शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

मैलाचा दगड !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 22:12 IST

आपल्या भागात उत्पादित मालाचे व्यवस्थित विपणन केल्याशिवाय जगाला त्याचे महत्त्व कळणार नाही. बोलणाऱ्याचे बोंड विकले जातील, पण गप्प बसणाºयाचे सोने विकले जाणार नाही, ही म्हण उगाच नाही वापरली जात.

मिलिंद कुलकर्णीआपल्या भागात उत्पादित मालाचे व्यवस्थित विपणन केल्याशिवाय जगाला त्याचे महत्त्व कळणार नाही. बोलणाऱ्याचे बोंड विकले जातील, पण गप्प बसणाºयाचे सोने विकले जाणार नाही, ही म्हण उगाच नाही वापरली जात.खान्देशात आता हळूहळू यासंबंधी जागरुकता तयार होऊ लागली आहे, हे सुचिन्ह म्हणावे लागेल. काही व्यक्ती, संस्था त्यादृष्टीने प्रयत्न करीत आहे, हे कौतुकास्पद आहे.नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथील महानुभाव पंथींयांचे एकमुखी दत्त मंदीर आणि तेथे दत्तजयंतीला होणारा यात्रोत्सव, घोडे बाजार प्रसिध्द आहे. पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने तेथे येतात. अश्वशौकीन घोडेबाजारात आवर्जून येतात. पण यात्रोत्सवाला देशपातळीवर नेण्यासाठी पर्यटनमंत्री आणि नंदुरबारचे पालकमंत्री जयकुमार रावल, सारंगखेड्याचे नेते जयपालसिंह रावल यांनी पुढाकार घेऊन ‘चेतक फेस्टिवल’ची संकल्पना साकारली. राज्य सरकारच्या पर्यटन महामंडळाने या उत्सवासाठी अर्थसहाय्य देऊ केले. त्यामुळे केवळ आठवड्यासाठी असणारी ही यात्रा आता महिनाभरासाठी होऊ लागली आहे. टेन्ट सिटी, सारंगखेडा बंधाºयाच्या जलाशयाचा उपयोग करुन जलक्रीडा, चित्र प्रदर्शन, साहसी क्रीडा प्रकार, सांस्कृतिक कार्यक्रम असे वेगवेगळे उपक्रम नियोजित करण्यात आले. सुरुवातीला प्रतिसाद कमी असला तरी हळूहळू गर्दी वाढेल. चर्चा होईल, हा विश्र्वास निश्चित येतो. सारंगखेड्यासारख्या आडवळणाच्या गावात असा महोत्सव आयोजित करुन एक चांगला पायंडा सुरु झाला.मराठी प्रतिष्ठानने प्रसिध्द शेफ विष्णू मनोहर यांच्या सहकार्याने ३७०० किलो भरीत बनविण्याचा विश्वविक्रम साकारला. जळगाव आणि वांग्याचे भरीत हे समीकरण आहे. हिवाळ्याच्या चार महिन्यात हिरव्या मोठ्या वांग्यांना खास चव असते. कांद्याची पात, लसूण, मिरची याचा उपयोग करीत तुरकाठ्यांवर भाजलेल्या वांग्याचे भरीत आणि कांदा, मुळा, गाजर, कळण्याच्या भाकरी किंवा पुºया, कोशिंबीर असा मेनू असला की पंचपक्वानापेक्षा त्याची चव खवैय्यांना खुणावते. जगभर गेलेले जळगावकर भरीताचे दिवाने आहेत. केळीच्या मळ्यात होणाºया भरित पार्ट्यांना हुरडा पार्टीसारखी लज्जत असते. मुंबई, पुण्यात राहणाºया मूळ जळगावकरांसाठी या चार महिन्यात वांगे आणि कांद्याची पात, किंवा तयार भरित पाठविण्याची खास व्यवस्था केली जाते. गावोगाव भरीत विक्रीचे अनेक केंद्र हे खवैयांच्या जिभेचे चोचले पुरवितात. याच भरिताला जागतिक ओळख देण्यासाठी प्रसिध्द शेफ विष्णू मनोहर यांनी ‘विश्वविक्रमा’चा संकल्प सोडला. मराठी प्रतिष्ठानचे हरहुन्नरी कार्यकर्ते विजय वाणी आणि जमील देशपांडे यांनी हा संकल्प प्रत्यक्षात उतरवण्यासाठी पुढाकार घेतला. दत्तात्रय चौधरी आणि त्यांच्या सहकाºयांनी जळगावच्या उपक्रमात सहभाग देऊन हा उपक्रम यशस्वी केला. विश्वविक्रमाच्या निमित्ताने जळगावच्या भरिताची चर्चा झाली. पुढे मनोहर यांच्या पुढाकाराने भरित अटकेपार जाईल, असा विश्वास निर्माण झाला आहे.केळीच्या बाबतीत असेच काही तरी व्हावे, अशी जळगावकरांची अपेक्षा आहे. केळी पावडर, वेफर्स यापुरती मर्यादीत राहिलेला प्रक्रिया उद्योग मोठ्या स्वरुपात होण्याची नितांत गरज आहे. नाशवंत फळ असल्याने त्याच्या दळणवळणाच्या मर्यादा आहेत. कष्ट करुनही त्याचे योग्य मोल शेतकरी बांधवांला मिळत नाही, हे लक्षात घेऊन याचठिकाणी प्रक्रिया उद्योगासाठी काय करता येईल, यावर आता नव्यापिढीने विचार करायला हवा. नंदुरबार जिल्ह्यातील आमचूरसंबंधी विचार व्हायला हवा. आदिवासींसाठी आंबा हा कल्पवृक्ष आहे, पण प्रक्रिया उद्योग नसल्याने ते केवळ व्यापाºयाचे धन होत आहे.चेतक फेस्टिवल, भरिताच्या विश्वविक्रमामुळे सुरुवात तर चांगली झाली, असेच म्हणायला हवे.

टॅग्स :Jalgaonजळगावfoodअन्न