शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू कधी दहशतवादी असू शकत नाही..."; संसदेत गृहमंत्री अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
Video - भीषण! अमेरिकेमध्ये F-35 फायटर जेट क्रॅश; पायलटने 'असा' वाचवला जीव
3
ज्वेलरी शॉपमध्ये अचानक पुराचे पाणी घुसले, २० किलो सोन्याचे दागिने, हिरे वाहून गेले; लोक चिखल रापत बसले...
4
एकेकाळी ५ रुपयांसाठी मजुरी करायच्या, आज अमेरिकन कंपनीच्या CEO बनून १०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना देताहेत पगार
5
"हात जोडले, ५ मिनिटं मागितली, पण..."; बुलडोझर कारवाईनंतर भावाचा मृत्यू, भाजपा नेत्याची व्यथा
6
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
7
भयानक धाडस...! प्रेक्षकांनी छेडछाड केली, प्रसिद्ध गायिकेने भर कार्यक्रमात स्वत:चे कपडे उतरविले; Video व्हायरल...
8
लेकीच्या जन्मानंतर इशिता दत्ताची तब्येत बिघडली, दोन वर्षांचा मुलगाही आजारी; दिली हेल्थ अपडेट
9
नववधूने 'ती' मागणी पूर्ण केली नाही; संतापलेल्या पतीने केलं असं काही की ऐकून येईल राग!
10
आता ₹३०,००० सॅलरी असेल तरी नो टेन्शन; EPF तुम्हाला बनवेल २ कोटींचा मालक, पाहा कॅलक्युलेशन
11
"आधी पैसे दे मग बायको घे", EMI न भरल्याने थेट महिलेला उचलून घेऊन गेले बँकवाले, नवरा म्हणतो...
12
Stock Market Today: ट्रम्प टॅरिफ बॉम्बनंतर शेअर बाजारात मोठी घसरण; Sensex ५३० अंकांनी आपटला; ऑटो-रियल्टीमध्ये विक्री
13
Viral Video : सलाम तुझ्या जिद्दीला! हात नसतानाही तो करतोय बांधकाम; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक
14
भारतावर २५ टक्के टॅरिफ, अमेरिकेचा धक्कादायक निर्णय; 'ट्रम्प'नितीमुळे कोणत्या वस्तू महागणार?
15
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
16
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
17
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
18
'व्हायरल गर्ल' मनीषाला नवऱ्यानेच लावला चुना; लग्नाच्या अवघ्या १० दिवसांत केलं कांड
19
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
20
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश

मिशन वर्ल्डकप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2023 07:54 IST

भारतातील क्रिकेटवेड वेगळं सांगण्याची गरज नाही. क्रिकेटमध्ये कितीही अपयश आले, तरी विश्वचषकाच्या तोंडावर आता आपला संघ काहीतरी करेल, अशी आशा घेऊन पुन्हा एकदा चाहते क्रिकेटकडे वळतात.

आगामी एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ५ सप्टेंबरला भारतीय संघाची घोषणा केली. क्रिकेटविश्वातील सर्वांत जास्त प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या संघाची घोषणा निर्धारित वेळेच्या अखेरीस झाली आणि सर्वांची उत्सुकता लागून राहिलेल्या भारतीय संघातील १५ शिलेदार सर्वांसमोर आले. अपेक्षेप्रमाणे रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी या अनुभवी खेळाडूंसह सूर्यकुमार यादव, अक्षर पटेल, शुभमन गिल, ईशान किशन, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव यांनाही संघात स्थान मिळाले. क्रिकेटविश्वाची सध्या दोन पर्वांमध्ये विभागणी होते. एक म्हणजे ‘आयपीएल’आधीचे आणि दुसरे ‘आयपीएल’नंतरचे. २००८ साली सुरू झालेल्या ‘आयपीएल’पासून क्रिकेटविश्वात झपाट्याने बदल झाले आणि यामध्ये निर्णायक भूमिका ठरली ती भारताची.

भारतातील क्रिकेटवेड वेगळं सांगण्याची गरज नाही. क्रिकेटमध्ये कितीही अपयश आले, तरी विश्वचषकाच्या तोंडावर आता आपला संघ काहीतरी करेल, अशी आशा घेऊन पुन्हा एकदा चाहते क्रिकेटकडे वळतात. भारताने अखेरचे विश्वविजेतेपद २०११ साली महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात जिंकले होते. त्याने मारलेला अखेरचा विजयी षटकार आजही क्रिकेटप्रेमींच्या मनावर कोरलेला आहे. त्यामुळेच या विश्वविजेतेपदानंतर दरवेळी भारताकडून जेतेपदाची अपेक्षा बाळगली जाते. चाहत्यांची ही आशा पूर्ण करण्यात भारतीय खेळाडूंना अपयश आले असले, तरी यंदाचा विश्वचषक मायदेशात होणार असल्याने पुन्हा एकदा तो विजयी क्षण अनुभवता येईल, अशी आशा चाहत्यांनी लावली आहे.

२०११ ते गेल्यावेळच्या २०१९ सालच्या विश्वचषक स्पर्धेवर नजर टाकल्यास एक गोष्ट प्रकर्षाने जाणवेल की, यजमान देशाने विश्वचषक उंचावला आहे. २०११ साली भारताने हा पराक्रम पहिल्यांदा केल्यानंतर २०१५ साली ऑस्ट्रेलिया आणि २०१९ साली इंग्लंडने ही कामगिरी केली. त्यामुळेच यंदा पुन्हा एकदा भारतीय संघ या पराक्रमाची पुनरावृत्ती करेल, असा विश्वासही चाहत्यांना आहे. भारताने निवडलेल्या संघाची फलंदाजी खोलवर असून, गोलंदाजीत मात्र अनेक प्रश्न उद्भवतात. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी या दोन अनुभवी वेगवान गोलंदाजांच्या क्षमतेवर काहीच प्रश्न नाही. दोघेही जागतिक दर्जाचे गोलंदाज; मात्र त्यांच्या जोडीला फिरकी गोलंदाजांमध्ये लेगस्पिनर युझवेंद्र चहलला न मिळालेले स्थान धक्कादायक आहे.

रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव हे तीन फिरकीपटू शानदार आहेत, वाद नाही; पण तिघेही डावखुरे आहेत. यामध्ये चहल मागे पडला तो त्याच्या फलंदाजी कौशल्यामुळे. जडेजा, अक्षर यांचा अष्टपैलू खेळ सर्वांनीच पाहिला असून, कुलदीप काहीवेळा उपयुक्त फटकेबाजीही करतो आणि यामध्येच चहल मागे पडतो. तळाची फलंदाजी ही कायम भारताची कमजोर बाजू ठरली आहे. शिवाय हरभजन सिंगनंतर एकही उजव्या हाताने ऑफ स्पिन ‘दमदार’ मारा करणारा गोलंदाज भारताला गवसलेला नाही. डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांची भेदकता कोणत्याही क्षणी सामन्याचे चित्र पालटण्यास पुरेशी ठरते. भारतीय संघ यामध्येही अजून मागेच आहे. त्याउलट पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड या आघाडीच्या संघांकडे अशा गोलंदाजांचा तोफखानाच आहे. फलंदाजी भारताची कायम ताकद ठरली आहे; मात्र तरीही आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या वेगवान माऱ्याविरुद्ध चाचपडलेल्या फलंदाजांना पाहून भारतीय फलंदाजांवर प्रश्नचिन्ह निर्माण होणारच.

यंदाची विश्वचषक स्पर्धा मायदेशात होणार असल्याने भारतीय संघाला यजमान म्हणून फायदा होईलच; पण त्याचवेळी इतर संघांचे (पाकिस्तानव्यतिरिक्त) प्रमुख खेळाडूही ‘आयपीएल’निमित्त भारतात सातत्याने खेळत असतात हे विसरता कामा नये. २०११ च्या विश्वचषकानंतर झालेल्या दोन्ही विश्वचषक स्पर्धांत भारताचे आव्हान उपांत्य सामन्यात संपुष्टात आले; तसेच यादरम्यान झालेल्या विविध टी-२० विश्वचषक स्पर्धांतही भारताला बाद फेरींतच पराभवाचा सामना करावा लागला. कसोटी क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण खेळ करून दोन्ही जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) स्पर्धेत भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. जिंकण्यासाठी कणखर मानसिकता दाखवतानाच दडपण झुगारून खेळ केल्यास पुन्हा एकदा विश्वविजेतेपदावर भारताची मोहोर नक्की उमटेल.

टॅग्स :ICC One Day World Cupवन डे वर्ल्ड कपIndiaभारतBCCIबीसीसीआय