शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

मोदींचा द्रविडी प्राणायाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 04:01 IST

तामिळनाडूमधील लोकांना आपल्या द्रविडी संस्कृतीचा अतिशय अभिमान आहे. तेथील द्रविडी चळवळीमुळे तिथे राष्ट्रीय पक्ष फारसे रुजलेच नाहीत. द्रमुक आणि अण्णा द्रमुक यातच कायम तामिळनाडूतील राजकारण सुरू राहिले

तामिळनाडूमधील लोकांना आपल्या द्रविडी संस्कृतीचा अतिशय अभिमान आहे. तेथील द्रविडी चळवळीमुळे तिथे राष्ट्रीय पक्ष फारसे रुजलेच नाहीत. द्रमुक आणि अण्णा द्रमुक यातच कायम तामिळनाडूतील राजकारण सुरू राहिले. काही काळ तिथे काँग्रेसची सत्ता होती, हे खरे. पण तेव्हा काँग्रेसचे तेथील नेतृत्व द्रविडी चळवळीला प्रोत्साहन देणारेच होते. नंतर मात्र द्रमुकच्या कधी या तर कधी त्या गटाशी समझोता करूनच काँग्रेसने वाढण्याचा प्रयत्न केला. भारतीय जनता पार्टी वा त्याआधी जनसंघ यांना तिथे कधीच पाय रोवता आलेले नाहीत. गेल्या काही वर्षांत भाजपाने तामिळनाडूमध्ये सारी ताकद लावली खरी. पण त्याची फळे पक्षाला निवडणुकीत कधीच मिळाली नाहीत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी द्रमुकचे सर्वेसर्वा करुणानिधी यांची जी भेट घेतली, त्याकडे पाहायला हवे. करुणानिधी यांनी नव्वदी ओलांडली आहे. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करायला पंतप्रधान गेले होते, असे सांगितले जाईल. पण मोदी सहजपणे कोणती कृती करतील, यावर कोणाचाच विश्वास बसत नाही. जयललिता यांच्या निधनानंतर अण्णा द्रमुकच्या एका गटाला ते सतत जवळ करीत राहिले. या दोन्ही गटांना एकत्र आणण्याचा मोदी यांचा प्रयत्न यशस्वी झाला. त्यानंतर पनीरसेल्वम आणि पलानीस्वामी या दोघांनी मोदी यांच्या वारंवार भेटी घेऊन, मान तुकवण्याचे संकेत दिले. त्यासाठी त्यांनी शशिकला यांनाही पक्षातून दूर केले. म्हणजे तामिळनाडूतील सत्ताधारी पक्षाने मोदी व पर्यायाने भाजपाच्या विरोधात न जाण्याचाच पवित्रा घेतला. तरीही मोदी यांनी चेन्नईमध्ये करुणानिधी यांची भेट घेण्याचे एकमेव कारण म्हणजे तामिळनाडूतील राजकारण बदलत आहे, अण्णा द्रमुकविरोधात वातावरण तयार होत आहे, हे त्यांच्या लक्षात आले असावे. अशा स्थितीत द्रमुकने काँग्रेससमवेत जाऊ नये, असा त्यांचा प्रयत्न आहे. दोन्ही तामिळी पक्ष आपल्यासमवेत असावेत आणि जो फायदेशीर ठरेल, त्याचा उपयोग करून द्रविडी राज्यात पक्षाला पाय रोवता यावेत, असे मोदी यांचेही द्रविडी राजकारण दिसत आहे. कमल हासन अण्णा द्रमुकच्या विरोधात आहेत. पण ते भाजपाच्याही विरोधात आहेत. अण्णा द्रमुकबद्दल नाराजी असलेल्या रजनीकांत यांनाही भाजपाने खूप चुचकारले. पण द्रविडी संस्कृतीच्या भाषेखेरीज काहीच न चालणाºया राज्यात भाजपाला उघड पाठिंबा द्यायला तेही बिचकत आहेत. अशावेळी अण्णा द्रमुकला विरोध होत असेल, तर भाजपला द्रमुकसारखा पर्याय हाताशी हवा असणार. द्रमुकच्या भ्रष्टाचाराचे आरोप असणाºया नेत्यांवर कारवाई न करण्याचे आश्वासन मिळाल्यास करुणानिधी आणि त्यांचे पुत्र स्टॅलिन सहजच मोदींना मैत्रीचा हात देऊ शकतात. निवडणुकांना बराच वेळ असला तरी पाळेमुळे न रुजलेल्या भाजपाला आतापासूनच तयारीची गरज आहे. प्रत्यक्षात निवडणुकांच्या वेळी वातावरण पाहूनच भाजपा निर्णय घेईल. त्यात काही चुकीचेही नाही. दुसरीकडे अनेक वर्षे काँग्रेसला साथ देणाºया व केंद्रात मंत्रिपदे मिळवणाºया द्रमुकलाही आता काँग्रेसकडून फारसा लाभ होणार नाही, हे कळून चुकले आहे. प्रादेशिक पक्ष नेहमीच केंद्रातील सत्ताधारी पक्षाशी जुळवून घेत असतात. अण्णा द्रमुकऐवजी भाजपा आपल्याशी मैत्री करणार असेल, तर करुणानिधी यांच्या पक्षाला ते हवेच आहे. द्रविडी चळवळीची भाषा करणारे दोन्ही द्रमुकचे नेते प्रत्यक्षात ती चळवळ विसरून गेले आहेत आणि ते विधिनिषेधशून्य राजकारण करीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला या द्राविडी प्राणायामाचा प्रत्यक्षात किती उपयोग होतो, हे भविष्यात स्पष्ट होईल.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा