शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

नाना.. अण्णा.. अन् दादा.. परतीचे दोर कापले गेलेत !

By सचिन जवळकोटे | Updated: September 29, 2019 09:00 IST

लगाव बत्ती..

- सचिन जवळकोटे

प्रिय सरकोलीकर, दुधनीकर अन् निमगावकर..पितृपक्ष संपला. मातृपक्ष तुमची वाट पाहतोय...कारण ऐन सणासुदीत तुम्ही घरदार अन् जीवाभावाचे कार्यकर्ते सोडून मुंबईत तळ ठोकून बसलात. युतीचे अघोषित उमेदवार प्रचाराच्या कामालाही लागले. तुम्हाला मात्र ‘चंदूदादा अन् देवेंद्रपंतां’नी प्रतीक्षेच्या कामाला लावलं. येत्या दोन-तीन दिवसात तुम्हाला काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल. तिकडं मुंबईत ‘कमळ’वाल्यांच्या मनात काहीही असेल; मात्र इकडं तुमच्या मतदारसंघातील सच्चा कार्यकर्त्यांच्या मनात काय काहूर माजलंय, हे तुम्हाला आता जाणून घ्यावंच लागेल...कारण परतीचे दोर तुम्ही केव्हाच कापून टाकलेत. 

  सरकोलीचे ‘भारतनाना’, दुधनीचे ‘सिद्धूअण्णा’ अन् निमगावचे ‘बबनदादा’ हे स्वत:च्या कर्तृत्वावर पुढे आलेले. तिघांनीही राजकारणात शून्यातून विश्व निर्माण केलेलं. पक्षांतर्गत विरोधकांवर मात करत समोरच्या पक्षाशी सातत्यानं संघर्ष केलेला. ‘भारतनानां’नी ‘थोरले दादा अकलूजकर’ यांचा पंढरपुरात पाडाव करून सोलापूरच्याराजकारणात न भूतो न भविष्यती असा विक्रम करून ठेवलेला. ‘सिद्धूअण्णां’नीही गृहराज्यमंत्रीपद मिळवून अक्कलकोटचं नाव अधिकच मोठ्ठं केलेलं. ‘बबनदादां’नीही एकेकाळी ‘भीमा-सीना’ पाण्यासाठी मंत्रीपदावर लाथ मारलेली. 

 जिल्ह्याच्या राजकारणात या तिघांचाही स्वत:चा असा वेगळा दबदबा. तरीही गेल्या एक महिन्यापासून ज्या पद्धतीनं या तिघांची ‘फिरवाफिरवी’ सत्ताधाऱ्यांकडून केली जातेय, ती तमाम कार्यकर्त्यांसाठी अत्यंत धक्कादायक. क्लेशकारक. सोलापूरच्या सभेत कोल्हापूर, सातारा अन् उस्मानाबादच्या नेत्यांना प्रवेश दिला जातो. व्यासपीठावर मोठ्या सन्मानानं बसविलं जातं; मात्र इथल्या भूमिपुत्रांना या कार्यक्रमापासून पद्धतशीरपणे बाजूला का ठेवलं जातं, हे न ओळखण्याइतपत कार्यकर्ते नक्कीच नसावेत भोळे...    त्यामुळं ‘सत्ताधाऱ्यांचे उंबरठे’ आणखी किती दिवस झिजवायचे, याचा निर्णय घ्यावाच लागेल आता या तिघांना. मात्र या तिघांचीही मानसिकता पुन्हा मातृपक्षाकडे जाण्याची नाहीच. ‘कमळ मिळालं नाही तर हरकत नाही, अपक्ष उभारू; परंतु हात किंवा घड्याळ नको’ या भूमिकेवर म्हणे हे नेते ठाम... कारण यांनी स्वत:च परतीचे दोन कापून टाकलेत. लगाव बत्ती...

खरे निष्ठावंत कोण......मालक की अण्णा ?

   यंदाच्या निवडणुकीत एक नवीनच शब्द अनेक नेत्यांच्या तोंडून ऐकू येतोय. तो म्हणजे ‘सर्व्हे’. तिकीट मागण्यासाठी गेलेल्या प्रत्येकाला ‘वर्षा’ किंवा ‘मातोश्री’वर एवढा एकच शब्द सांगितला जातोय. त्यामुळं इच्छुकांना जळी-स्थळी ‘सर्व्हे’ हाच शब्द दिसू लागलाय. परवा एका स्थानिक नेत्याच्या मुलानं हौसेनं नवीन टू-व्हिलर मागितली तेव्हा त्याला म्हणे पित्यानं शांतपणे सांगितलं,‘थांबऽऽ अगोदर आपण सर्व्हे करू. कुठल्या गाडीची प्रतिमा जनमानसात चांगली आहे. मग निर्णय घेऊ.’ लगाव बत्ती...

  असो. ‘मध्य’मध्येही ‘धनुष्यबाण’वाल्यांनी सर्व्हे केला. या ठिकाणी दोन तगडे इच्छुक. कुमठ्याचे ‘दिलीपमालक’ तर मुरारजीपेठेतले (सॉरीऽऽ विडी घरकुलमधले) ‘महेशअण्णा’. या ठिकाणी गुप्त ‘सर्व्हे’ करणाऱ्या टीमनं लोकांना म्हणे काही प्रश्न विचारले.1. या इच्छुक नेत्यांमध्ये सर्वाधिक निष्ठावान अन् प्रामाणिक कोण ?2. प्रत्येक गोष्टीत जाती-पातीचं राजकारण सर्वाधिक कोण करतं ?3. ठराविक कार्यकर्त्यांच्या गोतावळ्यातच कोण रमतं?4. निवडणूक संपल्यानंतरही सर्वसामान्यांना थेट कोण भेटू शकतं ?5. साध्या-सुध्या कार्यकर्त्यांचे फोनही पटकन् कोण उचलतं ?6. आपल्या संस्थेत आपल्याच पै-पाहुण्यांची भरती कोण करतं ?

   ...आता या सर्व्हेचा रिपोर्ट तयार होऊन नुकताच वरपर्यंत पोहोचलाय. दोन-चार दिवसात जाहीरही होईल इथल्या उमेदवारीचा अंतिम निर्णय. तोपर्यंत शोधत बसायला हरकत नाही, आपण या साऱ्या प्रश्नांची उत्तरं. लगाव बत्ती...

( लेखक 'सोलापूर लोकमत'चे निवासी संपादक आहेत.)

टॅग्स :Solapurसोलापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारण