शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
3
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
4
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
5
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
6
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
7
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
8
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
9
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
10
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
11
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
12
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
13
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
14
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
15
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
16
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
17
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
18
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
19
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
20
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना

मोदींची मतपेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 02:43 IST

वर्षभरावर येऊन ठेपलेली लोकसभा तसेच राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड आदी राज्यांत येऊ घातलेल्या निवडणुकांच्या तोंडावर खरीप हंगामातील प्रमुख १४ पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना खूश करण्याचा प्रयत्न केला आहे.

वर्षभरावर येऊन ठेपलेली लोकसभा तसेच राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड आदी राज्यांत येऊ घातलेल्या निवडणुकांच्या तोंडावर खरीप हंगामातील प्रमुख १४ पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना खूश करण्याचा प्रयत्न केला आहे. चालू खरीप आणि आगामी निवडणूक हंगामाचा नेमका मुहूर्त साधून केलेली ही एकाअर्थी मतपेरणीच आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये. आता वर्षभर त्यास किती आणि कसे खतपाणी मिळते, तृणवाढीचा कसा बंदोबस्त केला जातो आणि जातीय, सामाजिक वा राजकीय वारावादळातून या पिकांचे कसे संरक्षण केले जाते, यावर त्याचा उतारा अवलंबून असेल. सरकारने जाहीर केलेल्या हमीभावामागे राजकीय हेतू नाही, असे काहींना वाटू शकते. परंतु यानिमित्ताने मोदी यांनी विरोधकांच्या हातून एक महत्त्वाचा राजकीय मुद्दाच काढून घेतला आहे. शेतकºयांच्या नावे देशव्यापी आंदोलन उभारण्याची तयारी सुरू असताना नेमक्यावेळी हमीभावाचा निर्णय जाहीर करून मोदींनी विरोधकांवर कुरघोडी केली आहे. वस्तुत: स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची वकालत करून सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने सत्तेवर येताच या शिफरशी व्यवहार्य नसल्याचे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात सादर केल्याने या सरकारविषयी शेतकºयांच्या मनात कमालीचा रोष आहे आणि या रोषाला विरोधकांनी मुबलक खतपाणी घातल्याने भाजपाला त्याचा फटका गुजरात, उत्तर प्रदेश पाठोपाठ कर्नाटकातही बसला. त्यामुळे या वर्गाला सुखावणारा निर्णय घेण्याशिवाय गत्यंतर नव्हते. तसा तो बुधवारी घेतला गेला. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आधारभूत किमतीवर उमटलेल्या राजकीय प्रतिक्रियांकडे दुर्लक्ष केले तर हा निर्णय शेतीविषयक धोरण म्हणून स्वागतार्ह असाच आहे. कारण आजवर कृषी मूल्य आयोग हमीभाव ठरवताना फक्त बियाणे, खते, मजुरी आणि अन्य सामुग्री आदीचा विचार करून उत्पादन खर्च काढत असे. मात्र यंदा प्रथमच कुटुंब सदस्यांच्या श्रमाचा विचार (एफएल) केला गेला आहे. त्यामुळे नवा हमीभाव उत्पादन खर्च अधिक कुटुंबाची मजुरी, अशा सूत्रावर आधारित आहे. स्वामीनाथन समितीने जमिनीची किमतही हमीभाव ठरवताना गृहित धरली जावी, अशी शिफारस केली होती. मात्र सरकारने ती मान्य केलेली दिसत नाही. हमीभावाच्या सूत्रात झालेला हा बदल दूरगामी आणि जमीन कसणाºया कुटुंबाच्या श्रमाचे मोल जोखणारा आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नव्या हमीभावाचा राज्यनिहाय विचार केला तर या निर्णयाचा सर्वाधिक लाभ पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार या गहू, तांदूळ, मका पिकविणाºया राज्यातील शेतकºयांना होऊ शकेल. कारण अन्न महामंडळाच्या माध्यमातून प्रामुख्याने याच धान्यांची खरेदी केली जाते. महाराष्टÑ, कर्नाटक आणि आंध्र या आत्महत्याप्रवण राज्यातील शेतकरी ज्वारी, बाजरी, भुईमूग, कापूस, सोयाबीन, उडीद, मूग आणि तुरीचे उत्पादन घेतात. मात्र त्याच्या खरेदीची यंत्रणाच सरकारांकडे नाही. त्यामुळे गतवर्षीच्या हंगामातील लाखो क्विंटल तूर खरेदीविना पडून आहे. सरकारकडे पुरेशी साठवण क्षमता आणि खरेदी यंत्रणा नसल्याचा फायदा व्यापारी उठवतात आणि हमीभावापेक्षा कमी दराने धान्य खरेदी करून मोकळे होतात. वास्तविक, हा गुन्हा असताना तो केल्याबद्दल आजवर एकाही व्यापाºयावर कारवाई झालेली नाही. त्यामुळे केवळ आधारभूत किमती वाढवून सरकारचे इतिकर्तव्य संपत नाही. शेतकºयांच्या फसवणुकीचे सगळे मार्ग बंद केले पाहिजेत आणि शेतमालाच्या आयात-निर्यात धोरणात सातत्य राखले गेले पाहिजे. सरकारने जाहीर केलेला नवा हमीभाव जेव्हा पदरात पडेल तेव्हा तो खरंच सुदिन असेल!

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी