शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मोदींच्या आघाडीतील अस्वस्थता

By admin | Updated: February 20, 2016 02:33 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सत्तारूढ राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील कुरबुरी जुन्याच असल्या तरी त्यांना आता जास्तीचे धारदार व काटेरी स्वरूप आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सत्तारूढ राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील कुरबुरी जुन्याच असल्या तरी त्यांना आता जास्तीचे धारदार व काटेरी स्वरूप आले आहे. आपला पक्ष २८२ खासदारांसह स्वबळावर बहुमतात आहे याचा भाजपाच्या काही पुढाऱ्यांना वाटणारा अभिमान उन्मादाच्या पातळीवर उंचावल्यामुळे आजवर दबल्या आवाजात केल्या जाणाऱ्या आघाडीतील तक्रारी आता उघड्यावर आल्या आहेत. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन पुढील सप्ताहात सुरू व्हायचे आहे. त्या सुमाराला या तक्रारी जाहीर होणे भाजपा व पंतप्रधान या दोघांसाठीही अडचणीचे ठरणार आहे. भाजपाचे अध्यक्ष अमीत शहा यांनी आघाडीतील नाराज पक्षांची एक बैठक नुकतीच घेऊन त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. या बैठकीत चव्हाट्यावर आलेले मामले जुने असले तरी त्यामागचा तक्रारकर्त्यांचा संताप मोठा असल्याचे आढळले आहे. भाजपा व तिचे नेतृत्व हिंदुत्वाचा आग्रह धरत असल्यामुळे देशातील इतर धर्माचे लोक सरकारवर रुष्ट आहेत अशी तक्रार या बैठकीत अकाली दलाच्या नेत्यांनी केले. अकाली दल आणि भाजपा यांची मैत्री, भाजपाच्या जुन्या जनसंघावतारापासून राहिली आहे आणि तिच्यात कधी खंड पडला नाही. मात्र पंजाबातील शीख समाजाच्या पाठिंब्यावर अकाली दलाची सारी भिस्त असल्यामुळे व त्या समाजालाही भाजपाच्या हिंदुत्वाच्या आग्रहाचे चटके बसू लागले असल्यामुळे तेथील शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीसकट सारा अकाली वर्ग अस्वस्थ झाला आहे. वास्तव हे की या अकाल्यांनी आणि त्यांच्या शिगुप्रसने इंदिरा गांधी व जनरल वैद्य यांचे खून करणाऱ्या गुन्हेगारांना धर्मात्मे म्हणून गौरविले आहे. त्यांना सरोपे देऊन त्यांचे जाहीर सत्कार केले आहे. कोणत्याही राष्ट्रीय पक्षाने अशा पक्षासोबत असलेले आपले संबंध त्यामुळे कधीच तोडले असते. पण भाजपाच्या धर्मग्रस्त राजकारणाला अकाल्यांची धर्मांधता भावत असल्याने आणि त्या दोहोंचा काँग्रेसविरोध त्यांच्या धर्मांधतेएवढाच जोरकस असल्यामुळे त्यांची युती टिकली आहे. मात्र आताचे पंजाबचे राजकारण बदलले आहे. बादल पिता-पुत्रांचे सरकार त्यांच्या भ्रष्ट राजवटीमुळे जेवढे बदनाम झाले तेवढेच बादल कुटुंबाने गेल्या दहा वर्षात जमविलेल्या अमाप संपत्तीमुळेही लोकांच्या मनातून उतरले आहे. काँग्रेसने कॅप्टन अमरिंदर सिंग यांना येत्या निवडणुकीत आपला पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून पुढे केले असल्याने (या अमरिंदरसिंगांनीच अमृतसरच्या लोकसभा क्षेत्रात अरुण जेटलींचा पराभव केला आहे) अकाल्यांना आपला परंपरागत मतदार टिकवून राहण्याची घाई झाली आहे. त्यातून ‘तुमचे हिंदुत्व जरा आवरा’ असा अहेर त्यांनी भाजपाला केला आहे. शिवसेना हा प्रकृतीनेच नाराज असलेला पक्ष आहे. त्याला केंद्रात एक व महाराष्ट्रात चार बिनकामी मंत्रीपदे भाजपाने दिल्याने त्याच्या नाराजीचा पारा वाढला आहे. तुम्ही आम्हाला योग्य ती वागणूक देत नाही, आमचा सन्मान राखत नाहीत आणि आमच्या तक्रारी ऐकून घेत नाहीत अशा बाबी या पक्षाने त्या बैठकीत पुढे आणल्या. त्याची खरी मागणी महत्त्वाच्या मंत्रीपदाची आहे आणि भाजपावाले तिला भीक घालायला जराही राजी नाहीत हे त्याच्या संतापाचे खरे कारण. रिपब्लिकन पक्षाचे रामदास आठवले हा सदैव अस्वस्थ असलेला आणि मंत्रीपदावाचून तळमळणारा पुढारी आहे. त्याने या बैठकीत आपली खरी व्यथा न सांगता रोहीत वेमुलाच्या आत्महत्त्येने रालोआला आणलेली अवकळा बैठकीत सांगितली. या प्रश्नावर आपल्याला व सरकारला जनतेत बोलायला तोंड राहिले नाही असे त्यांचे म्हणणे पडले. आठवल्यांचे खरे दु:ख ठाऊक असलेली भाजपा त्यांच्याविषयी फारशी गंभीर असणार नाही हे उघड आहे. मात्र अशाच तक्रारी दक्षिणेतील तेलगु देसम व इतर पक्षांनी केल्यामुळे रालोआचे नेते चिंतातूर झाले आहेत. दिल्ली व बिहारमध्ये दारुण पराभव होणे, अर्थव्यवस्थेचे जमीनदोस्त होणे, सत्ताधाऱ्यातील एका गटाचा धर्मांधळेपणा वाढत जाणे आणि येत्या काही काळात केरळ, तामिळनाडू, बंगाल व उत्तरप्रदेश या राज्यात विधानसभांच्या निवडणुका होणार असणे याही गोष्टी भाजपाच्या पुढाऱ्यांएवढ्याच त्यांच्या आघाडीत सामील झालेल्या पक्षांच्याही चिंतेचा विषय बनल्या आहेत. त्यातच आता उत्तरप्रदेशच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपाने राम मंदिराचे घोडे पुढे दामटले आहे. त्याचा आपल्याला कोणताही लाभ व्हायचा नाही हे तिच्या मित्रपक्षांना चांगले ठाऊक आहे. जनतेतील भाजपाविषयीचा आरंभीचा उत्साह ओसरला आहे आणि मोदींनी देशाची सूत्रे हाती घेतली तेव्हापेक्षाही आताची आर्थिक स्थिती वाईट व डळमळती आहे. या साऱ्याला मोदींचा पक्ष जबाबदार असला तरी रालोआमुळे आपणही त्याच्यासोबत भरडले जावू या भीतीने मित्रपक्षांना ग्रासले आहे. ही स्थिती सावरायला अमित शाह यांची राजनीती कितपत पुरेशी पडेल याविषयी त्या पक्षांएवढेच त्यांचे मतदारही अस्वस्थ आहेत.