शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
3
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
4
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
5
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
6
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
7
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
8
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
9
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
10
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
11
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
12
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
13
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
14
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
15
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
16
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
17
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
18
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
19
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
20
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक

चमत्कार निजधामी

By admin | Updated: February 12, 2016 04:12 IST

बर्फाच्छादित जमिनीखाली तब्बल पस्तीस फूट आणि उणे पन्नास अंश तपमानात केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर सहा दिवसपर्यंत तग धरुन असलेला आणि साक्षात

बर्फाच्छादित जमिनीखाली तब्बल पस्तीस फूट आणि उणे पन्नास अंश तपमानात केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर सहा दिवसपर्यंत तग धरुन असलेला आणि साक्षात मृत्यूला पराभूत करणारा हणमंतप्पा कोपाड हा भारतीय लष्करातील जवान अत्याधुनिक औषधोपचारांच्या आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या विशेष देखरेखेखाली असताना मात्र मृत्यूने आपला डाव साधला आहे. भारताच्या उत्तरेकडील सीमेवर असलेल्या हिमालयाच्या कुशीतील सियाचेन या २१ हजार फूट उंचीवरील अतिथंड प्रदेशात देशाच्या लष्कराची जी अहोरात्र तैनात असते त्या तैनातीमधील दहा जणांच्या एका तुकडीचा आणि लष्करातील मद्रास रेजीमेन्टचा हणमंतप्पा हा सदस्य होता. गेल्या तीन तारखेस या तुकडीच्या तंबूवर बर्फाची एक प्रचंड मोठी भिंत कोसळली आणि हा तंबू खोलवर खचला गेला. सीमेन्टच्या भिंतीपेक्षाही बर्फाची अशी भिंत अधिक कणखर आणि कडक असल्याने तिच्याखाली गाडले गेलेले सर्व जवान तत्काळ मृत्युमुखी पडले पण सुदैवाने हणमंतप्पा जिवंत राहिला. पण त्याची इतक्या खोलवरुन आणि तेही अत्यंत प्रतिकूल वातावरणात सुटका करणे सोपे नव्हते. भारतीय लष्कराच्या दोनशे जवानांनी आणि अधिकाऱ्यांनी हे आव्हान स्वीकारायचे ठरविले. त्यात त्यांना दोन प्रशिक्षित श्वानांची खूप मोठी मदत झाली व हणमंतप्पास सुरक्षित बाहेर काढण्यात यश प्राप्त झाले. त्याच्यावर तत्काळ राजधानी दिल्लीतील लष्करी इस्पितळात उपचार सुरु करण्यात आले. जमिनीत आणि तेही अत्यंत थंड वातावरणात तब्बल सहा दिवस अडकून पडल्याने व प्राणवायूचा नीट पुरवठा होऊ न शकल्याने त्याच्या मेंदूवर आणि मूत्राशयावर घातक परिणाम घडून आला होता. पण डॉक्टर आशावादी होते. संपूर्ण देशभरात त्याच्या जीवितासाठी सामूदायिक प्रार्थना सुरु झाल्या. उत्तर प्रदेशातील एका महिलेने त्याच्यासाठी स्वत:ची मूत्रपिंडे दान करण्याची जाहीर तयारी दाखविली तर एका माजी लष्करी जवानाने ज्या कोणत्या अवयवाची गरज भासेल ते दान करण्याची इच्छा प्रदर्शित केली. त्याला जेव्हां बर्फाच्या जमिनीखालून सुरक्षितपणे बाहेर काढले गेले तेव्हां तो पूर्ण शुद्धीत परंतु काहीसा ग्लानीत होता. परंतु उपचार सुरु झाल्यानंतर त्याचे शरीर या उपचाराना अपेक्षित प्रतिसाद मात्र देत नव्हते. अखेर त्याला जीवरक्षक प्रणालीवर ठेवले गेले. पण अखेर शेवटी गुरुवारी सकाळी तो पूर्णपणे कोमात गेला आणि त्या अवस्थेतच त्याचे प्राणोत्क्रमण झाले. त्याच्या या बलिदानामुळे आता वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ इतक्या प्रतिकूल वातावरणात एकादी व्यक्ती दीर्घकाळ कशी जिवंत राहू शकते यावर संशोधन करणार असून त्याचा कदाचित अन्य जवानांना उपयोग होऊ शकेल. पण सियाचेनसारख्या दुर्गम ठिकाणी भारतीय लष्कराचे दळ ठेवण्याच्या आवश्यकतेवर नव्याने चर्चा सुरु झाली असून किमान येथे तरी पाकिस्तानने समजूतदार भूमिका घ्यावी अशी अपेक्षा आहे.