शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
3
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
4
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
5
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
6
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
7
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
8
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
9
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
10
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
11
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
12
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
13
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
14
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
15
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
16
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
17
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
18
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
19
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
20
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज

वेध - नांदेडचा घोडेबाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 00:11 IST

नांदेड-वाघाळा महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध भाजप या लढाईला तोंड फुटले. डाव-प्रतिडाव, शह-काटशहाचे राजकारण रंगणार असल्याने दिवसागणिक रंगत वाढत जाणार.

- सुधीर महाजननांदेडच्या घोडेबाजारात भाजपचा भाव सध्या वधारलेला दिसतो आणि त्यांची खरेदी जोरात सुरू आहे. बोली लावलेले सगळेच घोडे आहेत असा भाजपचा समज दिसतो. त्यामुळे घोडे किती तट्टू किती हे महापालिकेच्या रेसकोर्सवर धावतानाच स्पष्ट होईल; पण भाजपचा घोडेबाजार तेजीत आहे. काँग्रेस आणि शिवसेनेसाठी गयाराम, तर भाजपसाठी आयाराम अशी परिस्थिती दिसते. महानगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजण्यापूर्वीच भाजपने हा घोडेबाजार मांडला आणि आतापर्यंत शिवसेनेचे १२ आणि काँग्रेसचे ५ नगरसेवक भाजपच्या गळाला लागले. लातूरमध्ये विलासराव देशमुख समर्थकांच्या हातून भाजपने महापालिका काबीज केली. तोच प्रयोग अशोक चव्हाणांच्या संदर्भात त्यांना नांदेडमध्ये करायचा असल्याने कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर आणि प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंग ठाकूर या दोन बिनीच्या शिलेदारांनी हा विडा उचलला.नांदेडमध्ये भाजपचा तसा राजकीय दबदबा नाही. मोदींच्या सत्तारोहणानंतर सूर्यकांता पाटील, डॉ. माधव किन्हाळकर अलीकडे ओमप्रकाश पोकर्णा, दिलीप कंदकुर्ते, सुधाकर पांढरेंसारखी मंडळी तळ्यातून मळ्यात आली आणि आता महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर गयारामांची गर्दी वाढली. यात प्रस्थापितांविरोधातील नाराजी हा घटकसुद्धा दुर्लक्षित करता येणार नाही, कारण वर्षानुवर्षे हा काँग्रेसचा गड राहिला आहे. यावेळी भाजपच्या रणनीतीचा भाग म्हणजे त्यांनी चाणक्यनीतीचा वापर केला. अशोक चव्हाणांचे शत्रू म्हणजे आपले मित्र, या सूत्रानुसार शिवसेनेचे आमदार प्रताप चिखलीकरांना त्यांनी गळाला लावले. चिखलीकरांनीसुद्धा शिवसेनेचा मळवट कायम ठेवून उघडपणे भाजपचा झेंडा आपल्या मावळ्यांच्या हाती दिला. आपली मंडळी तिकडे पाठविली. उद्धव ठाकरे त्यांच्यावर कारवाई करू शकत नाहीत. पक्षविरोधी कारवायांच्या नावाखाली त्यांची हकालपट्टी केली तर त्यांचे बळ कमी होते आणि चिखलीकरांच्या पाठोपाठ काही आमदार बाहेर पडण्याची भीती आहे आणि नेमका याचाच फायदा चिखलीकर उठवत आहेत. नांदेडमध्ये भाजपचा असा नेत्याचा चेहराच नाही. सगळी सूत्रे चिखलीकर हलवतात. त्यामुळे भाजपमध्ये अंतर्गत पोटदुखी उघडपणे दिसते. परवा पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनाला सूर्यकांता पाटील, पोकर्णा, कंदकुर्ते, डॉ. किन्हाळकर, धनाजीराव देशमुख, राम पाटील रातोळीकर ही मंडळी उपस्थित नव्हती. भाजपचे नेतृत्व कोणाकडे, हा प्रश्न अजून कायम आहे. भाजपमधील जुन्या मंडळींचे दु:ख म्हणजे आजवर चिखलीकरांना विरोध केला, आता त्यांच्या कलाने काम करावे लागणार आहे आणि त्यांच्यामुळे निष्ठावंतांची उमेदवारी कापली जाईल, अशी जोरदार चर्चा आहे.आपल्या समर्थकांची सोय लावूनच ते भाजपवासी होतील असा अंदाज असल्याने अनेकांच्या मनसुब्यांवर पाणी पडण्याची चिन्हे दिसतात, हेसुद्धा भाजपच्या निष्ठावंतांमधील अस्वस्थतेचे कारण आहे. चिखलीकर हे काँग्रेसमधून शिवसेनावासी झाले होते.भाजपसाठी मुस्लीमबहुल १५ वॉर्ड ही डोकेदुखी झाली. या ठिकाणी त्यांच्याकडे उमेदवारच नाही आणि काँग्रेससाठी बलस्थान आहे. निवडणुका जाहीर होताच अशोक चव्हाणांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींची सभा घेतली, त्याचा परिणाम होईलच, शिवाय काँग्रेसकडे अशोक चव्हाण हा राज्यपातळीवर नेतृत्वाचा चेहरा आहे. शिवाय इतकी वर्षे या शहराचे राजकारण, समाजकारण करणारे नेतृत्व म्हणून ते ओळखले जाते, ही जमेची बाजू ठरते. असा चेहरा आजच्या घडीला भाजपकडे नाही. भाजप-सेना युती आता कुंकवापुरती शिल्लक आहे. चिखलीकरांच्या डबल गेममुळे निष्ठावान शिवसैनिक अस्वस्थ आहेत. काँग्रेसमधून जे गेले त्यांना थांबविण्याचा प्रयत्न चव्हाणांनी केला नाही, याची चर्चा आहे. घोडा-मैदान जवळ असले तरी कस दोघांचाही लागणार. चव्हाणांना गड राखायचा असल्याने गनिमी कावा कोणता हेच पाहणे मजेशीर ठरणार आहे.

टॅग्स :BJPभाजपा