शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
3
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
4
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
5
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
6
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
7
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
8
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
9
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
10
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
11
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
12
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
14
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
15
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
16
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
17
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
18
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
19
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
20
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश

विश्व व्यापून राहिलेले स्वामी विवेकानंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2019 17:26 IST

भारतीय संस्कृती आणि उदात्त मानवतावादी तत्त्वज्ञानाचा परिचय संपूर्ण विश्वाला करून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य स्वामी विवेकानंद यांनी केले आहे.

>> संतोष सोनावणे

आज राष्ट्रीय युवक दिन अर्थात स्वामी विवेकानंद यांची जयंती. तरुणांचे, युवकांचे प्रेरणास्थान म्हणून स्वामी विवेकानंदांच्या चरित्राकडे पाहिले जाते. या दिवशी युवकांनी स्वामींच्या जीवनाचा अभ्यास करून, त्यातून प्रेरणा घेऊन त्यांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जावे आणि या विश्वात आधुनिक असा उदयोन्मुख गौरवशाली भारत या विश्वात निर्माण करावा, अशी माफक अपेक्षा या दिनामागे आहे.

आजही आपल्या देशात मूर्तिपूजकांची संख्या काही कमी नाही. त्यामुळे स्वामींसारख्या महनीय व्यक्तींच्या विचारांचा वारसा आजही मागे पडताना दिसत आहे. त्यातही काही कर्मठ आणि स्वार्थी प्रवृत्तींनी स्वामींच्या विचारांचा विपर्यास करून आपल्या सोयीने त्यांना दूर लोटण्याचे काम केल्याचे दिसून येत आहे. काहींनी स्वामी हे फक्त आमचेच होते, असा नारा देत स्वामींपासून इतर समाजाला दूर ठेवले आहे.भारतीय संस्कृती आणि उदात्त मानवतावादी तत्त्वज्ञानाचा परिचय संपूर्ण विश्वाला करून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य स्वामी विवेकानंद यांनी केले आहे. विश्वबंधुत्वाचे पुरस्कर्ते म्हणून विवेकानंदांनी हा मानवतेचा संदेश साऱ्या जगभर पोहोचवण्याचे काम अतिशय निष्ठेने केले आहे. पाश्चिमात्य देशांत हिंदू धर्माची महती सांगण्याचे आणि ते पटवून देण्याचे पहिले काम विवेकानंदांनी केले आहे. आपल्या भारतात सुमारे १३ हजारांहून अधिक किलोमीटर भ्रमण करून देशातील विविध प्रदेशांतील संस्कृती, तेथील समाजव्यवस्था, रूढी-परंपरा यांचा अभ्यास केला. सावकार, जमीनदारवर्गाची श्रीमंती आणि दीनदलितांच्या दु:ख, दारिद्रयाचाही त्यांनी आपल्या फिरण्यात अनुभव घेतला. पुढे या साऱ्या अनुभवातून आणि जगण्यातूनच त्यांनी आपल्या समाजहिताच्या कार्याची दिशा ठरवली. समाजात मागे पडलेल्या लोकांच्या उत्कर्षासाठी आपले आयुष्य समर्पित करण्याचा निर्णय या थोर महापुरुषाने घेतला. जुनाट अंधश्रद्धा आणि जातीजातींमधील भेदभाव त्यांना लहानपणापासूनच मान्य नव्हता.

धर्म मग तो कोणताही असो, त्याचा अभ्यास करून त्यासंदर्भात त्यांनी आपले विचार खूप स्पष्टपणे मांडले आहेत. त्यासाठी त्यांनी अनेक धर्मांचा अभ्यास केला होता. समाजातील जातीभेद, उच्चनीचता, वर्गविषमता दूर करण्यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक धर्माचा आणि भगव्या कफनीचा मार्ग स्वीकारला. समग्र परिवर्तनाचा विचार केला. आज या दिनाला त्यांचे विचार आणि त्यांचे कार्य याचा सूक्ष्म अभ्यास करून त्यांचे हे ध्येय पूर्ण करण्याचा संकल्प करणे आणि त्यांच्या चेहऱ्याचा आपल्या गरजेनुसार उपयोग करून घेऊ पाहणाऱ्या स्वार्थी घटकांच्या विळख्यातून विवेकानंदांची सुटका करणे हेच खऱ्या अर्थाने त्यांना अभिवादन ठरेल.

टॅग्स :Swami Vivekanandaस्वामी विवेकानंद