शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

मैलाचा दगड !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 22:12 IST

आपल्या भागात उत्पादित मालाचे व्यवस्थित विपणन केल्याशिवाय जगाला त्याचे महत्त्व कळणार नाही. बोलणाऱ्याचे बोंड विकले जातील, पण गप्प बसणाºयाचे सोने विकले जाणार नाही, ही म्हण उगाच नाही वापरली जात.

मिलिंद कुलकर्णीआपल्या भागात उत्पादित मालाचे व्यवस्थित विपणन केल्याशिवाय जगाला त्याचे महत्त्व कळणार नाही. बोलणाऱ्याचे बोंड विकले जातील, पण गप्प बसणाºयाचे सोने विकले जाणार नाही, ही म्हण उगाच नाही वापरली जात.खान्देशात आता हळूहळू यासंबंधी जागरुकता तयार होऊ लागली आहे, हे सुचिन्ह म्हणावे लागेल. काही व्यक्ती, संस्था त्यादृष्टीने प्रयत्न करीत आहे, हे कौतुकास्पद आहे.नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथील महानुभाव पंथींयांचे एकमुखी दत्त मंदीर आणि तेथे दत्तजयंतीला होणारा यात्रोत्सव, घोडे बाजार प्रसिध्द आहे. पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने तेथे येतात. अश्वशौकीन घोडेबाजारात आवर्जून येतात. पण यात्रोत्सवाला देशपातळीवर नेण्यासाठी पर्यटनमंत्री आणि नंदुरबारचे पालकमंत्री जयकुमार रावल, सारंगखेड्याचे नेते जयपालसिंह रावल यांनी पुढाकार घेऊन ‘चेतक फेस्टिवल’ची संकल्पना साकारली. राज्य सरकारच्या पर्यटन महामंडळाने या उत्सवासाठी अर्थसहाय्य देऊ केले. त्यामुळे केवळ आठवड्यासाठी असणारी ही यात्रा आता महिनाभरासाठी होऊ लागली आहे. टेन्ट सिटी, सारंगखेडा बंधाºयाच्या जलाशयाचा उपयोग करुन जलक्रीडा, चित्र प्रदर्शन, साहसी क्रीडा प्रकार, सांस्कृतिक कार्यक्रम असे वेगवेगळे उपक्रम नियोजित करण्यात आले. सुरुवातीला प्रतिसाद कमी असला तरी हळूहळू गर्दी वाढेल. चर्चा होईल, हा विश्र्वास निश्चित येतो. सारंगखेड्यासारख्या आडवळणाच्या गावात असा महोत्सव आयोजित करुन एक चांगला पायंडा सुरु झाला.मराठी प्रतिष्ठानने प्रसिध्द शेफ विष्णू मनोहर यांच्या सहकार्याने ३७०० किलो भरीत बनविण्याचा विश्वविक्रम साकारला. जळगाव आणि वांग्याचे भरीत हे समीकरण आहे. हिवाळ्याच्या चार महिन्यात हिरव्या मोठ्या वांग्यांना खास चव असते. कांद्याची पात, लसूण, मिरची याचा उपयोग करीत तुरकाठ्यांवर भाजलेल्या वांग्याचे भरीत आणि कांदा, मुळा, गाजर, कळण्याच्या भाकरी किंवा पुºया, कोशिंबीर असा मेनू असला की पंचपक्वानापेक्षा त्याची चव खवैय्यांना खुणावते. जगभर गेलेले जळगावकर भरीताचे दिवाने आहेत. केळीच्या मळ्यात होणाºया भरित पार्ट्यांना हुरडा पार्टीसारखी लज्जत असते. मुंबई, पुण्यात राहणाºया मूळ जळगावकरांसाठी या चार महिन्यात वांगे आणि कांद्याची पात, किंवा तयार भरित पाठविण्याची खास व्यवस्था केली जाते. गावोगाव भरीत विक्रीचे अनेक केंद्र हे खवैयांच्या जिभेचे चोचले पुरवितात. याच भरिताला जागतिक ओळख देण्यासाठी प्रसिध्द शेफ विष्णू मनोहर यांनी ‘विश्वविक्रमा’चा संकल्प सोडला. मराठी प्रतिष्ठानचे हरहुन्नरी कार्यकर्ते विजय वाणी आणि जमील देशपांडे यांनी हा संकल्प प्रत्यक्षात उतरवण्यासाठी पुढाकार घेतला. दत्तात्रय चौधरी आणि त्यांच्या सहकाºयांनी जळगावच्या उपक्रमात सहभाग देऊन हा उपक्रम यशस्वी केला. विश्वविक्रमाच्या निमित्ताने जळगावच्या भरिताची चर्चा झाली. पुढे मनोहर यांच्या पुढाकाराने भरित अटकेपार जाईल, असा विश्वास निर्माण झाला आहे.केळीच्या बाबतीत असेच काही तरी व्हावे, अशी जळगावकरांची अपेक्षा आहे. केळी पावडर, वेफर्स यापुरती मर्यादीत राहिलेला प्रक्रिया उद्योग मोठ्या स्वरुपात होण्याची नितांत गरज आहे. नाशवंत फळ असल्याने त्याच्या दळणवळणाच्या मर्यादा आहेत. कष्ट करुनही त्याचे योग्य मोल शेतकरी बांधवांला मिळत नाही, हे लक्षात घेऊन याचठिकाणी प्रक्रिया उद्योगासाठी काय करता येईल, यावर आता नव्यापिढीने विचार करायला हवा. नंदुरबार जिल्ह्यातील आमचूरसंबंधी विचार व्हायला हवा. आदिवासींसाठी आंबा हा कल्पवृक्ष आहे, पण प्रक्रिया उद्योग नसल्याने ते केवळ व्यापाºयाचे धन होत आहे.चेतक फेस्टिवल, भरिताच्या विश्वविक्रमामुळे सुरुवात तर चांगली झाली, असेच म्हणायला हवे.

टॅग्स :Jalgaonजळगावfoodअन्न