शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
2
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
3
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
4
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
5
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
6
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
7
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
8
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
9
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
10
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
11
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
12
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
13
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
14
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
15
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
16
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
17
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
18
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
19
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
20
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात

मोर्णा की बात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 12:50 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी त्यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात अकोला शहरातील मोर्णा नदी स्वच्छता अभियानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. जगभरातील विभिन्न संस्कृतींची मुहूर्तमेढ नद्यांच्या काठीच रोवल्या गेली. मनुष्य जातीच्या पालनपोषणात नद्यांनी खूप मोठी भूमिका अदा केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी त्यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात अकोला शहरातील मोर्णा नदी स्वच्छता अभियानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. जगभरातील विभिन्न संस्कृतींची मुहूर्तमेढ नद्यांच्या काठीच रोवल्या गेली. मनुष्य जातीच्या पालनपोषणात नद्यांनी खूप मोठी भूमिका अदा केली आहे. त्यामुळेच नद्यांना जीवनदायिनी म्हणून संबोधले जाते. भारतीय संस्कृतीत तर नद्यांना मातेचा दर्जा देण्यात आला आहे; पण दुर्दैवाने तो केवळ संबोधनापुरताच उरला आहे. प्रत्यक्षात आम्ही नद्यांची एवढी अवहेलना केली आहे, की त्यांना अक्षरश: गटारांचे स्वरूप प्राप्त झाले आहे. जिथे गंगेसारख्या नदीची आम्ही पुरती वासलात लावली आहे, तिथे मोर्णेचा काय पाड? काही वर्षांपूर्वीपर्यंत मोर्णा बारमाही होती. तत्कालीन ब्रिटिश अधिकाºयांनी अकोल्यात मोर्णेवर बंधारा बांधून जलतरण आणि नौकानयनाची सुविधा करून घेतली होती. याचा अर्थ त्या काळी मोर्णा नक्कीच एवढी स्वच्छ होती, की ती ब्रिटिशांसाठी एक विरंगुळ्याचे ठिकाण बनली होती. त्याच मोर्णेच्या काठी आज नाकाला रुमाल लावल्याशिवाय उभे राहता येत नाही, एवढी ती घाणेरडी झाली आहे. अकोल्याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या पुढाकाराने आता लोकसहभागातून मोर्णेच्या स्वच्छतेसाठी अभियान सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यात नदीत बोकाळलेली जलकुंभी हटविण्याचे काम सुरू आहे. पुढे नदीत वाहत येणाºया शहरातील गटारांना प्रतिबंध घालून, दोन्ही तिरांचे सौंदर्यीकरण करण्याचा घाट घालण्यात आला आहे. मनोदय निश्चितपणे चांगला आहे; पण तो शेवटावर जाणार का, हा खरा प्रश्न आहे. आम्ही भारतीय आरंभशूर आहोत. कोणत्याही कामास हिरीरीने प्रारंभ करायचा आणि ते शेवटास मात्र न्यायचे नाही, हे आमचे व्यवच्छेदक लक्षण आहे. मोर्णा स्वच्छता अभियानाचे तसे होऊ नये, ही प्रत्येक जागरूक अकोलेकराची इच्छा आहे. वस्तुत: शहराच्या मधोमध वाहणारी नदी ही शहराचे वैभव असते. युरोपातील कोणत्याही शहरातून वाहणाºया नदीकडे बघितल्यास त्याची प्रचिती येते; पण त्यासाठी नदीला नदीच ठेवावे लागते, तिचे गटार होऊ देऊन चालत नाही. दुर्दैवाने आमच्या दृष्टीने शहरातून वाहणारी नदी ही घाण, कचरा वाहून नेण्यासाठी निसर्गाने बहाल केलेली सोय आहे. जोपर्यंत ही मानसिकता बदलण्यात यश येणार नाही, तोपर्यंत कितीही स्वच्छता अभियाने राबविली तरी नद्या स्वच्छ होऊ शकणार नाहीत. जर नद्यांमध्ये गटारे सोडून देणे आणि कचरा टाकणे बंद केले, तर कोणतीही नदी तिच्या स्वच्छतेची काळजी स्वत:च घेते. प्रत्येक नागरिकाने हे ध्यानी घेतले, तर नद्यांच्या स्वच्छतेसाठी अभियानांची गरजच भासणार नाही.

टॅग्स :Morna Riverमोरणा नदीMorna Swachata Missionमोरणा स्वछता मोहीमMan ki Baatमन की बातNarendra Modiनरेंद्र मोदी