शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
3
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
4
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
5
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
6
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
7
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
8
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
9
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
10
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
11
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
12
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
13
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
14
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
15
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
16
जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी सागर चित्रे! उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे; विजयी उमेदवारांचा जल्लोष
17
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
18
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
19
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
20
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 

माझी सत्त्वपरीक्षा

By admin | Updated: December 28, 2016 02:43 IST

एका कार्यक्रमात परिचय करून देताना, सूत्रसंचालकाने सरांना अध्यात्माची फ ार आवड असल्याचे सांगितले़ कार्यक्रम संपताच दोन ग्रामीण महिला भेटीस आल्या.

- डॉ. गोविंद काळे

एका कार्यक्रमात परिचय करून देताना, सूत्रसंचालकाने सरांना अध्यात्माची फ ार आवड असल्याचे सांगितले़ कार्यक्रम संपताच दोन ग्रामीण महिला भेटीस आल्या. म्हणाल्या सर, अध्यात्म म्हणजे काय ते जरा समजावून सांगा ना! माझी ही सत्त्वपरीक्षा होती़ एका कागदावर टिंब काढले़ टिंबाभोवती सुमारे वीस-बावीस वर्तुळे काढली़ त्याखाली लिहिले अध्यात्म़ कागद त्यांच्यापुढे सरकविला़ सर, आम्हाला तर अध्यात्म काहीच कळले नाही़ समजाविले तर फार बरे होईल़ टिंब म्हणजे जीव़ तो एकटाच येतो, पण जन्मल्याक्षणीच त्याच्या भोवती ऋणानुबंधाची वर्तुळे तयार होतात़ ऋणानुबंध नावाच्या मायेला तो कवटाळून घेतो़ तो कोणाचा तरी पुत्र-भाऊ-नातू-पुतण्या असतो़ जीवाचे नामकरण होते. एकेक वर्तुळ वाढतच जाते़ तो समाजाचा होतो, राष्ट्राचा होतो़ त्याला ओळख प्राप्त होते़ हाच आपला परिचय म्हणून तो नवनव्या वर्तुळांमधून फिरत राहतो़ वय वाढते़ वाढत्या वयानुसार त्याला प्रश्न पडतो़ ‘कोऽ हम्’ मी कोण आहे़ त्याचा परतीचा प्रवास सुरू झालेला असतो़ माणसागणिक एकेक वर्तुळ सुटत जाते़ शेवटी तो बिंदूपाशी येऊन थांबतो़‘क्वस्त्वं को ऽ हं कुत आयात:को मे जननी को मे तात:’ असा प्रश्र्न तो स्वत:लाच करतो़ जीवनाच्या जायते- जन्माला येणे, अस्ति- अस्तित्व, वर्धते- वाढ होणे, विपरिणमते- बदल होणे, अपक्षीयते- झीज होणे आणि शेवटची विनश्यति म्हणजे अंत, नष्ट होणे़ यातील पाचवी अवस्था अपक्षीयते म्हणजे झीज तो ती जगत असून अंतिम अवस्थेकडे जीवाची वाटचाल सुरू होते़ अशा वेळी त्याला जीवनाचा नवा साक्षात्कार घडतो़ जीव म्हणतो या दातांनी खूप चर्वण केले आता दात आपली जागा सोडू लागतात़ स्मरणशक्तीची अनेक पारितोषिके पटकावलेला विद्यावाचस्पती म्हणतो की आता काहीच लक्षात राहत नाही़ वारंवार केसांवरून कंगवा फिरवणारा तरुण, वार्धक्यात म्हणतो टक्कल कसे पडले ते कळलेच नाही़ उतारवयातील हा प्रवास पुनश्च बिंदूपाशी येऊन थांबतो़ विनश्यति ही शेवटची एकच अवस्था जीवाची शिल्लक असते़ आपले आयुष्य कसे सरले? फुकट गेले ही भावना तीव्र होऊन जीव सत्याचा शोध घेऊ लागतो़ याचेच नाव ‘अध्यात्म’़ सत्य काही केल्या सापडत नाही़ हजारो वर्षांपूर्वी रचलेल्या उपनिषदातून हेच सत्य मांडले आहे़ हिरण्मयेन पात्रेण सत्यस्याऽपिहितं मुखम् तत्त्वं पूषन् अपावृणु सत्यधर्माय दृष्टये॥ ज्ञानाचा दिवा बाहेर नसतो, तो तर आतच असतो याची पुसट जाणीव अंतकाळी व्हायला लागते़ त्याला वाटते अध्यात्म समजून घ्यावे़ वेळ गेलेली असते़ आयुष्य सरलेले असते़ इंद्रिये बलवान असतानाच अध्यात्माची ज्योत पेटली तर प्रवास सुखाचा-समाधानाचा-शांतीचा होतो़ दोघी महिला हात जोडून म्हणाल्या आम्हाला अध्यात्म कळले़ मी सुटकेचा नि:श्वास टाकला़