शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

विश्व व्यापून राहिलेले स्वामी विवेकानंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2019 17:26 IST

भारतीय संस्कृती आणि उदात्त मानवतावादी तत्त्वज्ञानाचा परिचय संपूर्ण विश्वाला करून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य स्वामी विवेकानंद यांनी केले आहे.

>> संतोष सोनावणे

आज राष्ट्रीय युवक दिन अर्थात स्वामी विवेकानंद यांची जयंती. तरुणांचे, युवकांचे प्रेरणास्थान म्हणून स्वामी विवेकानंदांच्या चरित्राकडे पाहिले जाते. या दिवशी युवकांनी स्वामींच्या जीवनाचा अभ्यास करून, त्यातून प्रेरणा घेऊन त्यांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जावे आणि या विश्वात आधुनिक असा उदयोन्मुख गौरवशाली भारत या विश्वात निर्माण करावा, अशी माफक अपेक्षा या दिनामागे आहे.

आजही आपल्या देशात मूर्तिपूजकांची संख्या काही कमी नाही. त्यामुळे स्वामींसारख्या महनीय व्यक्तींच्या विचारांचा वारसा आजही मागे पडताना दिसत आहे. त्यातही काही कर्मठ आणि स्वार्थी प्रवृत्तींनी स्वामींच्या विचारांचा विपर्यास करून आपल्या सोयीने त्यांना दूर लोटण्याचे काम केल्याचे दिसून येत आहे. काहींनी स्वामी हे फक्त आमचेच होते, असा नारा देत स्वामींपासून इतर समाजाला दूर ठेवले आहे.भारतीय संस्कृती आणि उदात्त मानवतावादी तत्त्वज्ञानाचा परिचय संपूर्ण विश्वाला करून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य स्वामी विवेकानंद यांनी केले आहे. विश्वबंधुत्वाचे पुरस्कर्ते म्हणून विवेकानंदांनी हा मानवतेचा संदेश साऱ्या जगभर पोहोचवण्याचे काम अतिशय निष्ठेने केले आहे. पाश्चिमात्य देशांत हिंदू धर्माची महती सांगण्याचे आणि ते पटवून देण्याचे पहिले काम विवेकानंदांनी केले आहे. आपल्या भारतात सुमारे १३ हजारांहून अधिक किलोमीटर भ्रमण करून देशातील विविध प्रदेशांतील संस्कृती, तेथील समाजव्यवस्था, रूढी-परंपरा यांचा अभ्यास केला. सावकार, जमीनदारवर्गाची श्रीमंती आणि दीनदलितांच्या दु:ख, दारिद्रयाचाही त्यांनी आपल्या फिरण्यात अनुभव घेतला. पुढे या साऱ्या अनुभवातून आणि जगण्यातूनच त्यांनी आपल्या समाजहिताच्या कार्याची दिशा ठरवली. समाजात मागे पडलेल्या लोकांच्या उत्कर्षासाठी आपले आयुष्य समर्पित करण्याचा निर्णय या थोर महापुरुषाने घेतला. जुनाट अंधश्रद्धा आणि जातीजातींमधील भेदभाव त्यांना लहानपणापासूनच मान्य नव्हता.

धर्म मग तो कोणताही असो, त्याचा अभ्यास करून त्यासंदर्भात त्यांनी आपले विचार खूप स्पष्टपणे मांडले आहेत. त्यासाठी त्यांनी अनेक धर्मांचा अभ्यास केला होता. समाजातील जातीभेद, उच्चनीचता, वर्गविषमता दूर करण्यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक धर्माचा आणि भगव्या कफनीचा मार्ग स्वीकारला. समग्र परिवर्तनाचा विचार केला. आज या दिनाला त्यांचे विचार आणि त्यांचे कार्य याचा सूक्ष्म अभ्यास करून त्यांचे हे ध्येय पूर्ण करण्याचा संकल्प करणे आणि त्यांच्या चेहऱ्याचा आपल्या गरजेनुसार उपयोग करून घेऊ पाहणाऱ्या स्वार्थी घटकांच्या विळख्यातून विवेकानंदांची सुटका करणे हेच खऱ्या अर्थाने त्यांना अभिवादन ठरेल.

टॅग्स :Swami Vivekanandaस्वामी विवेकानंद