शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
3
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
4
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
5
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
6
२० मिनिटांत ८.८ लाख रुपये लंपास, 'या' ४ चुकांमुळे बँक खाते रिकामे! तुम्ही तर करत नाहीयेत ना?
7
विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नानं अखेर सत्य सांगितलं, म्हणाली...
8
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त
9
"इंडस्ट्रीत माझी एकच चांगली मैत्रीण आहे...", शशांक केतकरने घेतलं 'या' अभिनेत्रीचं नाव
10
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, सीआरपीएफच्या जवानानं पत्नीचं मुंडकं छाटलं! वृत्त वाहिनीच्या ऑफिसमध्ये गेला अन्...
11
हातखंबा येथे पुन्हा अपघात, गॅसवाहू टँकर वडापावच्या टपरीवर आदळला; ग्रामस्थांनी महामार्ग अडवला
12
भारताबाबत ट्रम्प यांनी मोठी चूक केली, दिग्गज अर्थतज्ज्ञानं साधला निशाणा; म्हणाले, "हे म्हणणं एकदम..."
13
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
14
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex १६६ आणि निफ्टी ३१ अंकांच्या तेजीसह खुला, 'हे' शेअर्स वधारले
15
समृद्धीने सुसाट निघाल तर पकडले जाल, तुमच्यावर लक्ष ठेवणार एक हजार ‘डोळे’
16
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
17
‘महादेवी’ हत्तीण प्रकरणात शासनाचा आदेश नाही, उद्या मुंबईत बैठक : मुख्यमंत्री
18
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
19
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
20
पुत्रदा एकादशी-बुध प्रदोष: ८ राशींना सर्वोत्तम काळ, शुभ-लाभ; हाती पैसा राहील, कल्याण होईल!

हौतात्म्याला धर्माचा रंग नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 04:12 IST

जम्मू आणि काश्मिरातील सुंजवा येथे जैश-ए-मोहम्मद या अतिरेक्यांच्या संघटनेने केलेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या सात जवानांपैकी पाचजण मुस्लीम होते ही बाब मुसलमान समाजावर सातत्याने ते पाकिस्तानवाले आहेत असे म्हणणा-यांच्या डोळ्यात अंजन घालणारी असली तरी अशा शहादतीला धर्माचा रंग देणे योग्य नव्हे.

जम्मू आणि काश्मिरातील सुंजवा येथे जैश-ए-मोहम्मद या अतिरेक्यांच्या संघटनेने केलेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या सात जवानांपैकी पाचजण मुस्लीम होते ही बाब मुसलमान समाजावर सातत्याने ते पाकिस्तानवाले आहेत असे म्हणणा-यांच्या डोळ्यात अंजन घालणारी असली तरी अशा शहादतीला धर्माचा रंग देणे योग्य नव्हे. मोहम्मद अश्रफ मीर, हबिबुल्लाह कुरेशी, मनझूर अहमद देवा, मोहम्मद इकबाल आणि जुलम-मोईउद्दीन शेख अशी या हुतात्म्यांची नावे असून ते देशासाठी शहीद झाले आहेत. सैन्यास वा सैनिकांना धर्म नसतो, जात-पात-पंथ वा प्रांत नसतो. ते साºया देशाचे संरक्षक असतात. एका अर्थाने ते खरे भारतीय असतात असे म्हणूनच त्यांचा गौरव केला पाहिजे. लष्कराने तो तसा केलाही. परंतु जाती-धर्माचे राजकारण करणाºया पुढाºयांची व राजकारण्यांची वेगळी व सामान्यपणे आपापल्या जाती-धर्माचे समर्थन व संघटन करण्याची वृत्ती असते. त्यातून ज्या देशाच्या राजकारणास धर्माचे रंग चढविण्याची स्पर्धा सुरू झाली असते, त्यात तर अशा संधीची वाट सारेच पुढारी पहात असतात. ‘काश्मिरात शहादत पत्करणारे हे पाचही सैनिक मुसलमान होते ही गोष्ट मुसलमानांना पाकिस्तानी ठरविणाºयांनी लक्षात घेतली पाहिजे.’ इत्तेहादूल मुसलमीन या पक्षाचे अध्यक्ष व खासदार बॅ. असरुद्दीन औवेसी यांचे विधान त्याचमुळे आक्षेपार्ह आहे. भारतीय लष्कराच्या नॉर्दन कमांडचे प्रमुख जनरल देवराज अम्बू यांनी नेमका हाच आक्षेप औवेसी यांच्यावर घेतला आहे. ‘लष्करात आम्ही सारे एक आहोत. आमच्यात धर्म-पंथाची दुही नाही.’ असे सुचवत तशी दुही पसरवण्याचे प्रयत्न दुसºयाही कुणी करू नयेत असेही त्यांनी यातून सुचविले आहे. वास्तविक जनरल अम्बू यांचे हे आवाहन लष्कराने वा पुढाºयांनीच नव्हे तर साºया देशानेच गंभीरपणे घ्यावे व त्यानुसार वागावे हेच अपेक्षित व योग्य आहे. मात्र जाती-धर्मातील वेगळेपणावर उठून राष्ट्रीय होण्यासाठी लागणारे मन ना राजकारण्यांकडे आहे ना पक्षांजवळ. पुढारी धर्मनिरपेक्षतेचा वा राष्ट्रीयतेचा उल्लेख जाहीर भाषणातच तेवढा करतात. प्रत्यक्षात त्यांचे वर्तन या दुहीला वाढ मिळवून देणारेच असते. जनरल अम्बू यांचा हा उपदेश त्याचमुळे एकट्या असरुद्दीन औवेसीनीच नाही, तर तो साºयाच पुढाºयांनी व नागरिकांनीही ध्यानात घ्यावा असा आहे. देशासाठी प्राणपणाने लढणारा सैनिक हिंदू वा मुसलान नसतो. तो शीख वा पारशीही नसतो. तो एक भारतीय असतो. आणि खºया भारतीयाचे लक्षणही तेच आहे. त्यामुळे देशासाठी हौतात्म्य पत्करणाºया जवानांची वा स्वातंत्र्यासाठी प्राण देणाºया देशभक्तांची धर्मवार गणती करणे हा त्यांचा अपमानच नव्हे तर तो देशाशी केलेला द्रोहही आहे. ज्या पाच भारतीय जवानांनी देशासाठी बलिदान केले ते साºया देशासाठीच अभिवादनाचे व अभिमानाचे विषय झालेले वीर आहेत. त्यांना धर्म वा जातीचा रंग चढविण्याचा प्रयत्न कमालीचा निंद्य व हीन आहे. आपल्या समाजातून जात व धर्म यांच्या वृथा अभिमानाचे मूळ जेव्हा नष्ट व्हायचे तेव्हा ते होईलच. मात्र त्याची सुरुवात जनरल अम्बू यांनी दाखविलेल्या राष्ट्रीय वृत्तीच्या स्वीकारातूनच व्हावी लागेल. आम्ही येथे देशासाठी लढत आहोत आणि तुम्ही तिकडे आम्हाला जाती-धर्माचे रंग लावून आमच्या कुटुंबीयांना असुरक्षित करीत आहात ही भावना उद्या लष्करातील जवानांमध्ये शिरली तर त्यामुळे देशाचे व समाजाचे अकल्याणच होईल. देशासाठी केवळ सैनिकांनीच लढायचे नसते. त्यांच्या पराक्रमामागे साºया देशानेच एकजूट होऊन उभे व्हायचे असते. तसे होण्यासाठी त्याला त्यांचे खासगी स्वार्थ जसे सोडावे लागतात तसेच जाती-धर्म-पंथ या विषयीच्या खासगी श्रद्धाही बाजूस साराव्या लागतात. माणूस म्हणून साºयांनी एकत्र येणे हाच राष्ट्रनिर्मितीचा खरा मार्ग आहे. जम्मू आणि काश्मिरात देशासाठी हौतात्म्य पत्करणाºया जवानांनी हा मार्ग दाखविला आहे आणि त्यावरून पुढे जाणे हे पुढारी, राजकारणी, समाजकारणी व आपल्या साºयांचेही कर्तव्य आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर