शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणचे दिवाळे; एकेकाळी देशातील सर्वोत्तम वीजमंडळ म्हणून महाराष्ट्राचा लौकिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2022 07:18 IST

महाराष्ट्रातील तीन कोटींहून अधिक ग्राहकांना वीजपुरवठा करणाऱ्या महावितरण कंपनीचे पुरते दिवाळे काढण्याचा चंग सर्वच राजकीय पक्षांनी बांधलेला आहे. एकेकाळी ...

महाराष्ट्रातील तीन कोटींहून अधिक ग्राहकांना वीजपुरवठा करणाऱ्या महावितरण कंपनीचे पुरते दिवाळे काढण्याचा चंग सर्वच राजकीय पक्षांनी बांधलेला आहे. एकेकाळी देशातील सर्वोत्तम वीजमंडळ म्हणून महाराष्ट्राचा लौकिक होता. त्याचे वेळेवर विभाजन केले नाही. केल्यानंतर त्या महावितरण कंपनीला ताकद दिली नाही. आलटून पालटून सत्तेवर येणाऱ्या सर्वच राजकीय पक्षांच्या सरकारने कधी शेतकरी हिताचा, तर कधी घरगुती ग्राहक हिताचा पुळका घेऊन महावितरण कंपनीलाच अडचणीत आणण्याचे राजकारण केले.

विधानसभेत परवा पक्षीय भेदाभेद बाजूला ठेवून सारे जण महावितरणवर तोंडसुख घेत होते. सर्व नाटके करता येतील, पण पैशाचे नाटक कसे करणार? काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार सत्तेवरून गेले तेव्हा महावितरणची थकबाकी १४ हजार कोटी रुपये होती. भाजपचे सरकार आले आणि नव्या ऊर्जामंत्र्यांनी शेतकऱ्यांकडे विजेची थकबाकी असली तरी कनेक्शन तोडणार नाही, अशी घोषणा केली. महावितरणची वसुली थांबली. भाजप सरकार सत्तेवरून पायउतार होत असताना १४ हजार कोटी रुपयांची थकबाकी ५४ हजार कोटींवर गेली. चाळीस हजार कोटींची भर घालून पुन्हा थकबाकी असू द्या, पण शेतकऱ्यांची वीज तोडू नका, असे ओरडून भाजपचे नेते सांगत होते.

शेतकऱ्यांना दिलासा द्यायला हवा, पण विजेचे पैसे कोणी भरायचे? थकबाकी असताना महावितरण चालवायचे कसे, याचे उत्तर महाराष्ट्रात तमाम राजकीय पक्षांच्या नेत्यांनी जनतेला द्यावे. अशा प्रकारच्या व्यवहाराने महावितरण कंपनी चालणार आहे का? महावितरणची थकबाकी ६४ हजार कोटी रुपयांवर गेली आहे. महाआघाडीचे सरकार सत्तेवर आल्यापासून दाेन वर्षांत दहा हजार कोटी रुपयांची भर पडली आहे. शेतकऱ्यांनी विजेचे पैसे दिले नाही तरी वीजपुरवठा खंडित करायचा नसेल, तर राज्य सरकारने किंवा केंद्र सरकारने आपल्या तिजोरीतून ही थकबाकी भागवावी. स्थानिक स्वराज्य संस्था (ग्रामपंचायती ते महापालिकांपर्यंत) पथदिवे आणि पाणीपुरवठ्यासाठी विजेचा वापर करते, ती थकबाकी नऊ हजार अकरा कोटी रुपयांवर गेली आहे. या सर्व संस्थांवर सरकारचे नियंत्रण असते.

सरकारी अधिकारी तेथे प्रशासक असतात. या संस्था जो महसूल गोळा करतात, त्यातून विजेचे बिल आधी बाजूला काढून महावितरणला द्यावे, असा आदेश देण्याचा आग्रह आमदार का धरीत नाहीत? सर्वच राजकीय पक्षांच्या आमदारांच्या मागणीच्या दबावाखाली येऊन शेतकऱ्यांच्या थकीत वीजबिलानंतरही पुढील तीन महिने वीजतोडणी करायची नाही, ज्यांची वीजतोडणी केली आहे, ती पण पूर्ववत जोडून द्यायची, असा निर्णय ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी देऊन टाकला आहे. शेतीला लागणाऱ्या विजेचे पैसे देऊ शकत नसतील तर त्याची कारणे शोधून काढावीत. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणाऱ्या वायद्याचे २०२२ हे वर्ष आहे. कारण तसे आश्वासन दिले होते. महावितरणचे अधिकारी सांगत होते की, विजेचे पैसे न भरणाऱ्यांची वीज कायमस्वरूपी खंडित केली आहे. त्यांच्याकडे ६ हजार ४२३ कोटी रुपये थकीत आहेत. शेतकऱ्यांकडे ४४ हजार ९२० कोटी रुपये थकीत आहेत. काही शेतकऱ्यांनी गेल्या पाच वर्षांत एक पैसाही महावितरणला दिलेला नाही. अशाने एका मोठ्या महावितरण कंपनीचे दिवाळे निघणार आहे. ज्या आमदारांनी ऊर्जामंत्र्यांवर हल्लाबोल केला आणि थकबाकी असतानाही वीजतोडणीस विरोध केला, त्यांनी आपल्या मतदारसंघातील थकबाकीच्या वसुलीची जबाबदारी स्वीकारावी.

आज खासगीकरणाचा आग्रह सर्वच क्षेत्रांत धरतात. गावोगावी, वाड्यावस्त्यांवर आणि शेतकरीवर्गाला थकबाकी असतानाही वीजपुरवठा कोणती खासगी वितरण कंपनी करणार आहे? मुंबई-ठाण्यासारख्या शहरातील विजेच्या वितरणाचे खासगीकरण झाले आहे. नंदुरबार, गडचिरोली किंवा नांदेडच्या किनवट या ग्रामीण टोकापर्यंत वीजपुरवठा करण्याची जबाबदारी घ्यायला कोणी खासगी कंपनीवाले पुढे येतील का? हा धोका वेळीच ओळखून महावितरण कंपनी अधिक कार्यक्षम कशी होईल याचा विचार गांभीर्याने करायला हवा. शेतकऱ्यांना माफक, मुबलक आणि नियमित वीजपुरवठा करायला हवा. मात्र, त्याचे पैसे त्यांनी भरावेच, त्यांना शक्य नसेल तर सरकारने ती जबाबदारी स्वीकारावी. थकीत कर्जे माफ करताना संबंधित वित्तीय संस्थांना सरकार पैसा देते, कर्जमाफी म्हणजे कोणीच कोणाचे देणे लागत नाही, असे जाहीर करणे नव्हे. तेव्हा महावितरणला दिवाळखोरीत काढू नका!

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीज