शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

समाजातील लोकांची मानसिकताच अपराधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 06:32 IST

वयात आलेल्या मुला-मुलींना जोडीदार निवडण्याचा अधिकार आहे. पूर्वीच्या पिढ्यांनी त्यासाठी लावलेले जाती-धर्माचे निकष नव्या पिढ्यांना मान्य होतीलच असे नाही. हा एखाद्या जातीचा, गावाचा अपराध नव्हे, तो समाजाचाही गुन्हा आहे.

मुलीने आंतरजातीय विवाह केला म्हणून ती व तिचा नवरा माहेरी आले असता त्यांना मारहाण करून व घरात कोंडून जाळून टाकण्याचा नगर जिल्ह्यातील निधोज या गावी घडलेला प्रकार जेवढा अघोरी तेवढाच तो समाजविरोधी आहे. या प्रकरणातील आरोपींना कायदा कठोरातली कठोर शिक्षा देईलही. मात्र ही घटना समाजाला फार हादरून टाकणारी व त्याच्या प्रगतीविषयक सद्य:स्थितीविषयी त्याला अंतर्मुख करून विचार करायला भाग पाडणारीही आहे. लोकशाहीतील मताधिकाराने व स्वातंत्र्य आणि समतेसारख्या अधिकारांनी समाजमन अधिक खुले व मोकळे होण्याची गरज आहे.

अशा अवस्थेत आपापल्या जाती-धर्मांची कुंपणे आतून घट्ट व मजबूत करणाऱ्या कर्मठ मनोवृत्ती सर्वच जाती-धर्मात अजून राहिल्या आहेत व त्या आपल्याच पोटच्या मुलांचा जाळून खून करण्याएवढ्या दुष्ट व भीषण पातळीवर जाणाºया आहेत. आपली सामाजिक सुधारणा नुसती व्यर्थच नव्हे तर वाया गेली आहे, असे म्हणायला लावणारी ही स्थिती आहे. राजा राममोहन राय, जोतिबा, गांधीजी, आंबेडकर आणि सावरकर ही सारी मोठी माणसे जातीच्या बंधनांविरुद्ध होती. आंतरजातीय विवाह दोन्ही बाजूंच्या मान्यतेने होत असतील तर त्यांचा गौरव करणारी होती. समाजात खरे ऐक्य व आपलेपणा वाढीला लागायचा असेल तर त्यावर आंतरजातीय विवाह हाच खरा व प्रमुख मार्ग आहे असे ते म्हणत. शाळा-कॉलेजांतूनही हे साऱ्यांच्या कानीकपाळी ओरडून सांगितले जाते. पण महापुरुषांची शिकवण आणि प्रगतीचे धडे समाजाच्या कानापर्यंतच जात असतील आणि मनापर्यंत पोहोचत नसतील तर समाजात असे अघोरी प्रकार घडतच राहणार. रुक्मिणी आणि रणसिंग हे वधू-वर त्यांच्याच कुटुंबीयांकडून जाळले जाणार असतील तर हा सुधारणेचा इतिहास या समाजावर कोणताही परिणाम करू शकला नाही, असेच म्हटले पाहिजे. देशात स्वातंत्र्य आहे, वयात आलेल्या मुला-मुलींना आपला जोडीदार निवडून घेण्याचा अधिकार आहे.
पूर्वीच्या पिढ्यांनी त्यासाठी लावलेले जाती-धर्माचे निकष नव्या पिढ्यांना मान्य होतीलच असे समजण्याचेही कारण नाही. सबब ती मुले व मुली आपले साथीदार निवडतात. तसे निवडण्याचे स्वातंत्र्य त्यांना असणे ही अभिमानाचीही बाब आहे. मात्र त्यांच्यावर आपला कौटुंबिकच नव्हे तर मालकी हक्क सांगणारी जुनी पिढी त्यांना तिचे जुने निकष व अटी लावीत असेल तर ते त्यांच्या कर्मठच नव्हे तर मागासलेल्या मनोवृत्तीचे चिन्ह मानले पाहिजे. शाळेत ‘जात’ नाही, वर्गात नाही, नोकरीत नाही आणि आता समाजातही नाही. असलीही तरी ती आता संपण्याचा मार्गावर आहे. या स्थितीत तीच ती जुनी कुंपणे नव्या पिढ्यांभोवती लावण्यात ज्यांना परंपरेचा अभिमान व घराण्याची श्रेष्ठता दिसते त्यांना परंपराही कळली नसते आणि घराण्याचे तत्त्वही समजले नसते.परंपरा आणि प्रतिष्ठा या काळानुरूप बदलणाºया बाबी आहेत आणि ते ओळखणे हे जुन्या पिढ्यांचे काम आहे. ते ओळखून नव्या जगाला सामोरे जाण्यासाठी मन व घर खुले करणे ही त्यांची जबाबदारी आहे. परंतु या मार्गात अडचणी फार आहेत आणि त्या पुन्हा जुनाट व पारंपरिकच आहेत. अजून येथे जातींचे मोर्चे निघतात, जातीनिहाय मतदान केले जाते, जातींची व्यासपीठे उभी होतात, फार काय, एकेका जातीचा एकेक राजकीय पक्ष आपल्या राजकारणात असतो. पराकोटीचा विरोध, अवहेलना आणि तिरस्कार सोसून आंतरजातीय विवाह करण्यासाठी धैर्य लागते. या साºयांना भेदून आंतरजातीय विवाहापर्यंत जाणे ही गोष्ट साधी नाही. ज्यांना ती साधली त्यांचे अभिनंदन व स्वागत. मात्र जातीपाशी व धर्मापाशी अडकलेल्यांचे व त्यांना राजकीय पाठबळ देणा-या व्यवस्थेचे काय करायचे? ज्यांच्या राजकारणाचा व समाजकारणाचा भरच जातीवर आहे ते कर्मठ त्यातील भिंती आणखी मजबूतच करणार. त्याला परंपरेचा मुलामाही देणार. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यात जे घडले तो एका घराचा, कुटुंबाचा, जातीचा व गावाचा अपराध नव्हे, तो समाजाचा व राजकारणाचाही गुन्हा आहे. तशी मानसिकता बाळगणारा प्रत्येकच जण यातला अपराधी आहे. 

टॅग्स :SocialसामाजिकMaharashtraमहाराष्ट्र