शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हौतात्म्याला धर्माचा रंग नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 04:12 IST

जम्मू आणि काश्मिरातील सुंजवा येथे जैश-ए-मोहम्मद या अतिरेक्यांच्या संघटनेने केलेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या सात जवानांपैकी पाचजण मुस्लीम होते ही बाब मुसलमान समाजावर सातत्याने ते पाकिस्तानवाले आहेत असे म्हणणा-यांच्या डोळ्यात अंजन घालणारी असली तरी अशा शहादतीला धर्माचा रंग देणे योग्य नव्हे.

जम्मू आणि काश्मिरातील सुंजवा येथे जैश-ए-मोहम्मद या अतिरेक्यांच्या संघटनेने केलेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या सात जवानांपैकी पाचजण मुस्लीम होते ही बाब मुसलमान समाजावर सातत्याने ते पाकिस्तानवाले आहेत असे म्हणणा-यांच्या डोळ्यात अंजन घालणारी असली तरी अशा शहादतीला धर्माचा रंग देणे योग्य नव्हे. मोहम्मद अश्रफ मीर, हबिबुल्लाह कुरेशी, मनझूर अहमद देवा, मोहम्मद इकबाल आणि जुलम-मोईउद्दीन शेख अशी या हुतात्म्यांची नावे असून ते देशासाठी शहीद झाले आहेत. सैन्यास वा सैनिकांना धर्म नसतो, जात-पात-पंथ वा प्रांत नसतो. ते साºया देशाचे संरक्षक असतात. एका अर्थाने ते खरे भारतीय असतात असे म्हणूनच त्यांचा गौरव केला पाहिजे. लष्कराने तो तसा केलाही. परंतु जाती-धर्माचे राजकारण करणाºया पुढाºयांची व राजकारण्यांची वेगळी व सामान्यपणे आपापल्या जाती-धर्माचे समर्थन व संघटन करण्याची वृत्ती असते. त्यातून ज्या देशाच्या राजकारणास धर्माचे रंग चढविण्याची स्पर्धा सुरू झाली असते, त्यात तर अशा संधीची वाट सारेच पुढारी पहात असतात. ‘काश्मिरात शहादत पत्करणारे हे पाचही सैनिक मुसलमान होते ही गोष्ट मुसलमानांना पाकिस्तानी ठरविणाºयांनी लक्षात घेतली पाहिजे.’ इत्तेहादूल मुसलमीन या पक्षाचे अध्यक्ष व खासदार बॅ. असरुद्दीन औवेसी यांचे विधान त्याचमुळे आक्षेपार्ह आहे. भारतीय लष्कराच्या नॉर्दन कमांडचे प्रमुख जनरल देवराज अम्बू यांनी नेमका हाच आक्षेप औवेसी यांच्यावर घेतला आहे. ‘लष्करात आम्ही सारे एक आहोत. आमच्यात धर्म-पंथाची दुही नाही.’ असे सुचवत तशी दुही पसरवण्याचे प्रयत्न दुसºयाही कुणी करू नयेत असेही त्यांनी यातून सुचविले आहे. वास्तविक जनरल अम्बू यांचे हे आवाहन लष्कराने वा पुढाºयांनीच नव्हे तर साºया देशानेच गंभीरपणे घ्यावे व त्यानुसार वागावे हेच अपेक्षित व योग्य आहे. मात्र जाती-धर्मातील वेगळेपणावर उठून राष्ट्रीय होण्यासाठी लागणारे मन ना राजकारण्यांकडे आहे ना पक्षांजवळ. पुढारी धर्मनिरपेक्षतेचा वा राष्ट्रीयतेचा उल्लेख जाहीर भाषणातच तेवढा करतात. प्रत्यक्षात त्यांचे वर्तन या दुहीला वाढ मिळवून देणारेच असते. जनरल अम्बू यांचा हा उपदेश त्याचमुळे एकट्या असरुद्दीन औवेसीनीच नाही, तर तो साºयाच पुढाºयांनी व नागरिकांनीही ध्यानात घ्यावा असा आहे. देशासाठी प्राणपणाने लढणारा सैनिक हिंदू वा मुसलान नसतो. तो शीख वा पारशीही नसतो. तो एक भारतीय असतो. आणि खºया भारतीयाचे लक्षणही तेच आहे. त्यामुळे देशासाठी हौतात्म्य पत्करणाºया जवानांची वा स्वातंत्र्यासाठी प्राण देणाºया देशभक्तांची धर्मवार गणती करणे हा त्यांचा अपमानच नव्हे तर तो देशाशी केलेला द्रोहही आहे. ज्या पाच भारतीय जवानांनी देशासाठी बलिदान केले ते साºया देशासाठीच अभिवादनाचे व अभिमानाचे विषय झालेले वीर आहेत. त्यांना धर्म वा जातीचा रंग चढविण्याचा प्रयत्न कमालीचा निंद्य व हीन आहे. आपल्या समाजातून जात व धर्म यांच्या वृथा अभिमानाचे मूळ जेव्हा नष्ट व्हायचे तेव्हा ते होईलच. मात्र त्याची सुरुवात जनरल अम्बू यांनी दाखविलेल्या राष्ट्रीय वृत्तीच्या स्वीकारातूनच व्हावी लागेल. आम्ही येथे देशासाठी लढत आहोत आणि तुम्ही तिकडे आम्हाला जाती-धर्माचे रंग लावून आमच्या कुटुंबीयांना असुरक्षित करीत आहात ही भावना उद्या लष्करातील जवानांमध्ये शिरली तर त्यामुळे देशाचे व समाजाचे अकल्याणच होईल. देशासाठी केवळ सैनिकांनीच लढायचे नसते. त्यांच्या पराक्रमामागे साºया देशानेच एकजूट होऊन उभे व्हायचे असते. तसे होण्यासाठी त्याला त्यांचे खासगी स्वार्थ जसे सोडावे लागतात तसेच जाती-धर्म-पंथ या विषयीच्या खासगी श्रद्धाही बाजूस साराव्या लागतात. माणूस म्हणून साºयांनी एकत्र येणे हाच राष्ट्रनिर्मितीचा खरा मार्ग आहे. जम्मू आणि काश्मिरात देशासाठी हौतात्म्य पत्करणाºया जवानांनी हा मार्ग दाखविला आहे आणि त्यावरून पुढे जाणे हे पुढारी, राजकारणी, समाजकारणी व आपल्या साºयांचेही कर्तव्य आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर