शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

लोकलच्या दाराआधी मुंबईचे दार बंद करण्याची गरज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 11:26 IST

Mumbai: शहरे इतकी का सुजली आहेत?माणसे शहरांकडे का धावत आहेत? मुंबईच्या प्रश्नाचे खरे उत्तर दूर खेडेगावांत भकास होत चाललेल्या शेतीत आहे !

- हेरंब कुलकर्णी(शैक्षणिक कार्यकर्ते,  अभ्यासक)

मी नोकरीला लागताना मुलाखत द्यायला मुंबईत गेलो होतो. त्या पहिल्या प्रवासात चप्पल लोकलखाली पडली आणि या शहरात आपले निभणार नाही, असे तेव्हाच जाणवले. पुढे मुंबईत कामानिमित्त जात राहिलो.  लोकलने प्रवास करण्याची वेळ आली की मुंबईकरांविषयी काळजी वाटणे कधीही संपले नाही. एखादा दिवस या गर्दीत घुसणे इतके कठीण, इथली माणसे हे रोज कसे काय करत असतील, याचा अचंबा वाटत राहिला. अजूनही वाटतो.

मी ग्रामीण भागात नोकरी केली. दिवस संपला की १० मिनिटांत घरी पोहोचून चहा प्यायची सोय होती आणि मुंबईत मात्र काम संपल्यावर घरी जाताना पुन्हा दोन तास लोकलमध्ये उभे राहण्याची शिक्षा. महिलांची वेदना तर वेगळीच, गर्दीत धक्के खात प्रवास केल्यावर घरी जाऊन पुन्हा स्वयंपाक आणि कामे...!

दिवसा सोडा, अगदी रात्री अकरा वाजताही मुंबईच्या लोकलमध्ये भीषण चेंगराचेंगरी अनुभवली आहे. एका स्टेशनला उतरू दिले नाही म्हणून पुढच्या स्टेशनपर्यंत जाऊन मागे आलो आहे. विरार लोकल थांबल्यावर अंगावर येणारी गर्दी बघून घाबरून गेलो आहे. लोकलच्या गर्दीत माणसे अतिशय हिंसक होतात. चिडतात, संतापतात; पण मी त्यांचा राग समजून घेतो. त्यातील अगतिकता समजून येते. आमच्यासारखी कधीतरी जाणारी  माणसे इतकी वैतागतात, तर रोज ही माणसे कशी जगतात...

अतिशय चिडलेली, त्रासलेली दिसतात माणसं गर्दीत. मात्र त्यांना तसा भयंकर प्रवास रोज करावा लागतो. रोज जीव काढून लोकल गाठावीच लागते. दुसरा पर्यायच नसतो प्रवासाचा. अक्षरश: एका पायावर उभ्याने प्रवास करणारे लोक दिसले, की  मनात कालवाकालव होते. 

परवाच्या भयानक अपघातानंतर रेल्वेच्या अमानुष व्यवस्थेवर अनेकजण  तुटून पडत आहेत; पण ही गर्दी फक्त लक्षण आहे. दर सेकंदाला जरी लोकल सोडली तरीही ही गर्दी हटणार नाही.

कोणत्याही शहराची माणसे सामावून घेण्याची एक मर्यादा असते; ती किती ताणायची? त्यामुळे लोकलला दारे लावण्यापेक्षा मुंबईला दार लावण्याची गरज आहे. परप्रांतीयांना मुंबईत अटकाव करायचा, की महाराष्ट्रातून येणारे लोंढे थांबवायचे? यावर वाद घालण्यात अर्थ नाही. मुंबईत येणारी गर्दी थांबण्यासाठी काय भूमिका घेणार, हा खरा मुद्दा आहे.खेडी उद्ध्वस्त होत आहेत. शेती भकास झाली आहे. त्यामुळे उत्तर भारत असो की महाराष्ट्र असो; सगळीकडील लोंढे जगायला मोठ्या शहरात शिरतात. केवळ मुंबईच नाही; सगळीच शहरे आज तशीच झाली आहेत. दिल्ली, बंगलोरसारखी शहरे असोत की पुणे असो; रस्त्यावरून चालणे मुश्कील झाले आहे. त्यावर उपाय म्हणून मेट्रो आणल्या जातात; रस्ते, उड्डाणपूल असे महागडे उपाय केले जातात... 

पण हा खरेच मार्ग आहे का? ही शहरे इतकी का सुजली आहेत? सातत्याने माणसे या शहरांकडे का धावत आहेत?  महाराष्ट्राचे नागरीकरण आज ५० टक्क्यांपेक्षा जास्त झाले आहे. १९७१ साली जितकी महाराष्ट्राची लोकसंख्या होती, तितकी लोकसंख्या २०२५ साली महाराष्ट्रातील फक्त शहरांत राहते आहे.

शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी म्हणायचे, शेतीचे प्रश्न सुटत नाहीत, म्हणून आज शहरांत लोंढे जात आहेत. त्यामुळे मुख्य मुद्दा मुंबईतील गर्दीचे व्यवस्थापन हा नाहीच, तर त्याचे उत्तर दूर खेड्यांत असलेल्या शेतीत आहे. उत्तर भारतात ग्रामीण रोजगार निर्मिती व औद्योगिकीकरणात आहे. ग्रामीण भागात रोजगार निर्मिती हेच उत्तर आहे. गर्दी आज सर्वच शहरांत दिसते. सगळीच जिल्ह्याची गावे त्याच रस्त्याने निघाली आहेत. तालुक्याच्या गावांना बायपास काढावे लागत आहेत. बड्या महानगरांच्या जबड्यांत पैसा ओतण्यापेक्षा (किंवा त्याबरोबर असे म्हणू)  खेड्यातील विकासावर लक्ष केंद्रित केले तरच शहरातील गर्दी थांबू शकेल.

रेल्वे प्रशासनात सुधारणा ही तात्पुरती मलमपट्टी झाली. मुंबईत आज येणारी गर्दी कशी रोखायची, हा खरा मुद्दा आहे. शहरातील गर्दी कमी करण्यासाठी कठोर पावले उचलणे, हाच दीर्घकालीन मार्ग असू शकतो. लोकलचे दार बंद करायचे की नाही, यावर वाद घालण्यापेक्षा मुंबईचे दार कसे बंद करायचे, यावर चर्चा व्हायला हवी.     herambkulkarni1971@gmail.com

टॅग्स :Mumbai Localमुंबई लोकलMumbai Suburban Railwayमुंबई उपनगरी रेल्वेMumbaiमुंबई