शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

‘मोका’ व ‘मोक्का’

By admin | Updated: October 22, 2015 03:11 IST

देवेन्द्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये सामील होण्याचा आणि अन्न व नागरी पुरवठा खात्यासारखे महत्वाचे खाते सांभाळण्याचा ‘मोका’ गिरीश बापट यांना अगदी सहजगत्या प्राप्त झाल्याने

देवेन्द्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये सामील होण्याचा आणि अन्न व नागरी पुरवठा खात्यासारखे महत्वाचे खाते सांभाळण्याचा ‘मोका’ गिरीश बापट यांना अगदी सहजगत्या प्राप्त झाल्याने आपणास प्राप्त मोक्यासारखाच राज्य सरकारने कोणे एकेकाळी संमत करुन अंमलात आणलेला ‘मोक्का’सुद्धा (संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा) अगदी सहजी कोणालाही व कधीही लावता येऊ शकतो असा काही (गैर) समज त्यांच्या मनात उत्पन्न झाला असावा. त्यामुळेच की काय डाळींची आणि विशेषत: तुरीच्या डाळीची जी अभूतपूर्व टंचाई देशभर निर्माण झाली आहे, तिची साठेबाजी व काळाबाजार करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध मोक्का लावण्याची घोषणा त्यांनी केली असावी. याआधी त्यांनी नाशिक जिल्ह्यातील तहसीलदारांविरुद्धही याच कायद्याचा वापर करण्याची पोकळ घोषणा केली होती. संबधित कायद्याचे अगदी पहिलेच कलम असे सांगते की ज्या व्यक्तींविरुद्ध किमान तीन वेळा गुन्हे दाखल केले गेले आहेत व त्यातील प्रत्येक गुन्ह्याकरिता किमान तीन वर्षांच्या कारावासाची तरतूद कायद्याने केली आहे, अशाच लोकांविरुद्ध मोका अंतर्गत कारवाई केली जाऊ शकते. परंतु मंत्री बापट पूर्णपणे जबाबदारीने बोलत असल्याचे मान्य केल्यास ते ज्यांच्याविरुद्ध अशी कठोर कारवाई करु इच्छितात ते नक्कीच मोठे बदमाष व्यापारी असले पाहिजेत. त्यांची अशी बदमाषी आजवर कोणी खपवून घेतली आणि त्यांच्याविरुद्ध तीन-तीन गुन्हे दाखल होऊनही कारवाई का झाली नाही व ती कोणी टाळली याचाही शोध आता त्यांना गृह खात्यामार्फत घ्यावा लागेल. गिरीशभाऊंनी डाळीच्या व्यापाऱ्यांविरुद्ध जसे अस्त्र उचलले आहे तसेच ते ‘मॅगी’च्या विरोधातही उचलले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशावरुन मॅगीची देशभरातील तीन विभिन्न प्रयोगशाळांनी तपासणी केल्यानंतर व त्यांचा अहवाल मॅगीस अनुकूल आल्यानंतर न्यायालयाने या उत्पादनावरील बंदी उठविली असली तरी बापट यांना ते मान्य नसल्याने ते आता सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहेत. परंतु रामदेव बाबांच्या मॅगीसाठी ते असे करणार असल्याचे मात्र कोणी मनात आणू नये.