शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

संगीताने जुळविले ते...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 00:30 IST

मिरज या सांगलीच्या जोड शहरात मरहूम उस्ताद अब्दुल करीम खाँसाहेब यांची मजार आहे. तिच्या लगत असलेल्या दर्ग्यात देशभरातील हिंदू व मुसलमान गायक दरवर्षी एकत्र येऊन त्या थोर गायकाच्या स्मृतींना आपल्या गायनाची श्रद्धांजली वाहतात. पं. भीमसेनांपासून कुमार गंधर्वांपर्यंत, वसंतराव देशपांडे यांच्यापासून डागर बंधूंपर्यंत आणि आजच्या आघाडीवरील गायकांपर्यंतच्या साऱ्यांनी त्यांची नम्र हजेरी तेथे लावली आहेत.

मिरज या सांगलीच्या जोड शहरात मरहूम उस्ताद अब्दुल करीम खाँसाहेब यांची मजार आहे. तिच्या लगत असलेल्या दर्ग्यात देशभरातील हिंदू व मुसलमान गायक दरवर्षी एकत्र येऊन त्या थोर गायकाच्या स्मृतींना आपल्या गायनाची श्रद्धांजली वाहतात. पं. भीमसेनांपासून कुमार गंधर्वांपर्यंत, वसंतराव देशपांडे यांच्यापासून डागर बंधूंपर्यंत आणि आजच्या आघाडीवरील गायकांपर्यंतच्या साऱ्यांनी त्यांची नम्र हजेरी तेथे लावली आहेत. खाँसाहेबांचे देहावसान १९३७ मध्येच झाले. पण त्यांच्या गायकीचा प्रभाव अजून साºया भारतवर्षावर आहे आणि त्या क्षेत्रातील गुणवंतांसाठी मिरज हे शहर काशी वा मक्का ठरले आहे. गायन वा संगीत ही कानातून मनात उतरणारी आणि माणसांना शब्दावाचून जोडणारी कला आहे. मिरजेत राहणारे हिंदू व मुसलमान परस्परांशी कमालीच्या स्नेहभावाने जुळले आहेत. तंतुवाद्यांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेल्या या शहरातून देशभर देशी व विदेशी तंतुवाद्येही जात असतात. त्याखेरीज व्याख्यानसत्रे, चर्चासत्रे आणि अन्य बौद्धिक व्यासपीठांचीही तेथे गर्दी आहे. एवढे संगीतमय व ज्ञानमय क्षेत्र माणसाला केवळ विनम्र करणारेच नाही तर अंतर्मुख करून मानवधर्मापर्यंत नेणारे आहेत. मात्र राजकारण ही माणसांना जोडणारी बाब नाही. तीत वैर करावे लागत नाही. तीत ते असतेच. त्यातून राजकारणाला धर्मकारणाची वा जातीकारणाची जोड मिळाली की हे वैर धारदार होत असते. अब्दुल करीम खाँसाहेबांच्या पुण्याईने जुळलेल्या या शहरातील मनुष्यधर्माला अशा राजकारणाने आता डागाळले आहे. सर्वधर्मसमभावाचे आणि खºया राष्ट्रीय एकात्मतेचे त्याचे स्वरूप मागे पडून त्याची जागा धार्मिक तेढींनी व जातीय तणावांनी घेतली आहे. तसे करण्यात हिंदुत्ववादी राजकारण्यांएवढेच मुस्लीम कट्टरपंथीयही पुढे आहेत. २०१४ च्या निवडणुकीत मोदींचे राजकारण सत्तेवर आल्यानंतर ही तेढ वाढली आहे. खाँसाहेबांच्या मजारीला वंदन करून परतताना पत्रकारांकडून दबल्या आवाजात कळलेली बाब ही की एवढा काळ स्वत:ला सुरक्षित व मिरजकर मानणारा अल्पसंख्यकांचा वर्ग आता धास्तावल्यासारखा दिसत आहे. साºया देशात वाढीला लागलेले धर्मद्वेषाचे राजकारण जसे याला कारणीभूत आहे तशा काही अतिरेकी वृत्तीच्या लोकांनी या परिसरात घडवून आणलेल्या धार्मिक दंगलीही त्याला कारण ठरल्या आहेत. वास्तविक हा परिसर छ. शाहूंच्या पुरोगामी राजकारणाचा वसा सांगणारा आहे. सांगलीतले पवित्र गणेश मंदिर हा देखील तेथील साºयांच्या श्रद्धेचा विषय आहे. शिवाय या परिसराला देशभक्तीचा लाभलेला वारसाही मोठा आहे. अलीकडच्या काळात वसंतदादा पाटील, पतंगराव कदम, आर.आर. आणि जयंत पाटील यासारख्या वजनदार राजकारणी माणसांचा, सा.रे.पाटील यांच्यासारख्या सहकारातून कृषिक्रांती घडविणाºया समाजनेत्याचा आणि कर्मवीर भाऊराव पाटील व आचार्य जावडेकर यांच्यासारख्या ज्ञानर्षींचा त्यात वावर राहिला आहे. मात्र काम व कला यातून निर्माण होणाºया स्नेहभावाहून जातीधर्माचे राजकारण करणाºयांकडून निर्माण होणाºया द्वेषभावनेची तीव्रता मोठी असते. श्रमातून माणसे जोडणे, त्यांना मनाने जवळ आणणे ही दीर्घकाळच्या परिश्रमाची बाब आहे. मात्र जाती व धर्माच्या जाणिवा कोणत्याही कष्टावाचून जागविता येणाºया आणि फारशी बुद्धिमत्ता नसणाºयांनाही करता येणारे आहेत. आताचे चित्र पाहिले की अब्दुल करीम खाँसाहेबांच्या जादूई सुरांनी एकत्र आणलेला समाज व देशभरातील कलावंतांची संयुक्त कामगिरी राजकारण्यांनी नासवायला सुरुवात केली आहे हे मनात येते. त्याचवेळी आपण हिंदूंच्या थोर नेत्यांची शिकवण जशी मागे टाकली तशी इस्लाममधील बंधुत्वाची प्रेरणाही विस्मरणात घालवली हे खिन्न करणारे वास्तव दु:खी करते. अशावेळी मनात येते, पुन्हा एकवार त्या थोर गायकाचे सूर आकाशात निनादावे आणि खºया देशभक्तांची गाणीही त्यात पाहता यावी. त्यातून माणूस जुळावा आणि ज्यात कुणीही धास्तावले असणार नाही असा समाज पुन्हा उभा राहावा.

टॅग्स :Indian Classical Musicहिंदुस्तानी शास्त्रीय संगीतmusicसंगीतIndiaभारत