शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
3
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
4
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
5
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
6
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
7
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
8
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
9
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
10
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
11
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
12
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
13
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
14
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
15
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
16
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
17
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
18
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
19
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
20
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...

गिरणी कामगारांना मुंबईत घरे द्यायची दानत नाही!

By संदीप प्रधान | Updated: November 18, 2024 10:07 IST

तत्कालीन राज्यकर्त्यांनी आणि गिरणी मालकांनी संगनमत करून कामगारांना हद्दपार करण्याचे षडयंत्र रचले होते, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

मुंबईच्या राजकीय, सामाजिक व आर्थिक इतिहासाचा अध्याय लिहिलेल्या गिरणी कामगारांना शेलू गावात घरे मिळणार याबद्दल टाळ्या पिटायच्या की, सर्वपक्षीय सत्ताधाऱ्यांनी कामगारांची उपेक्षा, फसवणूक केल्याबद्दल कपाळावर हात मारून घ्यायचा, अशा द्विधा मन:स्थितीत कुणीही असेल. मुंबईतील परळ, लालबाग, वरळी वगैरे परिसरात तीन पिढ्या वास्तव्य केलेल्या गिरणी कामगारांना आजही मुंबईत घरे देणे अशक्य नाही. यच्चयावत पक्ष मराठी माणूस मुंबईबाहेर जाता कामा नये, अशी भाषा करतात मात्र त्यांना गोरगरीब कामगाराला परळ, वरळी वगैरे भागात घर द्यायची इच्छा नाही.

गिरणी कामगारांकरिता ३० हजार घरांचा प्रकल्प शेलू येथे जानेवारीपासून उभारण्यास सुरुवात होत आहे. या कामाची गिरणी कामगारांच्या काही संघटनांनी पाहणी केली. ३१८.२५ चौ.फू. क्षेत्रफळाचे हे घर असेल, अशी बातमी प्रसिद्ध झाली. १८ जानेवारी १९८२ रोजी गिरणी कामगारांचा ऐतिहासिक संप सुरू झाला. हा संप अधिकृतपणे आजही संपलेला नाही. संपानंतर पुढील दोन वर्षे अनेक गिरण्या नफ्यात सुरू होत्या. मात्र तत्कालीन राज्यकर्त्यांनी आणि गिरणी मालकांनी संगनमत करून कामगारांना हद्दपार करण्याचे षडयंत्र रचले होते, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. अनेक गिरणी मालकांनी गिरण्या नफ्यात असतानाही तोटा दाखवून कामगारांची देणी थकवली. १९९० च्या दशकाच्या प्रारंभी सरकारने विकास नियंत्रण नियमावलीत बदल करून गिरण्यांच्या जमिनीचा औद्योगिक वापर बदलून निवासी व व्यापारी वापरास परवानगी देताच गिरण्या धडाधड बंद पडल्या. गिरणी कामगार खचले, त्यांची पोरे गँगवॉरमध्ये मारली गेली, मुली-सुना डान्सबार व सर्व्हिस बारमध्ये काम करायला लागल्या. 

राज्यातील दोन्ही काँग्रेसच्या आघाडी सरकारने २००० च्या दशकात एक स्पष्टीकरण जारी केल्याने गिरणी मालकांच्या वाट्याला ५८५ एकर जमीन आली. कापड गिरण्या चालवणाऱ्या उद्योगपतींनी रातोरात बांधकाम व्यवसायात उडी घेतली. परळ, लालबाग, वरळी, शिवडी वगैरे भागात गिरण्यांच्या जमिनीवर व्यापारी व निवासी टॉवर उभे राहिले. येथील फ्लॅट कित्येक कोटी रुपयांना विकले जाऊ लागले.

मुंबईत एकूण ५८ गिरण्या होत्या व त्यापैकी २६ गिरण्या केंद्र सरकारच्या मालकीच्या होत्या. केंद्र सरकारच्या मालकीची मुंबई टेक्सटाईल ही गिरणी दिल्लीतील एका नामांकित बिल्डरने २००५ साली ७०५ कोटी रुपयांना विकत घेतली. आठ वर्षांत कुठलेही बांधकाम न करता विकली तेव्हा त्याला २४०० कोटी रुपये मिळाले. यावरून किती झपाट्याने किमती वाढल्या हे लक्षात येते. केंद्र सरकारच्या मालकीच्या दहा बंद गिरण्या आजही मुंबईत उभ्या आहेत. त्याखालील जमिनीला सोन्यापेक्षा कितीतरी पट भाव आहे. सरकारची जर गिरणी कामगारांना मुंबईतच घरे देण्याची इच्छाशक्ती असती तर यापैकी पाच गिरण्यांची जमीन कामगारांच्या घरांसाठी दिली असती. अडीच लाख गिरणी कामगारांपैकी ८० हजार कामगार आजही हयात आहेत. परंतु त्यांना शेलू, वांगणीकडे हाकलून लावायचे हे सर्वपक्षीयांनी ठरवलेले आहे.

टॅग्स :MumbaiमुंबईthaneठाणेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारagitationआंदोलन