शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
3
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
4
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
5
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
6
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
7
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
8
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
9
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
10
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
11
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
12
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
13
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
14
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
15
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
16
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
17
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
18
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
19
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
20
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का

मोदीजी, विकासाची दिशादृष्टी बदलल्याखेरीज...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 01:09 IST

सध्या विकासदर घसरणीच्या मुद्यावर जोरदार राजकीय कलगीतुरा जारी आहे. काल-परवापर्यंत काँग्रेस व अन्य विरोधी पक्ष, अर्थतज्ज्ञ, पत्रकार याकडे लक्ष वेधत होते.

सध्या विकासदर घसरणीच्या मुद्यावर जोरदार राजकीय कलगीतुरा जारी आहे. काल-परवापर्यंत काँग्रेस व अन्य विरोधी पक्ष, अर्थतज्ज्ञ, पत्रकार याकडे लक्ष वेधत होते. आता त्यात भाजपचे नेते यशवंत सिन्हा, अरुण शौरी आदींची भर पडल्यामुळे धार आली आहे. अर्थात, माजी अर्थमंत्री सिन्हा यांनी थेट पंतप्रधानांचे नाव न घेता अर्थमंत्री अरुण जेटली यांना निशाणा केले. मात्र, वृत्तपत्र व चित्रवाणीवरील बातम्या, दुजोरा व विश्लेषण दस्तूरखुद्द मोदी यांच्या जिव्हारी लागल्यामुळे बचावासाठी ते स्वत: मैदानात उतरले.युक्तिवाद करीत अर्थव्यवस्था सुधारली असल्याची ग्वाही दिली...सत्य नव्हे, सत्ता बोलते !या कथित उपायांसाठी नोटाबंदीचा धडाकेबाज निर्णय घेतला त्याचे शेतकरी, छोटे उद्योग व्यवसाय नि सामान्य जनतेवर प्रतिकूल परिणाम झाले. व्यवहार आकसले, रोजगार कमी झाले. परिणामी, विकासदर मंदावला. हे ढळढळीत वास्तव आहे. मात्र, अर्थमंत्री व पंतप्रधान हे चक्क नाकारतात. कर जाळ्याचा विस्तार होणार असल्यामुळे व रोखीऐवजी डिजिटल व्यवहार होणार असल्यामुळे हमखास फायदा आहे, असे छातीठोकपणे सांगतात.भरीसभर म्हणजे घिसाडघाईने व तुटक, तुकडे पद्धतीने लागू केलेला ‘वस्तू व सेवा कर’ अगर जीएसटी यामुळे छोट्या व्यावसायिकांची दमछाक होत व्यवहार व रोजगार अधिकच अडचणीत आले आहेत. याच्या संचयी व चक्राकार प्रभावामुळे अर्थव्यवस्था मंदावली, विकास दर घसरला. ही टीका फक्त राजकीय विरोधकांची नाही, तर निष्पक्ष देशी-विदेशी अर्थतज्ज्ञ व जाणकारांची आहे, ही बाब नीट ध्यानी घेणे गरजेचे आहे. संघप्रमुख भागवत व परिवारातील अन्य संघटना व व्यक्तींनी याकडे लक्ष वेधल्यानंतर पंतप्रधान म्हणतात : ‘होय, यावर उपाय करीत आहोत!’कुणाचा, कशाचा विकास?पंतप्रधान मोदी ज्या विकास प्रारूपाचे समर्थन करीत आहेत (जो मुख्यमंत्री म्हणून त्यांनी गुजरातमध्ये रेटला ‘ते मॉडेल’) हे खुल्या भांडवलशाहीचे, जागतिकीकरणाच्या अर्थनीतीचे मनमोहनसिंगांच्या काँग्रेसी पठडीतीलच धोरण आहे, ही बाब नजरेआड करता कामा नये! अर्थात, मोदीजी त्याला त्यांच्या खास शैलीत ‘इमानदारीचा व भारतीयतेचा’ अमली जामा देत जनविरोधी असूनदेखील भोळ्याभाबड्या जनतेच्या गळी उतरवत आहेत. हीच तर त्यांची खासियत; पण किती काळ हे गारूड चालणार? साडेतीन वर्षांनंतर आता कुठे त्यांचा भंडाफोड होऊ लागला आहे. ‘अच्छे दिन’, ‘सब का विकास’ची जादू आणखी किती काळ टिकणार?ज्या सव्वाशेकोटी भारतीयांच्या (आता ते १३३ कोटी झाले) आणा-भाका घेत मोदी नवनवी गाजरे दाखवीत आहेत ते त्यांचे विकास धोरण नेमके आहे तरी काय? त्यांची स्वत:ची आणि भाजपची काही वेगळी एतद्देशीय विकासप्रणाली आहे का? एक तर मोदीजी हे स्वायत्त व स्वयंभू आहेत. पक्ष व परिवार हे त्यांचे सोयीचे माध्यम आहे. गुजरातेत त्यांनी सर्वांना वेसण घालत फरफटत मागे यायला लावले. अखेर शेवटी हे सर्व अंबानी- अदानी- देशी- विदेशी कंपन्याच्या हित व हितसंबंधाच्या विकासाच्या गोंडस नावाने विनाशाकडे नेणारे वाढवृद्धी मॉडेल आहे. ही बाब आवर्जून लक्षात घेतल्याखेरीज याची समीक्षा करणे सुतराम शक्य नाही.सोयीचे धोरण साटेलोटे?२१ व्या शतकात मागील शतकांचे अर्थसिद्धांत, औद्योगिक संरचना, विकास संकल्पना, अप्रस्तुत, अविवेकी व अधिक स्पष्ट शब्दांत सांगायचे, तर विनाशकारी- विसंवादी- विषमतावादी धोरणे समतामूलक शाश्वत विकास साध्य करू शकत नाहीत, ही बाब आमच्या विद्वजन, पत्रकार, जाणकार तसेच राज्यकर्त्या महाजन-अभिजन वर्गाला, आजी-माजी सत्ताधाºयांना केव्हा कळेल? खरेतर या सर्व मर्यादा लक्षात घेऊन या भ्रमित करणाºया चक्राच्या पलीकडे जाऊन मानवमुक्तीचे, वसुंधरेच्या रक्षणाचे अर्थकारण- समाजकारण- राजकारण जाणीवपूर्वक विकसित करण्याची आज नितांत गरज आहे. किंबहुना बुद्धांपासून गांधींपर्यंतचे भारतीयदर्शन, आचार-विचार याद्वारे आजच्या विद्वेषी, हिंसक, बेबंद जगाला एक नवी दिशा निश्चित देऊ शकतो. मोदीजींची मजबुरी आहे की, त्यांना मोहनदास करमचंद गांधींचे नाव घ्यावे लागते!विज्ञान भवनातील कार्यक्रमात मोदींनी सरकारविरोधी टीकेला जे उत्तर दिले त्यात अचंबा वाटण्यासारखे अथवा नवीन असे नाही. ती त्यांची मनोमन धारणा आहे. विकासाबाबत चैन, चंगळीच्या वस्तू व सेवांची रेलचेल. म्हणून तर ते म्हणाले, ‘मोटार वाहन विक्रीत मोठी वाढ झाली.’ हे त्यांच्या दृष्टीने प्रगतीचे निदर्शक आहे. हे एक जरी मासलेवाईक उदाहरण घेतले तरी ज्या गरिबांसाठी ते काम करू इच्छितात त्यांच्या व हवामान बदलाच्या दृष्टीने ही मोटार वाहन वाढ वांछित नाही.तात्पर्य, त्यांची विकासाची धारणा व धोरणे पठडीतील अन्य नेत्यांपेक्षा वेगळी नाहीत. शेतकरी, शेतमजूर, कारागीर, लहान-मोठे व्यावसायिक व एकूण कष्टकरी १०० (होय शंभर) कोटी जनतेच्या जीवन-मरणाच्या प्रश्नासाठी ही धोरणे खचितच उपयुक्त नाहीत. होय, ते मतदार आहेत व त्यांना भुलविण्यासाठी, झुलविण्यासाठी हिकमतीची कमी नाही...-प्रा. एच.एम. देसरडा(नामवंत अर्थतज्ज्ञ, माजी सदस्य, महाराष्टÑ राज्य नियोजन मंडळ)

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानBJPभाजपा