शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

युवकांना जोडण्यासाठी काँग्रेसचा संदेश... मूल्य तीच, मुलं नवी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2019 05:12 IST

नवीन तरुणांना पक्षात संधी देऊन नव्या महाराष्ट्राचा पाया रचणे हा उद्देश घेऊन आम्ही काम सुरू केलंय. महाराष्ट्रात कुणाचे सरकार येणार हे मंथन गत महिन्यापासून सुरू होते. भाजप हा केंद्रातील सत्ताधारी पक्ष लोकशाहीचा वापर कशा पद्धतीने करतो आहे हेही यानिमित्ताने पुन्हा एकदा दिसले.

- सत्यजीत तांबे (प्रदेशाध्यक्ष, युवक काँग्रेस, महाराष्ट्र) महाराष्ट्रात कुणाचे सरकार येणार हे मंथन गत महिन्यापासून सुरू होते. भाजप हा केंद्रातील सत्ताधारी पक्ष लोकशाहीचा वापर कशा पद्धतीने करतो आहे हेही यानिमित्ताने पुन्हा एकदा दिसले. अगदी चहाच्या टपरीपासून ते १० जनपथ व ७ रेसकोर्सपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणाचीच चर्चा झाली. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात काँग्रेस संपली, अशी चर्चा सुरू झाली होती. कारण लोकसभेला पक्षाचा फक्त एकच खासदार निवडून आला. मात्र त्या परिस्थितीतून भरारी घेत आज राज्यात काँग्रेस सत्तेपर्यंत पोहोचू शकली.१९७७ च्या पराभवानंतर इंदिराजी जेव्हा नागपूरला आल्या होत्या तेव्हा पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाल्या, ‘हारे है तो क्या हुआ, फिर जितेंगे.’ तेव्हा ‘लोकमत’मध्ये हा मुख्य मथळा होता. या त्यांच्या एका वाक्याने वातावरण भारावले व काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोश संचारला. ‘फिर जितेंगे’ हा आशावाद काँग्रेस पक्ष सतत ठेवत आला. आज राज्यात काँग्रेसची अवस्था खूप चांगली नसली तरीही जनता मात्र काँग्रेसची परिस्थिती सुधारावी, पक्षाने पुढाकार घेऊन जनतेचे प्रश्न सोडवावेत याची आस लावून बसली आहे. एखाद्या पक्षाबाबत जनतेचे असे आश्वासक मत असणे याला खूप महत्त्व आहे. विधानसभा निवडणूक ताकदीने न लढताही जनतेने काँग्रेसला साथ दिली. याचा अर्थ जनता व काँग्रेस यांचे एक नाते आहे. हे नाते पक्षाच्या युवक कार्यकर्त्यांनी ओळखणे आवश्यक आहे.

जयप्रकाश नारायण म्हणाले होते, ‘मै धुनी युवकों के तलाश मे हूँ.’ माओही म्हटला, ‘कॅच देम यंग.’ हे ते राष्टÑनिर्मितीसाठी म्हणाले होते. राजकीय पक्षाचे कार्य हाही राष्ट्रनिर्मितीचाच भाग असतो. त्यामुळे राज्यात काँग्रेस उभी करावयाची असेल तर भारावलेली युवा पिढी शोधावी लागेल. २३ ऑक्टोबरला झालेल्या मतमोजणीनंतर आम्ही तसा प्रयत्न सुरूही केला आहे. ‘मूल्य तीच, मुलं नवी’ हा युवक काँग्रेसचा नारा आहे. आम्हाला नवी मुलं हवी आहेत. पण, आमची लोकशाहीची मूल्य मात्र तीच आहेत. देशात लोकशाही व मूल्यव्यवस्थाच मोडीत काढण्याचे पद्धतशीर प्रयत्न सुरू आहेत. लोकांनी स्वत: विचारच न करता अंधपणे आमच्या पाठीशी यावे, असा काही राजकीय पक्षांचा व संघटनांचा प्रयत्न आहे. काँग्रेसचे मात्र ते धोरण नाही. लोकांनी लोकशाही, राष्ट्रवाद, धर्मनिरपेक्षता, समाजवाद ही घटनेला अभिप्रेत असलेली मूल्ये पाळावीत असा आग्रह काँग्रेसने सतत धरला. समाजात जाती, धर्माच्या आधारे भेद पाडणे, दुर्बलांवर अन्याय करणे हे काँग्रेसला कदापिही मान्य नाही. आम्हाला ही मूल्यव्यवस्था जपणारी नवी पिढी हवी आहे.म्हणून तरुण मुले शोधा व त्यांना जोडा हा आमचा कार्यक्रम आहे. यशवंतराव चव्हाण जर रत्नपारखी नसते तर कॉलेजच्या राजकारणातील शरद पवार आज आपणाला कदाचित दिसलेच नसते. आता काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी यशवंतराव चव्हाणांची भूमिका वठवून नवे चेहरे शोधावेत ही आम्हा युवकांची अपेक्षा आहे. युवक काँग्रेस अध्यक्षपदाच्या एक वर्षाच्या कारकिर्दीत आम्ही ‘वेक अप महाराष्ट्र’, ‘मैं भी नायक’, ‘निषेधासन’, ‘सुपर ६०’, ‘चलो पंचायत अभियान’, ‘चलो घर-घर अभियान’, ‘युवा क्रांती यात्रा’ हे कार्यक्रम राबविले. आंदोलने केली. आता आम्ही संघटन बांधणीवर लक्ष देत आहोत. सामान्य परिवारातील, राजकीय कौटुंबिक पार्श्वभूमी आहे मात्र संधी मिळाली नाही, जुन्या पिढीतील निष्ठावान काँग्रेस परिवारातील मुले अशा सर्वांना जोडण्याचा प्रयत्न आहे. मागील आठवड्यात मी मुंबईला अनेक तरुणांना भेटलो. संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त करण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून तरुण मुंबईला आले होते. पूर्ण वेळ प्रचारकांची टीम, बौद्धिके, प्रशिक्षण असा आमचा कार्यक्रम असेल. वर्धा येथील सेवाग्राम आश्रमात नेऊन बौद्धिक घेतले जाईल. युवक काँग्रेस ही काँग्रेसची प्रशिक्षण शाळाच आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांत ८० टक्के नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा मानस आहे.
विधानसभा निवडणुकीत आम्ही युवकांच्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून ठळक मुद्दे समोर आणले. त्याची अंमलबजावणी करून घ्यावयाची आहे. मधल्या काळात अनेक नेते पक्ष सोडून गेले़ त्या वेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात सांगत होते, ‘हीच संधी आहे, नवीन नेतृत्व तयार करण्याची.’ काँग्रेसचा विचार हा शाश्वत व स्थिर आहे. नवीन पिढीला तो भावतो. हा विचार जनतेला आश्वासक व नैसर्गिक वाटतो. फक्त गरज आहे हा विचार तरुणांपर्यंत पोहोचविण्याची. 

टॅग्स :congressकाँग्रेसPoliticsराजकारणSatyajit Tambeसत्यजित तांबे