सॉरी, नॉटी) आदी शब्द वापरून, धमक्यांची भाषा करून त्या रणनीतीला बळ देत आहेत. कंगना, सुशांतसिंह, ड्रग्ज आदी मुद्द्यांवरून चॅनलवॉर पेटलेलं आहेच. एक हिंदी चॅनल कंगनाची बाजू घेतं, तर तिचीच मराठी वाहिनी कंगनाला फटकारताना दिसते. चॅनलचे पत्रकार एकमेकांत जाहीर हाणामारी करीत आहेत.समजूतदारपणाचं बोट धरून चालणाºया महाराष्ट्रात पूर्वी असं कधी घडलं नाही. मराठा, धनगर आरक्षणाचे विषय ऐरणीवर आहेत. कोरोनाने होणाºया मृत्यूंचं प्रमाण कमी होताना दिसत नाही. विरोधी पक्ष आक्रमक झालाय. शेतकरी विधेयकांवरून शिवसेनेनं मोदी सरकारला हेडआॅन घेतलं नाही. ही बोटचेपी भूमिका राज्यातील सरकारवर राष्ट्रपती राजवटीची आच येऊ नये म्हणून तर घेतली नाही ना, अशी शंका येते. भाजपबरोबर सत्तेत असताना शिवसेना एकाचवेळी सत्तारूढ आणि विरोधी पक्षाच्या भूमिकेत असायची, आताही तेच सुरू आहे. शिवसेनेनं ‘आपलाच वाद आपणाशी’ करत बसण्यापेक्षा सत्तेतून येणारं शहाणपण दाखविण्याची गरज आहे.

 

आदित्यजी, नकारात्मक राजकारण करू नका!देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात मुख्यमंत्री फेलोशिप हा महत्त्वाकांक्षी उपक्रम यशस्वीरीत्या सुरू होता. त्यात आयआयटीयन्स, सीए, एमबीए अशी हुशार तरुणाई राज्याच्या विकास योजनांशी कनेक्ट व्हायची. अनेक योजना, केंद्राच्या मदतीचे प्रकल्प, नावीन्यपूर्ण उपक्रम त्यातून उभे राहिले. नव्या सरकारने ती फेलोशिप बंद केली. सहाव्या माळ्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या बाजूला आदित्य ठाकरे अनेकदा बसतात. केवळ फडणवीस सरकारची योजना म्हणून फेलोशिप बंद करणं यात नकारात्मक राजकारण असून, राज्याचं आणि गुणी तरुणाईचं नुकसान आहे. कंगना, ड्रग्ज, नेपोटिझमपासून दूर असलेली गुणी मुलं चालतात ना सरकारला? पर्यटन मंत्री म्हणून कृषी पर्यटन, साहसी पर्यटन धोरण आणल्याबद्दल मात्र आदित्य यांचं अभिनंदन!दादा, अशी प्रतीकात्मक आर्थिकबचत कशाला?सरकारी विभागांनी कॅलेंडर, शुभेच्छापत्रं छापू नयेत असा आर्थिक बचतीसाठीचा आदेश वित्त विभागानं काढलाय. मंत्र्यांसाठी नवीन गाड्या घेऊ नयेत, २५:१५ मध्ये शेकडो कोटी रुपये आमदारांना देऊ नयेत, जलसंपदाच्या विशिष्ट कंत्राटदारांना कोट्यवधींची बिलं देऊ नयेत, इमेज बिल्डिंगसाठी कोट्यवधी रुपये खर्च करू नयेत, असेही आदेश काढले तर त्यात खरी ‘दादा’गिरी दिसेल. प्रतीकात्मक बचतीनं काय साधणार?

टॅग्स :President Ruleराष्ट्रपती राजवटUddhav Thackerayउद्धव ठाकरेmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीShiv SenaशिवसेनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस