शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
2
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
3
भारत आणि चीनचं टेन्शन वाढवणार युरोपियन युनियन! अमेरिकेच्या समोर झुकलं का EU?
4
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
5
6G क्षेत्रात भारताची मोठी झेप, IIT हैदराबादने विकसित केले प्रोटोटाइप; 2030 पर्यंत लॉन्च होणार
6
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
7
ITR भरण्यासाठी उरले शेवटचे काही तास! आयकर विभागाकडून करदात्यांसाठी ६ टिप्स
8
Pitru Paksha 2025: काही लोक जिवंतपणी स्वत:चे श्राद्ध करवून घेतात; पण का आणि कुठे? वाचा!
9
बाबांसाठी घड्याळ, आईला कानातले पण ते...; अधिकाऱ्याच्या लेकाची काळजात चर्र करणारी गोष्ट
10
'भारत तर टॅरिफचा महाराजा, त्यांच्यामुळे अमेरिकेच्या कामगारांचे...'; डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागाराचा आरोप
11
भारतीय नवराच हवा! न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरवर फलक घेऊन उभी राहिली तरुणी
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
13
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
14
टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुपरफास्ट ३००० धावा; विराट दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
15
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
16
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
17
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
18
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
19
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
20
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव

मेगाभरती उठली मुळावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 22:23 IST

भाजपचे संख्याबळ १२२ वरुन १०५ वर आले. ६३ वरुन ५६ वर आल्याने सेनेचेही बळ घटले.

मिलिंद कुलकर्णीयशाचे श्रेय अनेक जण घेतात, पण अपयशाला कोणीही वाली नसतो अशा आशयाची म्हण आहे. विधानसभा निवडणुकीनंतर त्याची आठवण हमखास मराठी जनांना येत आहे. भाजपचे संख्याबळ १२२ वरुन १०५ वर आले. ६३ वरुन ५६ वर आल्याने सेनेचेही बळ घटले. पाच वर्षे सत्तेत राहून आणि युती म्हणून मतदारांना सामोरे गेल्यावर असा निकाल येत असेल तर याची जबाबदारी दोन्ही पक्षांच्या प्रमुखांनी आणि पदाधिकाऱ्यांनी घ्यायला हवी. परंतु, तसे होताना दिसत नाही. बहुमत मिळविल्याचा आनंद साजरा करताना काही फसलेल्या रणनीतीकडे साफ डोळेझाक केली जात आहे.भाजप आणि सेना या दोन्ही पक्षांनी निवडणुकीच्या तोंडावर मेगाभरती केली. जळगाव, धुळे, नाशिक महापालिका निवडणुकीत हाच फॉर्म्युला वापरण्यात आला आणि तो यशस्वी ठरला. तोच कित्ता विधानसभा निवडणुकीत गिरवायचा ठरवला, परंतु, जनमानसाचा अंदाज घेताना दोन्ही पक्षाचे धुरीण चुकले. एकीकडे समाजातील सर्वच घटकांमध्ये सरकारविरोधी वातावरण होते. ते कमी करण्यासाठी फार तर तुम्ही काही उमेदवार बदलून पक्षातील निष्ठावंत, नवे चेहरे दिले असते तर एकवेळ चालून गेले असते. परंतु, काँग्रेस-राष्टÑवादीमधील प्रस्थापित नेत्यांना घेऊन सत्ताधारी पक्ष निवडणुकीला सामोरे गेला आणि नाराजी दुप्पट वेगाने मतदान यंत्रात नोंदविली गेली.खान्देशातील उदाहरणे घेऊया. शिरपूरचे अमरीशभाई पटेल यांना भाजपमध्ये घेण्यात आले. धुळ्यात माजी केंद्रीय मंत्री डॉ.सुभाष भामरे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल हे दिग्गज नेते असताना आणखी एका वजनदार नेत्याचा प्रवेश झाला. साक्रीत पटेल व रावल यांनी मंजुळा गावीत यांना डावलून मोहन सूर्यवंशी या निवृत्त अभियंत्याला तिकीट दिले. धुळे शहर मतदारसंघातील घोळ अद्याप भल्याभल्यांना उमजत नाही. खासदार, आमदार आणि महापालिका भाजपच्या ताब्यात असताना ही जागा शिवसेनेला सोडताना कोणता तर्क लावला गेला हे कळायला मार्ग नाही. शेजारील जळगावात अशीच स्थिती असताना भाजपने सेनेची मागणी असूनही जागा सोडली नाही. बरे, सेनेला सोडली तर पटेल गटाचे राजवर्धन कदमबांडे यांना अपक्ष म्हणून उभे करण्यात आले. त्यांना पक्षाच्या नेत्यांनी उघड बळ दिले. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केलेले डॉ.फारुक शाह यांनी एमआयएमची उमेदवारी स्विकारली. हे सगळे अनिल गोटे यांना रोखण्यासाठी असेल, असे समर्थन केले जात असेल तर भाजपच्या हाती काय लागले? विश्वासघात, दगलबाज अशी शिवसेनेकडून झालेली संभावना, एमआयएमचा उमेदवार निवडून आल्याने हिंदू व्होट बँकेला बसलेला धक्का आणि भाजपविषयी निर्माण झालेली नाराजीची लाट. याठिकाणी भाजप नेत्यांची रणनीती पुरती फसली.दोन वेळा भाजपकडून निवडणूक लढवून पराभूत झालेल्या, भाजपच्या पहिल्या महिला महापौर म्हणून ओळखल्या जाणाºया अपक्ष आमदार मंजुळा गावीत यांनी पक्षनेत्यांना बोल लावत शिवसेनेला समर्थन दिले, ही मोठी चपराक आहे. डॉ.जितेंद्र ठाकूर पराभूत झाले असले तरी भाजपमधील निष्ठावंत कार्यकर्ता दुखावला गेला हे दुर्लक्षून चालणार नाही. एवढे सगळे करुन भाजपचे संख्याबळ २०१४ मध्ये होते, तेवढेच दोन राहिले. मग मिळविले काय, याचा विचार होण्याची शक्यता तशी कमीच आहे.तिकडे नंदुरबार जिल्ह्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावीत व त्यांचे पूत्र जि.प.चे माजी अध्यक्ष भरत गावीत यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. नवापूरमध्ये भरत तिसºया क्रमांकावर राहिले. भाजपचे दुसरे नेते डॉ.विजयकुमार गावीत यांचे बंधू हे त्याठिकाणी दुसºया क्रमांकावर राहिले. मग भरत यांच्याऐवजी शरद यांना उमेदवारी का दिली गेली नाही? असा प्रश्न उपस्थित होतोच. डॉ.गावीत यांचे शालक जगदीश वळवी हे गेल्या निवडणुकीत चोपड्यात भाजपचे उमेदवार होते, यंदा ते राष्टÑवादीतर्फे लढले. अर्थात पराभूत झाले. तिकडे नाशिक जिल्ह्यात भरत गावीत यांच्या भगिनी आमदार निर्मला गावीत यांनी काँग्रेस सोडून सेनेचे शिवबंधन बांधले. पण मतदारांनी दोन्ही भावंडांना नाकारले.काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत रघुवंशी सेनेत आले, पण तरीही नंदुरबार जिल्ह्यात सेनेचा पहिला आमदार निवडून येऊ शकला नाही. काँग्रेसच्या के.सी.पाडवी यांनी विक्रम नोंदविला.अमळनेर हा भाजपचा गड असताना सहयोगी आमदार शिरीष चौधरी यांना भाजपची उमेदवारी देण्यात आली. दोन वेळा भाजपकडून पराभूत झालेले अनिल भाईदास पाटील यंदा राष्टÑवादीकडून नशिब अजमावत असताना मतदारांनी त्यांच्या पदरात यश घातले.मतदारांनी दिलेल्या कौलाचा दोन्ही सत्ताधारी पक्षांनी अभ्यास केला तर पुढील वाटचाल सुकर राहील. अन्यथा येरे माझ्या मागल्या, असेच होईल.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव