शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
4
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
5
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
6
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
7
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
8
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
9
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
10
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
11
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
12
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
13
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
14
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
15
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
16
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
17
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
18
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
19
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
20
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
Daily Top 2Weekly Top 5

हौतात्म्याला धर्माचा रंग नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 04:12 IST

जम्मू आणि काश्मिरातील सुंजवा येथे जैश-ए-मोहम्मद या अतिरेक्यांच्या संघटनेने केलेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या सात जवानांपैकी पाचजण मुस्लीम होते ही बाब मुसलमान समाजावर सातत्याने ते पाकिस्तानवाले आहेत असे म्हणणा-यांच्या डोळ्यात अंजन घालणारी असली तरी अशा शहादतीला धर्माचा रंग देणे योग्य नव्हे.

जम्मू आणि काश्मिरातील सुंजवा येथे जैश-ए-मोहम्मद या अतिरेक्यांच्या संघटनेने केलेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या सात जवानांपैकी पाचजण मुस्लीम होते ही बाब मुसलमान समाजावर सातत्याने ते पाकिस्तानवाले आहेत असे म्हणणा-यांच्या डोळ्यात अंजन घालणारी असली तरी अशा शहादतीला धर्माचा रंग देणे योग्य नव्हे. मोहम्मद अश्रफ मीर, हबिबुल्लाह कुरेशी, मनझूर अहमद देवा, मोहम्मद इकबाल आणि जुलम-मोईउद्दीन शेख अशी या हुतात्म्यांची नावे असून ते देशासाठी शहीद झाले आहेत. सैन्यास वा सैनिकांना धर्म नसतो, जात-पात-पंथ वा प्रांत नसतो. ते साºया देशाचे संरक्षक असतात. एका अर्थाने ते खरे भारतीय असतात असे म्हणूनच त्यांचा गौरव केला पाहिजे. लष्कराने तो तसा केलाही. परंतु जाती-धर्माचे राजकारण करणाºया पुढाºयांची व राजकारण्यांची वेगळी व सामान्यपणे आपापल्या जाती-धर्माचे समर्थन व संघटन करण्याची वृत्ती असते. त्यातून ज्या देशाच्या राजकारणास धर्माचे रंग चढविण्याची स्पर्धा सुरू झाली असते, त्यात तर अशा संधीची वाट सारेच पुढारी पहात असतात. ‘काश्मिरात शहादत पत्करणारे हे पाचही सैनिक मुसलमान होते ही गोष्ट मुसलमानांना पाकिस्तानी ठरविणाºयांनी लक्षात घेतली पाहिजे.’ इत्तेहादूल मुसलमीन या पक्षाचे अध्यक्ष व खासदार बॅ. असरुद्दीन औवेसी यांचे विधान त्याचमुळे आक्षेपार्ह आहे. भारतीय लष्कराच्या नॉर्दन कमांडचे प्रमुख जनरल देवराज अम्बू यांनी नेमका हाच आक्षेप औवेसी यांच्यावर घेतला आहे. ‘लष्करात आम्ही सारे एक आहोत. आमच्यात धर्म-पंथाची दुही नाही.’ असे सुचवत तशी दुही पसरवण्याचे प्रयत्न दुसºयाही कुणी करू नयेत असेही त्यांनी यातून सुचविले आहे. वास्तविक जनरल अम्बू यांचे हे आवाहन लष्कराने वा पुढाºयांनीच नव्हे तर साºया देशानेच गंभीरपणे घ्यावे व त्यानुसार वागावे हेच अपेक्षित व योग्य आहे. मात्र जाती-धर्मातील वेगळेपणावर उठून राष्ट्रीय होण्यासाठी लागणारे मन ना राजकारण्यांकडे आहे ना पक्षांजवळ. पुढारी धर्मनिरपेक्षतेचा वा राष्ट्रीयतेचा उल्लेख जाहीर भाषणातच तेवढा करतात. प्रत्यक्षात त्यांचे वर्तन या दुहीला वाढ मिळवून देणारेच असते. जनरल अम्बू यांचा हा उपदेश त्याचमुळे एकट्या असरुद्दीन औवेसीनीच नाही, तर तो साºयाच पुढाºयांनी व नागरिकांनीही ध्यानात घ्यावा असा आहे. देशासाठी प्राणपणाने लढणारा सैनिक हिंदू वा मुसलान नसतो. तो शीख वा पारशीही नसतो. तो एक भारतीय असतो. आणि खºया भारतीयाचे लक्षणही तेच आहे. त्यामुळे देशासाठी हौतात्म्य पत्करणाºया जवानांची वा स्वातंत्र्यासाठी प्राण देणाºया देशभक्तांची धर्मवार गणती करणे हा त्यांचा अपमानच नव्हे तर तो देशाशी केलेला द्रोहही आहे. ज्या पाच भारतीय जवानांनी देशासाठी बलिदान केले ते साºया देशासाठीच अभिवादनाचे व अभिमानाचे विषय झालेले वीर आहेत. त्यांना धर्म वा जातीचा रंग चढविण्याचा प्रयत्न कमालीचा निंद्य व हीन आहे. आपल्या समाजातून जात व धर्म यांच्या वृथा अभिमानाचे मूळ जेव्हा नष्ट व्हायचे तेव्हा ते होईलच. मात्र त्याची सुरुवात जनरल अम्बू यांनी दाखविलेल्या राष्ट्रीय वृत्तीच्या स्वीकारातूनच व्हावी लागेल. आम्ही येथे देशासाठी लढत आहोत आणि तुम्ही तिकडे आम्हाला जाती-धर्माचे रंग लावून आमच्या कुटुंबीयांना असुरक्षित करीत आहात ही भावना उद्या लष्करातील जवानांमध्ये शिरली तर त्यामुळे देशाचे व समाजाचे अकल्याणच होईल. देशासाठी केवळ सैनिकांनीच लढायचे नसते. त्यांच्या पराक्रमामागे साºया देशानेच एकजूट होऊन उभे व्हायचे असते. तसे होण्यासाठी त्याला त्यांचे खासगी स्वार्थ जसे सोडावे लागतात तसेच जाती-धर्म-पंथ या विषयीच्या खासगी श्रद्धाही बाजूस साराव्या लागतात. माणूस म्हणून साºयांनी एकत्र येणे हाच राष्ट्रनिर्मितीचा खरा मार्ग आहे. जम्मू आणि काश्मिरात देशासाठी हौतात्म्य पत्करणाºया जवानांनी हा मार्ग दाखविला आहे आणि त्यावरून पुढे जाणे हे पुढारी, राजकारणी, समाजकारणी व आपल्या साºयांचेही कर्तव्य आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर