शहरं
Join us  
Trending Stories
1
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
2
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
3
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
4
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
5
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
6
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
7
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
8
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
9
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
10
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
11
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
12
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
13
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
14
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
15
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
16
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story
17
Shravan Shanivar 2025: शनिवारी कसे करावे अश्वत्थ मारुती पूजन? पिंपळाच्या झाडाचीही पूजा महत्त्वाची!
18
नागरिकांची झोप उडवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना यश!
19
आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ४२ टक्के वाढ
20
कुठल्याही देवावर विश्वास नाही, कुठलाही धर्म मानत नाही, या १० देशांमधील बहुतांश लोक आहेत नास्तिक

गोव्यातली खनिज लूट आणि केंद्र सरकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2018 20:29 IST

सर्वोच्च न्यायालय, २००६ ते २०११ या कालखंडात गोव्यात झालेल्या हजारो करोड रुपये मूल्याच्या महाकाय खनिज लुटीचा तपास सीबीआयकडे सोपवेल अशी जनतेची अपेक्षा होती. पण न्यायालयाने राज्य सरकारवर विश्वास दाखवणे उचित मानले.

- राज गायतोंडे

सर्वोच्च न्यायालय, २००६ ते २०११ या कालखंडात गोव्यात झालेल्या हजारो करोड रुपये मूल्याच्या महाकाय खनिज लुटीचा तपास सीबीआयकडे सोपवेल अशी जनतेची अपेक्षा होती. पण न्यायालयाने राज्य सरकारवर विश्वास दाखवणे उचित मानले.

२१ एप्रिल २०१४च्या निकालपत्राची शाई सुकण्याच्या आतच तपासाची सूत्रे सीबीआयसारख्या तटस्थ संस्थेकडे न सोपवण्याचे विपरीत परिणाम दिसायला सुरुवात झाली. न्यायालयाला व जनतेला अपेक्षित असलेल्या तपासाला त्वरेने सुरुवात करण्याऐवजी मनोहर पर्रीकरांच्या अध्यक्षतेखालील लोकलेखा समिती अहवाल, शहा आयोगाचे सगळे तीन भाग, सी.ई.सी. अहवाल व सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालपत्रात बेकायदा खाणकाम व खनिज लुटीसंबंधी अधोरेखित केलेले निष्कर्ष वगैरे खोटे असून खनिज लूट झालीच असेल तरी ती अगदीच क्षुल्लक प्रमाणात, असे  स्पष्टीकरणाचे डोस जनतेला पाजणे सुरू झाले.

तपास व चौकशीच्या नावावर प्रत्यक्षात जे झाले ते निवडक किरकोळ प्रकरणांची ठरावीक मर्यादेपर्यंतची चौकशी, योजनाबद्धरीत्या केलेला वेळकाढूपणा व केवळ वातावरण निर्मितीसाठीची पोकळ इशारेबाजी. थोडक्यात, केवळ डोळ्यांना पाणी लावण्याचाच प्रकार. यामुळे ना तपास पूर्ण झाला ना अपेक्षित वसुली सुरू झाली. महाकाय खनिजलुटीमुळे तमाम आम जनतेच्या तिजोरीच्या झालेल्या हजारो करोडो रुपयांच्या नुकसानीची वसुली करणे दूर, रीतसर सखोल तपास करणेही गंभीरपणे न घेण्याचा हा प्रकार म्हणजे संविधानाच्या कलम ३९(ब)ला अभिप्रेत असलेल्या मालक-विश्वस्त नात्याचे धिंडवडे काढण्यासारखेच आहे.

लोह खनिज ही जनतेच्या मालकीची अत्यंत बहुमूल्य व दुर्मिळ नैसर्गिक साधनसंपत्ती असल्यामुळे तिची जास्तीत जास्त किंमत जनतेच्या तिजोरीत म्हणजेच राज्य सरकारच्या तिजोरीत यावी हेच संविधानाच्या कलम ३९(ब)ला अभिप्रेत आहे व हे घटनात्मक उद्दिष्ट साध्य करण्यासाठीचा एक ख-या अर्थी परिणामकारक मार्ग म्हणजे लोह खनिज लिजेस खुल्या लिलाव प्रक्रियेद्वारा वाटणे हा होय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली केंद्र सरकारने लोह खनिजासंबंधित खाण लिजेस खुल्या लिलाव प्रक्रियेद्वारा वाटणे पूर्णपणे बंधनकारक करणारी, संपूर्ण देशाला एकसमान लागू होणारी, ऐतिहासिक दुरुस्ती एमएमडीआर कायदा, १९५७ या भारत देशाच्या खाण कायद्यात केली जी १२ ;जानेवारी २०१५ पासून संपूर्ण देशाला एकाच वेळी लागू झाली.

पण गोव्यातील संपलेल्या खाण लिजेसवरील त्यांच्या पूर्वीच्या मालकांचा मालकी हक्क मोदीजींच्या या विचारामुळे संपुष्टात येईल या पराकोटीच्या चिंतेने पुरते सैरभैर झालेल्या, देशाच्या संविधानापेक्षा पोर्तुगिजांचा वारसा पूजनीय वाटणा-यांना मात्र मोदीजींचा वरील विचार सपशेल चुकीचा व अयोग्य वाटतो. मोदीजींना असा घरचा अहेर देणा-यांना देशाच्या संविधानाची बांधिलकी व तिचा सन्मान याचे महत्त्व स्वत:च समजावून सांगण्याची पाळी मोदीजींवर आली नाही म्हणजे मिळवली.

हल्ली केंद्र सरकारवर जर दबाव आणायचा असेल तर रामबाण इलाज म्हणजे दिल्लीस्थित जंतरमंतरवर आंदोलन करायचे, असा समज संपूर्ण देशात दृढ होत चाललाय. गोव्यातील खनिज लुटीची चौकशी व वसुली त्वरेने पूर्ण करावी म्हणून केंद्र सरकारवर दबाव आणण्यासाठीही हाच मार्ग उपलब्ध असेल तर हे कोणासाठी भूषणावह म्हणायचे?

(लेखक खाण व्यवसायाचे अभ्यासक आहेत.)

टॅग्स :goaगोवा