शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

फिटो अंधाराचे जाळे...! उद्याच्या सुवासाचा आस्वाद घेण्यासाठी सर्वांना बळ मिळाे, हीच आज प्रार्थना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2021 06:24 IST

Editorial : लाॅकडाऊनच्या उंबरठ्यावर असताना ‘लक्ष्मीची पाऊले’ चित्रपटातील गाणे ओठावर येते. त्यात सुधीर माेघे यांनी केलेल्या शब्दांच्या पेरणीतून उद्याचा सुवास दरवळताे आहे.

चांद्र वर्षाचा आज पहिला दिवस! त्यानिमित्त विजयाची गुढी भक्तिभावाने उभारून नव्या आशा-आकांक्षांची प्रतीक्षा करण्याचा दिन. उद्या महामानव आणि ज्ञानसूर्य डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती! त्याच दिवशी रमजान म्हणजे भाजणे, पाेळणे-उपवासाने सर्व पापे जळून जातात म्हणून ज्या व्रताला रमजान म्हटले जाते, त्याचाही प्रारंभदिन! काेराेनाने गतवर्षीच्या या दिनापासून सर्वत्र उदास-उदास वातावरणाने सर्व अवकाश गर्दीने भरभरून गेले आहे. त्यात नवा आशेचा किरण दिसताे असे वाटत असताच काेराेना संसर्गाची दुसरी लाट गल्लाेगल्ली येऊन थडकली आहे. अशा वातावरणातही मानवी समाजाने माणुसकी आणि चांगुलपणाची वाट साेडलेली नाही.

लाॅकडाऊनच्या उंबरठ्यावर असताना ‘लक्ष्मीची पाऊले’ चित्रपटातील गाणे ओठावर येते. त्यात सुधीर माेघे यांनी केलेल्या शब्दांच्या पेरणीतून उद्याचा सुवास दरवळताे आहे. ते म्हणतात, ‘फिटे अंधाराचे जाळे, झाले माेकळे आकाश, दरीखाेऱ्यातून वाहे, एक प्रकाश प्रकाश, रान जागे झाले सारे, पायवाटा जाग्या झाल्या, सूर्य जन्मता डाेंगरी, संगे जागल्या सावल्या, एक अनाेखे लावण्य, आले भरास, भरास !’ सारे काही आपल्या आजूबाजूला राेजचेच असले तरी वाटेत आलेल्या संकटावर मात करण्याची मानवाची धडपड, जिद्द संपत नाही. त्यातूनच नवा सुवास दरवळत राहतो.

काेराेना संसर्गाने शंभर वर्षांपूर्वीच्या (इसवी सन १९२०) प्लेगमुळे निर्माण झालेल्या काळाेखात आपण लाेटले गेलाे असलो, उदास... उदास झालाे असलाे, तरी नवी किरणे घेऊन येणाऱ्या सूर्याबराेबरच संगे सावल्याही जागविल्या जाणार आहेत. त्याच आशेवर मानवाची धडपड चालू असते. संशाेधन संंस्थेच्या प्रयाेगशाळेत नेत्रांना दुर्बीण लावून बसलेल्या संशाेधकाच्या नजरेपासून अतिदक्षता विभागातील परिचारिकेच्या सलाइनमधून ठिबकत्या थेंबावर असलेल्या नजरेपर्यंतचा प्रयत्न हा नवा आशेचा किरणच तर असतो. चैत्र पाडव्याला आपण याच आशेने गुढी उभारून भक्तिभावाने मांगल्याची सदिच्छा व्यक्त करताे.

उद्या डॉ. बाबासाहेबांची जयंती येत आहे आणि रमजानचे राेजेही सुरू हाेत आहेत. ज्ञानसूर्याच्या जन्माचा दिन या देशात त्याच भक्तिभावाने साजरा होतो! बाबासाहेबांनी या भारतवर्षाला एक नवी लाेकशाही समाजरचना बहाल केली. एक माेठे बळ सर्व भारतीयांना दिले. त्यांचा उत्सवच हा आहे. ताे ज्ञानसंपादनेचा आहे. नव्या समाजरचनेच्या आदर्शाचा आहे. अंधाराचे जाळे फिटावे म्हणूनच त्यांची अखंड धडपड होती. यामुळेच सुधीर माेघे यांच्या या गीताची आज प्रकर्षाने आठवण हाेते. चैत्र मासामध्येच रामनवमी म्हणजेच प्रभू रामचंद्राचा जन्माेत्सव, माेठ्या आदर्शाचा वस्तुपाठ घालून देणाऱ्या मर्यादा पुरुषाेत्तमाचा उत्सव साजरा होतो.

रमजानचे राेजे धरताना उपवास करून आपल्यातील अनावश्यक ऊर्जा जाळून शुद्धतेचा नवा मार्ग आपण धरत असतो. नव्या पायवाटा चाेखाळतो. त्यानिमित्त क्राेध, मत्सर, द्वेष, आदींना बाजूला सारून शांततेचा संदेश मनामनात रुजावा, असा प्रयत्न  असतो.  दरवर्षीचे हे उत्सव, सणवार, जयंत्या आणि नव्या किरणांची ऊब आनंदाने स्वीकारताना काेराेना संसर्गाचे संकट हे या पिढीला नवेच आहे. अशा प्रकारच्या अनेक संसर्गजन्य प्रादुर्भावाने मानवजात नष्ट हाेते का? अशी शंका उपस्थित व्हावी, अशी परिस्थिती उभी राहिली; पण मानवातील सर्वाेच्च मूल्य माणुसकीचे आहे. त्या मूल्याच्या जाेरावर मानव आजवरची वाटचाल करीत आला आहे.

मागील वर्षभरात सूर्यकिरणांनी, पावसाच्या अृमतधारांनी साथ दिली आणि रानं हिरव्या काेंदणांनी भरभरून गेली. तृष्णेला शांत करणाऱ्या पाण्याच्या थेंबांनी जमीन हिरवीगार हाेऊन गेली हाेती. ही आशा निसर्गानेच तर पेरून ठेवली आपल्यासाठी! अशा वातावरणात उदास-उदास न हाेता सारे काही राेजचेच असले तरी नवा सुवास दरवळणार आहे. त्यासाठी आपण साऱ्यांनी मर्यादा पुरुषाेत्तमाप्रमाणे काही मर्यादांच्या लक्ष्मणरेषा आखून घेऊन वर्तणूक करण्याची गरज आहे. सूर्याच्या किरणांची आणि आभाळातून काेसळणाऱ्या थेंबांची काेणतीही किंमत माेजावी लागत नाही याचा अर्थ आपण आपले वर्तन एका मर्यादेच्या पल्याड घेऊन जाणार नाही, याची काळजी घ्यावीच लागणार आहे. त्यासाठी ‘लाेकमत’च्या असंख्य वाचकांना चैत्र पाडव्याच्या, आंबेडकर जयंतीच्या, रमजान ईदच्या आणि रामजन्माेत्सवाच्या भरभरून शुभेच्छा! उद्याच्या सुवासाचा आस्वाद घेण्यासाठी सर्वांना बळ मिळाे, हीच आज प्रार्थना!

टॅग्स :RamzanरमजानDr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती