शहरं
Join us  
Trending Stories
1
इसकी टोपी उसके सर और उसकी...; कोकाटे आणि दत्तात्रय भरणे यांच्यातील मंत्रि‍पदाची आदलाबदली!
2
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
3
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
4
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
5
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
6
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
7
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
8
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
9
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
10
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
11
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
12
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
13
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
14
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
15
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
16
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
17
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
18
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
19
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
20
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्

मेगाभरती उठली मुळावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 22:23 IST

भाजपचे संख्याबळ १२२ वरुन १०५ वर आले. ६३ वरुन ५६ वर आल्याने सेनेचेही बळ घटले.

मिलिंद कुलकर्णीयशाचे श्रेय अनेक जण घेतात, पण अपयशाला कोणीही वाली नसतो अशा आशयाची म्हण आहे. विधानसभा निवडणुकीनंतर त्याची आठवण हमखास मराठी जनांना येत आहे. भाजपचे संख्याबळ १२२ वरुन १०५ वर आले. ६३ वरुन ५६ वर आल्याने सेनेचेही बळ घटले. पाच वर्षे सत्तेत राहून आणि युती म्हणून मतदारांना सामोरे गेल्यावर असा निकाल येत असेल तर याची जबाबदारी दोन्ही पक्षांच्या प्रमुखांनी आणि पदाधिकाऱ्यांनी घ्यायला हवी. परंतु, तसे होताना दिसत नाही. बहुमत मिळविल्याचा आनंद साजरा करताना काही फसलेल्या रणनीतीकडे साफ डोळेझाक केली जात आहे.भाजप आणि सेना या दोन्ही पक्षांनी निवडणुकीच्या तोंडावर मेगाभरती केली. जळगाव, धुळे, नाशिक महापालिका निवडणुकीत हाच फॉर्म्युला वापरण्यात आला आणि तो यशस्वी ठरला. तोच कित्ता विधानसभा निवडणुकीत गिरवायचा ठरवला, परंतु, जनमानसाचा अंदाज घेताना दोन्ही पक्षाचे धुरीण चुकले. एकीकडे समाजातील सर्वच घटकांमध्ये सरकारविरोधी वातावरण होते. ते कमी करण्यासाठी फार तर तुम्ही काही उमेदवार बदलून पक्षातील निष्ठावंत, नवे चेहरे दिले असते तर एकवेळ चालून गेले असते. परंतु, काँग्रेस-राष्टÑवादीमधील प्रस्थापित नेत्यांना घेऊन सत्ताधारी पक्ष निवडणुकीला सामोरे गेला आणि नाराजी दुप्पट वेगाने मतदान यंत्रात नोंदविली गेली.खान्देशातील उदाहरणे घेऊया. शिरपूरचे अमरीशभाई पटेल यांना भाजपमध्ये घेण्यात आले. धुळ्यात माजी केंद्रीय मंत्री डॉ.सुभाष भामरे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल हे दिग्गज नेते असताना आणखी एका वजनदार नेत्याचा प्रवेश झाला. साक्रीत पटेल व रावल यांनी मंजुळा गावीत यांना डावलून मोहन सूर्यवंशी या निवृत्त अभियंत्याला तिकीट दिले. धुळे शहर मतदारसंघातील घोळ अद्याप भल्याभल्यांना उमजत नाही. खासदार, आमदार आणि महापालिका भाजपच्या ताब्यात असताना ही जागा शिवसेनेला सोडताना कोणता तर्क लावला गेला हे कळायला मार्ग नाही. शेजारील जळगावात अशीच स्थिती असताना भाजपने सेनेची मागणी असूनही जागा सोडली नाही. बरे, सेनेला सोडली तर पटेल गटाचे राजवर्धन कदमबांडे यांना अपक्ष म्हणून उभे करण्यात आले. त्यांना पक्षाच्या नेत्यांनी उघड बळ दिले. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केलेले डॉ.फारुक शाह यांनी एमआयएमची उमेदवारी स्विकारली. हे सगळे अनिल गोटे यांना रोखण्यासाठी असेल, असे समर्थन केले जात असेल तर भाजपच्या हाती काय लागले? विश्वासघात, दगलबाज अशी शिवसेनेकडून झालेली संभावना, एमआयएमचा उमेदवार निवडून आल्याने हिंदू व्होट बँकेला बसलेला धक्का आणि भाजपविषयी निर्माण झालेली नाराजीची लाट. याठिकाणी भाजप नेत्यांची रणनीती पुरती फसली.दोन वेळा भाजपकडून निवडणूक लढवून पराभूत झालेल्या, भाजपच्या पहिल्या महिला महापौर म्हणून ओळखल्या जाणाºया अपक्ष आमदार मंजुळा गावीत यांनी पक्षनेत्यांना बोल लावत शिवसेनेला समर्थन दिले, ही मोठी चपराक आहे. डॉ.जितेंद्र ठाकूर पराभूत झाले असले तरी भाजपमधील निष्ठावंत कार्यकर्ता दुखावला गेला हे दुर्लक्षून चालणार नाही. एवढे सगळे करुन भाजपचे संख्याबळ २०१४ मध्ये होते, तेवढेच दोन राहिले. मग मिळविले काय, याचा विचार होण्याची शक्यता तशी कमीच आहे.तिकडे नंदुरबार जिल्ह्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावीत व त्यांचे पूत्र जि.प.चे माजी अध्यक्ष भरत गावीत यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. नवापूरमध्ये भरत तिसºया क्रमांकावर राहिले. भाजपचे दुसरे नेते डॉ.विजयकुमार गावीत यांचे बंधू हे त्याठिकाणी दुसºया क्रमांकावर राहिले. मग भरत यांच्याऐवजी शरद यांना उमेदवारी का दिली गेली नाही? असा प्रश्न उपस्थित होतोच. डॉ.गावीत यांचे शालक जगदीश वळवी हे गेल्या निवडणुकीत चोपड्यात भाजपचे उमेदवार होते, यंदा ते राष्टÑवादीतर्फे लढले. अर्थात पराभूत झाले. तिकडे नाशिक जिल्ह्यात भरत गावीत यांच्या भगिनी आमदार निर्मला गावीत यांनी काँग्रेस सोडून सेनेचे शिवबंधन बांधले. पण मतदारांनी दोन्ही भावंडांना नाकारले.काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत रघुवंशी सेनेत आले, पण तरीही नंदुरबार जिल्ह्यात सेनेचा पहिला आमदार निवडून येऊ शकला नाही. काँग्रेसच्या के.सी.पाडवी यांनी विक्रम नोंदविला.अमळनेर हा भाजपचा गड असताना सहयोगी आमदार शिरीष चौधरी यांना भाजपची उमेदवारी देण्यात आली. दोन वेळा भाजपकडून पराभूत झालेले अनिल भाईदास पाटील यंदा राष्टÑवादीकडून नशिब अजमावत असताना मतदारांनी त्यांच्या पदरात यश घातले.मतदारांनी दिलेल्या कौलाचा दोन्ही सत्ताधारी पक्षांनी अभ्यास केला तर पुढील वाटचाल सुकर राहील. अन्यथा येरे माझ्या मागल्या, असेच होईल.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव