शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
4
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
5
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
6
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
7
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
8
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
9
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
10
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
11
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
12
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
13
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
14
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
15
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
16
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
17
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
18
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
19
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
20
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी

गिरणी कामगारांना मुंबईत घरे द्यायची दानत नाही!

By संदीप प्रधान | Updated: November 18, 2024 10:07 IST

तत्कालीन राज्यकर्त्यांनी आणि गिरणी मालकांनी संगनमत करून कामगारांना हद्दपार करण्याचे षडयंत्र रचले होते, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

मुंबईच्या राजकीय, सामाजिक व आर्थिक इतिहासाचा अध्याय लिहिलेल्या गिरणी कामगारांना शेलू गावात घरे मिळणार याबद्दल टाळ्या पिटायच्या की, सर्वपक्षीय सत्ताधाऱ्यांनी कामगारांची उपेक्षा, फसवणूक केल्याबद्दल कपाळावर हात मारून घ्यायचा, अशा द्विधा मन:स्थितीत कुणीही असेल. मुंबईतील परळ, लालबाग, वरळी वगैरे परिसरात तीन पिढ्या वास्तव्य केलेल्या गिरणी कामगारांना आजही मुंबईत घरे देणे अशक्य नाही. यच्चयावत पक्ष मराठी माणूस मुंबईबाहेर जाता कामा नये, अशी भाषा करतात मात्र त्यांना गोरगरीब कामगाराला परळ, वरळी वगैरे भागात घर द्यायची इच्छा नाही.

गिरणी कामगारांकरिता ३० हजार घरांचा प्रकल्प शेलू येथे जानेवारीपासून उभारण्यास सुरुवात होत आहे. या कामाची गिरणी कामगारांच्या काही संघटनांनी पाहणी केली. ३१८.२५ चौ.फू. क्षेत्रफळाचे हे घर असेल, अशी बातमी प्रसिद्ध झाली. १८ जानेवारी १९८२ रोजी गिरणी कामगारांचा ऐतिहासिक संप सुरू झाला. हा संप अधिकृतपणे आजही संपलेला नाही. संपानंतर पुढील दोन वर्षे अनेक गिरण्या नफ्यात सुरू होत्या. मात्र तत्कालीन राज्यकर्त्यांनी आणि गिरणी मालकांनी संगनमत करून कामगारांना हद्दपार करण्याचे षडयंत्र रचले होते, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. अनेक गिरणी मालकांनी गिरण्या नफ्यात असतानाही तोटा दाखवून कामगारांची देणी थकवली. १९९० च्या दशकाच्या प्रारंभी सरकारने विकास नियंत्रण नियमावलीत बदल करून गिरण्यांच्या जमिनीचा औद्योगिक वापर बदलून निवासी व व्यापारी वापरास परवानगी देताच गिरण्या धडाधड बंद पडल्या. गिरणी कामगार खचले, त्यांची पोरे गँगवॉरमध्ये मारली गेली, मुली-सुना डान्सबार व सर्व्हिस बारमध्ये काम करायला लागल्या. 

राज्यातील दोन्ही काँग्रेसच्या आघाडी सरकारने २००० च्या दशकात एक स्पष्टीकरण जारी केल्याने गिरणी मालकांच्या वाट्याला ५८५ एकर जमीन आली. कापड गिरण्या चालवणाऱ्या उद्योगपतींनी रातोरात बांधकाम व्यवसायात उडी घेतली. परळ, लालबाग, वरळी, शिवडी वगैरे भागात गिरण्यांच्या जमिनीवर व्यापारी व निवासी टॉवर उभे राहिले. येथील फ्लॅट कित्येक कोटी रुपयांना विकले जाऊ लागले.

मुंबईत एकूण ५८ गिरण्या होत्या व त्यापैकी २६ गिरण्या केंद्र सरकारच्या मालकीच्या होत्या. केंद्र सरकारच्या मालकीची मुंबई टेक्सटाईल ही गिरणी दिल्लीतील एका नामांकित बिल्डरने २००५ साली ७०५ कोटी रुपयांना विकत घेतली. आठ वर्षांत कुठलेही बांधकाम न करता विकली तेव्हा त्याला २४०० कोटी रुपये मिळाले. यावरून किती झपाट्याने किमती वाढल्या हे लक्षात येते. केंद्र सरकारच्या मालकीच्या दहा बंद गिरण्या आजही मुंबईत उभ्या आहेत. त्याखालील जमिनीला सोन्यापेक्षा कितीतरी पट भाव आहे. सरकारची जर गिरणी कामगारांना मुंबईतच घरे देण्याची इच्छाशक्ती असती तर यापैकी पाच गिरण्यांची जमीन कामगारांच्या घरांसाठी दिली असती. अडीच लाख गिरणी कामगारांपैकी ८० हजार कामगार आजही हयात आहेत. परंतु त्यांना शेलू, वांगणीकडे हाकलून लावायचे हे सर्वपक्षीयांनी ठरवलेले आहे.

टॅग्स :MumbaiमुंबईthaneठाणेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारagitationआंदोलन