शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

आशानिराशेचे खेळ

By admin | Updated: August 19, 2016 04:19 IST

रिओ आॅलिम्पिकची सांगता होण्यास आता केवळ दोन दिवस शिल्लक आहेत. आतापर्यंत सत्तरपेक्षा जास्त देशांनी पदकतालिकेत स्थान मिळविले आहे. त्यात काही इटुकल्या

रिओ आॅलिम्पिकची सांगता होण्यास आता केवळ दोन दिवस शिल्लक आहेत. आतापर्यंत सत्तरपेक्षा जास्त देशांनी पदकतालिकेत स्थान मिळविले आहे. त्यात काही इटुकल्या-पिटुकल्या देशांचाही समावेश आहे. भारताचा शेजारी चीन यावेळी काहीसा माघारला असला तरी, पदक तालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि दुसऱ्या क्रमांकासाठी ब्रिटनला कडवी लढत देत आहे. कोट्यवधी भारतीयांच्या मनात दाटत असलेल्या निराशेवर नाही म्हणायला साक्षी मलिकने महिलांच्या कुस्ती स्पर्धेत कांस्य पदक का होईना जिंकून फुंकर मारली आहे, इतकेच. एरवी भारतासाठी रिओतून मैदानातील धवल कामगिरीऐवजी मैदानाबाहेरील वादांच्याच बातम्या जास्त येत असताना, चीन संदर्भात आलेली एक बातमी मात्र तमाम भारतीयांना अचंबीत करणारी आहे. टेबल टेनिसमधील महिलांच्या सांघिक प्रकारातील अंतिम सामना संपण्यापूर्वीच, चीनच्या मुख्य प्रशिक्षकाने त्याच्या सहकारी प्रशिक्षकासोबत चार वर्षांनंतर होऊ घातलेल्या टोक्यो आॅलिम्पिकसाठीच्या तयारीची चर्चा सुरू केली आहे! क्षेत्रफळ, लोकसंख्या, अर्थव्यवस्थेचा आकार इत्यादी मापदंडांच्या आधारे जगातील दहा बड्या देशांमध्ये गणना होणारा भारत मात्र क्रीडा क्षेत्रात तळाशी का, या प्रश्नाचे उत्तर ही बातमी देते. जागतिक पातळीवर ठसा उमटवण्यासाठी अशी क्रीडा संस्कृती आवश्यक असते. आधुनिक आॅलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात १८९६ मधील पहिली आणि नंतर १९०४, १९०८ व १९१२ मधील स्पर्धांचा अपवाद वगळता, प्रत्येक आॅलिम्पिकमध्ये भारत सहभागी झाला आहे; पण पदकांच्या बाबतीत निरपेक्ष वृत्तीचाच कित्ता गिरवित आला आहे. सर्वोच्च कामगिरी म्हणजे गेल्या आॅलिम्पिकमधील सहा पदके! या उलट चीनचे आॅलिम्पिकमध्ये पदार्पण झाले ते १९५२ मध्ये! त्यानंतर तैवानला स्थान देण्याच्या मुद्यावरून चीनने आॅलिम्पिकवर बहिष्कार घातला तो पार १९८० पर्यंत! आॅलिम्पिक पदार्पणात अवघे एक पदक मिळविलेल्या चीनने १९८४ मध्ये थेट ३२ पदके मिळवित तालिकेत चौथा क्रमांक पटकावला व २००८च्या बीजिंग स्पर्धेत १०० पदके मिळवून पहिल्या क्रमांकालाच गवसणी घातली! चीनच्या या यशामागील रहस्य आहे, ते त्या देशाने उभ्या केलेल्या पायाभूत सुविधांमध्ये व रुजविलेल्या क्रीडा संस्कृतीमध्ये! भारतात ना धड पायाभूत सुविधा, ना निखळ गुणवत्तेला प्राधान्य! जोवर हे चित्र बदलत नाही, तोवर आशानिराशेचा खेळ असाच चालत राहाणार!