शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

नाम हे परमात्म्याचे रूप

By admin | Updated: June 5, 2014 08:59 IST

सर्व साधनांत नाम खरोखर सारभूत श्रेष्ठ आहे. हे बोलणे समजत नसेल, तर वेद, शास्त्रे, पुराणे, संतवचने शोधून पाहा, व्यर्थ संशय सोडून शोध घ्यावा.

मोहनबुवा रामदासी

समस्तांमध्ये सार साचार आहे।

कळेना तरी सर्व शोभून पाहें।

जिवा संशयो वाउगा तो त्यजावा।

प्रभाते मनी राम चिंतीत जावा।।

श्लोकार्थ : सर्व साधनांत नाम खरोखर सारभूत श्रेष्ठ आहे. हे बोलणे समजत नसेल, तर वेद, शास्त्रे, पुराणे, संतवचने शोधून पाहा, व्यर्थ संशय सोडून शोध घ्यावा. त्या प्रभुरामचंद्रांचे रोज सुप्रभाती चिंतन करावे. भवसिंधू तरुण जाणेसाठी सर्व उपायांमध्ये रामनाम हेच साचार खरोखर सत्य साधन आहे. हे नीट समजत नसेल, तर बा मना, जरा नीट शोध घे म्हणजे ग्रंथ-ग्रंथातरी नीट विचार करून शोधून पाहा, सद्गुरूला शरण जाऊन त्यांचेकडून समजून घे, म्हणजे कळेल. पण असा काहीच प्रयत्न न करता नामात काय आहे? त्याने काय होणार? अशा निरर्थक संशयात गुरफटून राहू नकोस. संशयाने कल्याण होणार नाही. आयुष्य मात्र फुकट जाईल, असा या श्लोकाचा थोडक्यात मथितार्थ आहे. समर्थ सांगतात ‘रामदास म्हणे सारांचे ही सार। सर्वांसी आधार भक्ती भाव।। नाम हेच पारमार्थिक साधनातील सारभूत साधन आहे. याबद्दल सर्वच संतांची एकवाक्यता आहे, हे नामसाधन सार कसे याचा येथे उलगडा न करता त्याचा जिवा तूच सर्व दृष्टीने विचार करून शोध घे, असे समर्थ सांगतात. नाम चिंतनाचे सामर्थ्य सामान्य मनुष्यास कळत नाही. ग्रंथ वाचून पांडित्य करणार्‍यासही त्याचे महत्त्व कळून तो ते साधन म्हणून आचरणात आणेलच असे नाही. त्याला सद्गुरूकृपा हवी. त्या वाचून ते कळणार नाही. भगवत्नाम, भक्ती, प्रेम ही गूढ रहस्ये आहेत. ती बोलण्याची नाहीत, अनुभवाची आहेत. या गूढ रहस्याचा अनुभव गुरूकृपेवाचून येत नाही. सर्व संतांनी नाम हेच सार का म्हटले? जे कालाच्या मर्यादेत न राहता चिरंतन असते ते सार. उदा. सोने हे सत्य, पण त्याच रूपाने दागिने हे असत्य. तसेच परमात्मा हा सत्य व त्याच्या आधारावर भासमान होणारे नानारूपाने नटलेले जग अशाश्वत. आकाराला आलेल्या दागिन्याची रूपे नष्ट झाली तरी त्या रूपाबरोबर सत्य सोने नष्ट होत नाही, ते राहतेच. माणसांची नावे धारण करणारी अनेक रूपे जन्माला आली. नामानेच त्यांच्या रूपाची ओळख पटली. ती नामे नष्ट झाली तरी नामे मागे कायम आहेतच. मग नाम हे देशकाल मर्यादेपलीकडचे आणि रूपापेक्षाही ते जास्त सत्य म्हणून श्रेष्ठ नाही का? या सत्ला म्हणजे परमात्म्याला काही रूप दिल्याशिवाय त्याचे अनुसंधान ठेवता येत नाही. म्हणून नाम हेच त्याचे रूप होय. भगवंत हा सर्व सृष्टीचा एकच आधार असून, तो अलौकिक चैतन्य घन असल्यामुळे त्याचे नामही आपोआपच भौतिक अत एव सत्य आहे.