शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

संपत्तीच्या अधिकाराचा अर्थ आणि अनर्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 03:31 IST

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेचच भारतीय संविधानात दिलेल्या निर्देशांनुसार, भारतात सामाजिक आणि आर्थिक लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी तत्कालीन केंद्र आणि राज्य सरकारांनी जोरदार प्रयत्न सुरू केले होते.

- डॉ.रविनंद होवाळभारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेचच भारतीय संविधानात दिलेल्या निर्देशांनुसार, भारतात सामाजिक आणि आर्थिक लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी तत्कालीन केंद्र आणि राज्य सरकारांनी जोरदार प्रयत्न सुरू केले होते. जमीन सुधारणा कायदे पारित करणे, उद्योगांचे आणि बँकांचे राष्ट्रीयीकरण करणे यांसारखी निर्णायक पावलेही केंद्र आणि राज्य सरकारांनी या काळात उचलली, परंतु सरकारचे हे कल्याणकारी पाऊल दुर्दैवाने अर्ध्यातच रोखले गेले!प्राचीन भारतीय समाजात संपत्तीचे न्याय्य वाटप हा मुद्दा मोठ्या प्रमाणात दुर्लक्षित राहिला होता. मनुस्मृतीसारख्या ग्रंथांनी स्त्रिया व बहुजनांना संपत्तीचा अधिकार नाही, अशा शब्दांत संपत्तीच्या विषम वाटपाला मान्यता दिली होती. मोगलांच्या काळातही या स्थितीत मोठे परिवर्तन झाले नाही.१९५0 साली स्वतंत्र भारतासाठी ‘भारतीय संविधान’ आपण स्वीकारले, तेव्हाच भारतात राजकीय लोकशाहीसोबत सामाजिक आणि आर्थिक लोकशाही प्रस्थापित करण्याचे आव्हान भारतीय सरकारांपुढे निर्माण झालेले होते. ‘भारतीय जनते’ने सर्व भारतीयांच्या ‘संपत्तीच्या अधिकारा’ला मूलभूत अधिकार म्हणून मान्यताही दिलेली होती. मात्र, भारतातील मध्यवर्ती, प्रांतिक आणि स्थानिक सरकारांकडून अपेक्षित असलेल्या कल्याणकारी कामांचे एकंदर अवाढव्य स्वरूप व तत्कालीन भारत सरकारची एकंदर शक्ती यांचा विचार करता, सरकारच्या कामात काही कमतरता किंवा त्रुटी राहिल्यास, त्यांना प्रत्येक वेळी न्यायालयात खेचणे व्यवहार्य ठरणार नाही, हे भारतीय संविधानकारांनी जाणले होते. त्यामुळेच भारतात सामाजिक, आर्थिक व राजकीयदृष्ट्या न्यायपूर्ण समाजाची निर्मिती व संरक्षण करणे, त्या माध्यमातून लोककल्याण साधणे, भौतिक साधन-संपत्तीचे न्याय्य वितरण करणे, संपत्तीचे एकाच ठिकाणी केंद्रिकरण होऊ न देणे, यांसारखे अनेक महत्त्वपूर्ण निर्देश त्यांनी मार्गदर्शक तत्त्वांतून देऊन ठेवले होते. मात्र, या तरतुदींचा लाभ स्वतंत्र भारताला व त्यातही इथल्या सर्वसाधारण बहुसंख्य समाजाला उठविता आलेला नाही.भारत सरकारकडील एकंदर साधन-संपत्ती, त्या काळातील देशंतर्गत व देशाबाहेरील परिस्थिती इ. मुळे संपत्तीचे न्याय्य वाटप किंवा तिचे विकेंद्रीकरण यांसारख्या मुद्द्यांना मूलभूत अधिकारांच्या प्रकरणात समाविष्ट करता न आल्याचा लाभ या देशातील तत्कालीन गर्भश्रीमंत व जमीनदार वर्गाने पुरेपूर उचलला. संपत्तीच्या अधिकारांची ढाल पुढे करून आपल्या अतिरिक्त संपत्तीचेही त्यांनी संरक्षण केले व भारतात येऊ घातलेल्या आर्थिक लोकशाहीला कळत-नकळत खीळ घातली.स्वतंत्र भारत अजूनही या धक्क्यातून पुरेसा सावरलेला नसून, भारतात आर्थिक लोकशाही कधी येणार? असा प्रश्न या देशातील गोरगरीब लोक व त्यांचे आजही प्रतिनिधी टाहो फोडून विचारत आहेत. धर्म, जात, संस्कृती, प्रथा-परंपरा यांत व्यस्त असलेल्या भारतीय समाजाला या आणि अशा गोष्टींत अजूनही फारसा रस नसल्याचे भयंकर व विचित्र चित्र आज भारतात पाहायला मिळत आहे. संपत्तीच्या अधिकाराने निर्माण केलेला हा पेचप्रसंग मोठा गंभीर असून, तमाम भारतीयांनी व विशेषत: त्यातील सुस्थापित वर्गाने अजूनही याबाबत न्याय्य भूमिका घेणे बाकी आहे.

(प्रवर्तक, संविधान जनजागृती)