शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
2
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
3
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
4
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
5
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
6
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
7
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
8
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
9
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
10
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
11
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
12
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
13
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
14
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
15
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
16
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
18
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
19
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
20
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...

नाना.. अण्णा.. अन् दादा.. परतीचे दोर कापले गेलेत !

By सचिन जवळकोटे | Updated: September 29, 2019 09:00 IST

लगाव बत्ती..

- सचिन जवळकोटे

प्रिय सरकोलीकर, दुधनीकर अन् निमगावकर..पितृपक्ष संपला. मातृपक्ष तुमची वाट पाहतोय...कारण ऐन सणासुदीत तुम्ही घरदार अन् जीवाभावाचे कार्यकर्ते सोडून मुंबईत तळ ठोकून बसलात. युतीचे अघोषित उमेदवार प्रचाराच्या कामालाही लागले. तुम्हाला मात्र ‘चंदूदादा अन् देवेंद्रपंतां’नी प्रतीक्षेच्या कामाला लावलं. येत्या दोन-तीन दिवसात तुम्हाला काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल. तिकडं मुंबईत ‘कमळ’वाल्यांच्या मनात काहीही असेल; मात्र इकडं तुमच्या मतदारसंघातील सच्चा कार्यकर्त्यांच्या मनात काय काहूर माजलंय, हे तुम्हाला आता जाणून घ्यावंच लागेल...कारण परतीचे दोर तुम्ही केव्हाच कापून टाकलेत. 

  सरकोलीचे ‘भारतनाना’, दुधनीचे ‘सिद्धूअण्णा’ अन् निमगावचे ‘बबनदादा’ हे स्वत:च्या कर्तृत्वावर पुढे आलेले. तिघांनीही राजकारणात शून्यातून विश्व निर्माण केलेलं. पक्षांतर्गत विरोधकांवर मात करत समोरच्या पक्षाशी सातत्यानं संघर्ष केलेला. ‘भारतनानां’नी ‘थोरले दादा अकलूजकर’ यांचा पंढरपुरात पाडाव करून सोलापूरच्याराजकारणात न भूतो न भविष्यती असा विक्रम करून ठेवलेला. ‘सिद्धूअण्णां’नीही गृहराज्यमंत्रीपद मिळवून अक्कलकोटचं नाव अधिकच मोठ्ठं केलेलं. ‘बबनदादां’नीही एकेकाळी ‘भीमा-सीना’ पाण्यासाठी मंत्रीपदावर लाथ मारलेली. 

 जिल्ह्याच्या राजकारणात या तिघांचाही स्वत:चा असा वेगळा दबदबा. तरीही गेल्या एक महिन्यापासून ज्या पद्धतीनं या तिघांची ‘फिरवाफिरवी’ सत्ताधाऱ्यांकडून केली जातेय, ती तमाम कार्यकर्त्यांसाठी अत्यंत धक्कादायक. क्लेशकारक. सोलापूरच्या सभेत कोल्हापूर, सातारा अन् उस्मानाबादच्या नेत्यांना प्रवेश दिला जातो. व्यासपीठावर मोठ्या सन्मानानं बसविलं जातं; मात्र इथल्या भूमिपुत्रांना या कार्यक्रमापासून पद्धतशीरपणे बाजूला का ठेवलं जातं, हे न ओळखण्याइतपत कार्यकर्ते नक्कीच नसावेत भोळे...    त्यामुळं ‘सत्ताधाऱ्यांचे उंबरठे’ आणखी किती दिवस झिजवायचे, याचा निर्णय घ्यावाच लागेल आता या तिघांना. मात्र या तिघांचीही मानसिकता पुन्हा मातृपक्षाकडे जाण्याची नाहीच. ‘कमळ मिळालं नाही तर हरकत नाही, अपक्ष उभारू; परंतु हात किंवा घड्याळ नको’ या भूमिकेवर म्हणे हे नेते ठाम... कारण यांनी स्वत:च परतीचे दोन कापून टाकलेत. लगाव बत्ती...

खरे निष्ठावंत कोण......मालक की अण्णा ?

   यंदाच्या निवडणुकीत एक नवीनच शब्द अनेक नेत्यांच्या तोंडून ऐकू येतोय. तो म्हणजे ‘सर्व्हे’. तिकीट मागण्यासाठी गेलेल्या प्रत्येकाला ‘वर्षा’ किंवा ‘मातोश्री’वर एवढा एकच शब्द सांगितला जातोय. त्यामुळं इच्छुकांना जळी-स्थळी ‘सर्व्हे’ हाच शब्द दिसू लागलाय. परवा एका स्थानिक नेत्याच्या मुलानं हौसेनं नवीन टू-व्हिलर मागितली तेव्हा त्याला म्हणे पित्यानं शांतपणे सांगितलं,‘थांबऽऽ अगोदर आपण सर्व्हे करू. कुठल्या गाडीची प्रतिमा जनमानसात चांगली आहे. मग निर्णय घेऊ.’ लगाव बत्ती...

  असो. ‘मध्य’मध्येही ‘धनुष्यबाण’वाल्यांनी सर्व्हे केला. या ठिकाणी दोन तगडे इच्छुक. कुमठ्याचे ‘दिलीपमालक’ तर मुरारजीपेठेतले (सॉरीऽऽ विडी घरकुलमधले) ‘महेशअण्णा’. या ठिकाणी गुप्त ‘सर्व्हे’ करणाऱ्या टीमनं लोकांना म्हणे काही प्रश्न विचारले.1. या इच्छुक नेत्यांमध्ये सर्वाधिक निष्ठावान अन् प्रामाणिक कोण ?2. प्रत्येक गोष्टीत जाती-पातीचं राजकारण सर्वाधिक कोण करतं ?3. ठराविक कार्यकर्त्यांच्या गोतावळ्यातच कोण रमतं?4. निवडणूक संपल्यानंतरही सर्वसामान्यांना थेट कोण भेटू शकतं ?5. साध्या-सुध्या कार्यकर्त्यांचे फोनही पटकन् कोण उचलतं ?6. आपल्या संस्थेत आपल्याच पै-पाहुण्यांची भरती कोण करतं ?

   ...आता या सर्व्हेचा रिपोर्ट तयार होऊन नुकताच वरपर्यंत पोहोचलाय. दोन-चार दिवसात जाहीरही होईल इथल्या उमेदवारीचा अंतिम निर्णय. तोपर्यंत शोधत बसायला हरकत नाही, आपण या साऱ्या प्रश्नांची उत्तरं. लगाव बत्ती...

( लेखक 'सोलापूर लोकमत'चे निवासी संपादक आहेत.)

टॅग्स :Solapurसोलापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारण