शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

दूध दराचे राजकारण पेटले !

By वसंत भोसले | Updated: July 11, 2018 00:30 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने येत्या १६ जुलैपासून मुबंईचा दूध पुरवठा रोखण्याचा इशारा दिला आहे. यावरून राजकीय धुमशान सुरू आहे.

दूध उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पादन वाढत असताना दूध खरेदीचा दरच दोन रुपये प्रतिलिटर कमी करण्यात आला. त्याचा फटका शेतकरीवर्गाला बसला. याउलट दुधाच्या विक्रीचा दर कमी करण्यात आला नाही. आजही किरकोळ दूध विक्रीचा प्रतिलिटर दर ५० रुपयेच आहे. याउलट खरेदीचा दर निम्म्याने कमी आहे. याचा सर्वांत मोठा फटका शेतकºयांना बसला. यावर उपाय करण्यासाठी म्हणून दूध पावडर तयार केलेल्या संस्थांना ५३ कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले. त्याचा लाभ खासगी दूध संस्थांनी लाटला आणि हे अनुदान मिळाले असतानाही दुधाचे दर दोन रुपयाने कमी केले. त्याचा मुहूर्तही उन्हाळ्याचा धरला. वास्तविक उन्हाळ्यात दुधाचे उत्पादन कमी असते. अशावेळी दर वाढविण्याऐवजी कमी केले. उन्हाळ्यात दही, ताकासाठीही दुधाची मागणी वाढते. या ५३ कोटी रुपयांच्या अनुदानाचा लाभ खासगी दूध संस्थांनी अधिक लाटला आहे. दूध उत्पादकांना तो मिळालाच नाही. उलट दर कपातीचा फटका बसला.स्वाभिमानी शेतकरी संघटनेने येत्या १६ जुलै रोजी दूध उत्पादक शेतक-यांसाठी आंदोलन छेडण्याची घोषणा केली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, खासदार राजू शेट्टी यांनी दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच रुपये थेट अनुदान देण्याची मागणी मान्य केली नाही तर दूध संकलन थांबवून शहरांकडे जाणारे ग्रामीण भागातील दूध रोखण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनाच्या घोषणेबरोबर भाजपने कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांना हाताशी धरून राजकारण सुरू केले आहे. या दोघांनी वारणा दूध सहकारी संघाचे अध्यक्ष विनय कोरे यांना घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांनी दोन्हीही मागण्या मान्य आहेत असे सांगितले, असे कोरे यांनी सांगून टाकले. याचा निर्णय कोणत्याही अधिकृत स्तरावरील बैठकीत झाला नाही.दूध पावडरीवर अनुदान तसेच शेतकºयांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याचे त्यांनी (मुख्यमंत्र्यांनी) मान्य केल्याचे सांगून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाची हवा काढून घेण्याची ही खेळी आहे. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन चालू असताना अशी धोरणात्मक घोषणा सरकारला करता येत नाही. तरीदेखील सदाभाऊ खोत यांच्या पुढाकाराने भेटलेल्या या शिष्टमंडळाने निर्णयच जाहीर करून टाकला आहे.दरम्यान, राजू शेट्टी भाजपवर सध्या तरी टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्याचा राग भाजपच्या नेत्यांमध्ये आहे. दूध दराच्या आंदोलनासही हेच वळण देण्याचा प्रयत्न करण्यात येऊ लागला आहे. यापूर्वीच्या राजू शेट्टी यांच्या सर्व आंदोलनात दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यापासून सारेच त्या पक्षाचे नेते उतरत होते. सत्तेवर येताच भाजपला राजू शेट्टी यांचे प्रत्येक वक्तव्य आणि आंदोलन काँग्रेस तसेच राष्ट्रवादीच्या सोयीसाठी असल्याचा वास येऊ लागला आहे. यामध्ये कारण नसताना महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी टीकेची झोड स्वत:वर ओढवून घेतली आहे. राजकारण करीत असताना दूध उत्पादकांच्या मागण्यांवर मात्र निर्णय घेण्याचे नाटक करण्यात येत आहे, हे दुर्दैव आहे. 

टॅग्स :milkदूधFarmerशेतकरीMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण