शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली
3
लोनवर Hero Splendor खरेदी करण्यासाठी किती डाउन पेमेंट करावं लागेल? किती लागेल मंथली EMI, जाणून घ्या
4
मोदी सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये चार नवीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी
5
"शेतकऱ्यांना पंजाबपेक्षा जास्त मदत दिली, तुलना करण्यापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना सुनावलं
6
इतक्या कोटींची मालकीण आहे २५ वर्षीय मैथिली ठाकूर! एका शोचे मानधन किती? बिहार निवडणुकीमुळे चर्चेत
7
“STला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणे गरजेचे, कामगारांच्या मागण्यांवर शासन सकारात्मक”: सरनाईक
8
२ वर्षांच्या मुलीवर माकडांचा हल्ला; वडिलांसमोर छतावरुन खाली पडली, धडकी भरवणारा Video
9
“शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करणार, पण आज थेट मदतीची जास्त गरज”: CM देवेंद्र फडणवीस
10
शबरीमला मंदिरातील सोन्याच्या मुलाम्यात घोटाळा? न्यायालयात मोठा खुलासा, देवस्वम बोर्डाने आरोप फेटाळले
11
१४ वर्षांच्या उच्चांकी स्तराच्या जवळ 'या' सरकारी बँकेचे शेअर्स; रेखा झुनझुनवालांनी खरेदी केले आणखी शेअर्स
12
"शाहरुख खानसोबत काम करताना तो...", निवेदिता सराफ यांनी सांगितला अनुभव; जॅकी श्रॉफ तर...
13
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या कोरडवाहू, हंगामी बागायतदार आणि बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती पैसे मिळणार?
14
UPI व्यवहारांच्या नियमामध्ये होणार बदल, ८ ऑक्टोबरपासून अशा प्रकारे करू शकाल पेमेंट
15
अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा दिलासा; मुख्यमंत्री फडणवीसांनी केली घोषणा
16
पाकिस्तानातील सोने-चांदीचे दर वाचून विश्वास नाही बसणार! काय आहे एका तोळ्याची किंमत?
17
भर कोर्टात बूट फेकण्याचा प्रयत्न, CJI भूषण गवई यांच्या आईची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
18
दिवाळीआधीच धमाका! विवोचा मिड-रेंज स्मार्टफोन भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि खासियत
19
Palmistry: तळ हाताच्या शुक्र पर्वतावर 'या' चिन्हाचे असणे म्हणजे राजयोगच; तुम्हीपण तपासून बघा!
20
सुपर बॉय! २ वर्षांच्या आदित्यने कॉम्पुटरला टाकलं मागे, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

फुकाची भाजी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2019 05:23 IST

ज्या माणसाला गरजच नव्हती त्याच्यासाठी हा मोबाइल आणि त्याचा डाटा आज अत्यावश्यक गरज बनली आहे. एक वेळचे जेवण नाही मिळाले तरी चालेल, रिचार्ज मात्र वेळेतच व्हायला हवे, ही त्याची आजची मानसिकता. आजच्या बाजारपेठेला हेच तर हवे आहे.

ज्या माणसाला गरजच नव्हती त्याच्यासाठी हा मोबाइल आणि त्याचा डाटा आज अत्यावश्यक गरज बनली आहे. एक वेळचे जेवण नाही मिळाले तरी चालेल, रिचार्ज मात्र वेळेतच व्हायला हवे, ही त्याची आजची मानसिकता. आजच्या बाजारपेठेला हेच तर हवे आहे.फुकटची चटक लागली की तोंड पोळणारच ! हे खोटे वाटत असेल, तर मोबाइल ग्राहकांना विचारायला हवे. मोबाइल घेण्याचे स्वप्नही न पाहिलेल्या सर्वसामान्यांना अगदी कमी पैशांत आधी मोबाइल मिळाला. सोबत अमर्याद डाटाही मिळाला. हा सर्वसामान्य माणूस या डाटाच्या भरोशावर अख्खे जग खिशात घेऊन फिरू लागला. किराणा मालात काटकसर होईल; पण तारखेला रिचार्ज टळणार नाही, इतका हा मोबाइल सवयीचा झाला. फुकटात मिळालेले कधीच पुरत नाही, हे गावात ज्येष्ठांकडून ऐकविले जायचे. ‘फुकाची भाजी, हगवणीस काळ’ ही म्हण वारंवार ऐकविली जायची. परिस्थिती बदलली. खुल्या अर्थव्यवस्थेच्या घुसळणीत ग्राहकाला फुकटात, सवलतीत, हप्त्याने देण्याची सुविधा दिली जाऊ लागली. ‘इथे उधार मिळणार नाही’ अशा पाट्या लागायच्या त्या दुकानांवर आता ‘उधार मिळेल’ अशा पाट्या झळकू लागल्या. ‘एक रुपया द्या, लाखाची गाडी-मोबाइल हप्त्यावर घेऊन जा’ अशी आमिषे दिली जाऊ लागली. त्यामुळे कुवत नसलेला ग्राहकही या फुकटेगिरीला - सवलतीला बळी पडला. त्यातून शहर - खेडे, नोकरदार - शेतकरी कोणीही नाही सुटला. त्यामुळे बाजारपेठ तर फुगली; पण माणसाचा आनंद हिरावून घेतला गेला. अख्खे आयुष्य हप्ते फेडण्यातच जाऊ लागले. म्हणजे एक पैसाही खिशात नसताना आनंदाने जगणारा सर्वसामान्य माणूस, शेतकरी पैशांअभावी पावलोपावली नडला जाऊ लागला. खाण्यासाठी जे लागायचे तेच शेतकरी पिकवायचा; पण खुल्या अर्थव्यवस्थेने अधिक उत्पन्नाचे आमिष दाखवून या बळीराजाच्या आयुष्यातला आनंद संपवून टाकला. ज्वारी-जवस सोडून तो उसाच्या मागे लागला. नोकरदारांचे हालही तसेच. गेल्या ३० वर्षांत सर्वांच्याच आयुष्याचे बाजारीकरण झाले. शिक्षण हा बाजार बनला. फुकटात शिक्षण मिळायचे तिथे प्राथमिक शिक्षणाची किंमत लाखावर पोहोचली.

आरोग्याचा बाजार यापेक्षाही मोठा. म्हणजे मरणदेखील स्वस्त राहिले नाही. सण हे सण न राहता ‘इव्हेंट’ बनले आणि त्यांचीही स्वतंत्र अर्थव्यवस्था तयार झाली. जगाबरोबर राहणे, म्हणजे बाजारपेठेच्या इशाऱ्यावर धावणे हा जणू नियम झाला. तुमची ऐपत असो वा नसो, इच्छा असो अथवा नसो, तुम्हाला दमछाक होईपर्यंत पळायचेच आहे. पळताना कोसळले तरी तुमच्यासाठी कोणी थांबणार नाही. महामार्गावर अपघात झाल्यानंतर एक तर फोटो काढताना किंवा अपघातग्रस्त वाहनातील माल पळविताना अनेकांना आम्ही पाहिले आहेच की. या बाजारीकरणाचे एक गणित पक्के आहे. ग्राहकाला एखाद्या वस्तूची अगोदर सवय लावायची. त्यासाठी त्याला वाट्टेल ती सवलत द्यायची. त्याच्यासाठी ती वस्तू अपरिहार्य झाली की, मग हळूहळू किंमत वाढवायची. फुकटात दारू पाजणारा मित्र परवडत नाही, तो यामुळेच. सवय लागेपर्यंतच तो बिल देत असतो. एकदा का ती लागली की, तो मित्र आपला हात आखडता घेऊन त्यालाच पैसे द्यायला भाग पाडतो. हा मित्र आणि ही बाजारपेठ सारखीच. दोघेही ग्राहकाला फक्त सवय लागण्याची वाट पाहत असतात. आपली मॉल संस्कृती वेगळी थोडीच आहे? सवलती देऊन या संस्कृतीने अनेक छोट्या दुकानदारांचा बाजार बसविला. पूर्ण बाजारपेठ ताब्यात आल्यानंतर ते काय करतील, हे सांगण्यासाठी कुठल्या ज्योतिषाची गरज राहणार नाही.

भारतात व्यापारासाठी आलेल्या ईस्ट इंडिया कंपनीनेही सर्वात आधी हेच केले. आर्थिक नाड्या हातात येताच पुढे काय झाले ते सर्वज्ञातच आहे. त्यामुळे फुकटची गोष्ट चटकाच देते, हे कायम लक्षात ठेवायला हवे. मग तो मोबाइल असो वा अन्य कुठलीही वस्तू. मोबाइल आणि डाटा अगदी कमी पैशांत म्हणजे फुकटातच देऊन इतर कंपन्यांचा बाजार झोपविणाºया कंपनीने फुकटची ही कात टाकून गेल्या आठवड्यात आऊटगोइंग कॉलला पैसे आकारणे सुरू केले. ज्या माणसाला गरजच नव्हती त्याच्यासाठी हा मोबाइल आणि त्याचा डाटा आज अत्यावश्यक गरज बनली आहे. एक वेळचे जेवण नाही मिळाले तरी चालेल, रिचार्ज मात्र वेळेतच व्हायला हवे, ही त्याची आजची मानसिकता. आजच्या बाजारपेठेला हेच तर हवे आहे.

टॅग्स :Jioजिओ