शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

नागपुरी कुलगुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 00:57 IST

सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ.मृणालिनी फडणवीस यांची निवड झाल्याने राज्याच्या शिक्षण क्षेत्रात पुन्हा एकदा नागपुरी टॅलेन्टची छाप पडली आहे. कुलगुरुपद आणि नागपूरकर हे समीकरण राज्यातील विद्यापीठात गत १५ वर्षांपासून रुजू लागल्याने कुलगुरुपदाची खाण अशी नागपूरची ओेळख निर्माण होऊ लागली आहे.

सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ.मृणालिनी फडणवीस यांची निवड झाल्याने राज्याच्या शिक्षण क्षेत्रात पुन्हा एकदा नागपुरी टॅलेन्टची छाप पडली आहे. कुलगुरुपद आणि नागपूरकर हे समीकरण राज्यातील विद्यापीठात गत १५ वर्षांपासून रुजू लागल्याने कुलगुरुपदाची खाण अशी नागपूरची ओेळख निर्माण होऊ लागली आहे. कुलगुरुपदाच्या निवडीत पडद्याआड राजकीय लॉबिंग असते या आरोपात नवेपण नसले तरी युतीपूर्वीही आघाडी सरकारमध्ये लॉबिंगची परंपरा होतीच. मात्र यातही नागपुरी टॅलेन्टला कुलगुरुपदाची संधी मिळणे ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. राज्यातील अकृषी विद्यापीठात अलीकडच्या काळात झालेल्या कुलगुरुपदाच्या निवडीत चार नागपूरकरांनी बाजी मारली आहे. मूळचे नागपूरकर असलेले डॉ.सिद्धार्थविनायक काणे हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू झाले. यानंतर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नागपूरकर डॉ.मुरलीधर चांदेकर, मुंबईच्या ‘एसएनडीटी’ विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ.शशिकला वंजारी आणि आता सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठी डॉ.मृणालिनी फडणवीस यांच्या नावाला महामहीम राज्यपाल आणि विद्यापीठाचे कुलपती सी. विद्यासागर राव यांनी पसंती दर्शविली. या चारही कुलगुरुपदाच्या उमेदवारांचा बायोटाडा संघ मुख्यालयातून स्कॅन करून आला असला तरी निवड समित्यांपुढे तो सरस ठरल्याने पुन्हा एकदा नागपुरी टॅलेन्टची मोहर राजभवनात उमटली हे विशेष. आठवडाभरापूर्वी मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठी नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांचे नाव अखेरच्या क्षणापर्यंत आघाडीवर होते. गुणवत्तेत सरस ठरलेल्या येवले यांचे राजकीय गणित बिघडल्याने त्यांची संधी हुकली. मात्र मुंबईतही नागपूरकर भारी ठरल्याने येथे काही काळासाठी का होईना नागपुरी टॅलेन्टचा प्रभाव राहिला. आघाडी सरकारमध्येही कुलगुरुपदाच्या निवडीत नागपुरी टॅलेन्ट सरस ठरले होते. त्या काळात नागपूरकर डॉ. मोहन खेडेकर यांनी अमरावती विद्यापीठाचे कुलगुरुपदी बाजी मारली होती. २०११ मध्ये नागपूरकर डॉ.विजय पांढरीपांडे औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी विराजमान झाले. पांढरीपांडे यांच्यासोबतच मूळचे नागपूरकर डॉ.विलास सपकाळ नागपूर विद्यापीठाचे, डॉ.राजन वेळूकर मुंबई विद्यापीठाचे, डॉ. राजू मानकर लोणेरे (रायगड) येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे तर दिवंगत डॉ.आर कृष्णकुमार यांनी नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरूपद भूषवित नागपुरी टॅलेन्टची छाप सोडली होती. त्यामुळे भविष्यात राज्यातील इतर विद्यापीठात होणाऱ्या कुलगुरुपदाच्या नियुक्त्यातही नागपुरी टॅलेन्ट भारी ठरले तर तो निश्चितच गौरवाचा आणि अभिमानाचा क्षण ठरेल.

टॅग्स :educationशैक्षणिकSolapur University, Solapurसोलापूर विद्यापीठ, सोलापूरnewsबातम्या