शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय प्रवेशासाठी मराठवाड्यावर अन्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 02:15 IST

उर्वरित महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा अशी विभागनिहाय होणारी एमबीबीएस प्रवेश प्रक्रिया ७०:३० निकषामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय करणारी असल्याची भावना शिक्षक-पालकांची आहे़ गुणवत्ता असूनही मराठवाड्यातील हजारो विद्यार्थी १९८५ पासून प्रवेशास वंचित राहिले आहेत.

- धर्मराज हल्लाळेउर्वरित महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा अशी विभागनिहाय होणारी एमबीबीएस प्रवेश प्रक्रिया ७०:३० निकषामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय करणारी असल्याची भावना शिक्षक-पालकांची आहे़ गुणवत्ता असूनही मराठवाड्यातील हजारो विद्यार्थी १९८५ पासून प्रवेशास वंचित राहिले आहेत़ यासंदर्भात मराठवाडा शिक्षक-पालक संघटनेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे़ मराठवाड्यातील शासकीय महाविद्यालयांमधून ५०० पेक्षा कमी जागा वाट्याला येतात़ तर विदर्भात सुमारे ७५० आणि उर्वरित महाराष्ट्रात जवळपास १४०० जागा आहेत़ ७०:३० या निकषाआधारे उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश जागांवर मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना ३० टक्क्यांमध्ये स्पर्धा करावी लागते़ एकीकडे ७० टक्के जागा त्याच विभागातील विद्यार्थ्यांसाठी राखीव राहतात तर उर्वरित ३० टक्क्यांमध्येही राज्य गुणवत्ता यादीनुसार प्रवेश केले जातात़ तोच नियम विदर्भ आणि मराठवाडा विभागात लागू आहे़ मराठवाड्यात औरंगाबाद, नांदेड, लातूर व अंबाजोगाई येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहेत़ एकूण शासकीय व खासगी वैद्यकीय महाविद्यालयांची विभागनिहाय तुलनात्मक आकडेवारी पाहिली असता, मराठवाड्यात महाविद्यालयांची संख्या कमी आहे़ मात्र नव्याने महाविद्यालय स्थापन करीत असताना ते उर्वरित महाराष्ट्रासाठी दिले जात आहे़ जिथे वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या मराठवाड्याच्या तुलनेत अधिक आहे़मराठवाडा शिक्षक-पालक संघटनेचे मार्गदर्शक प्राचार्य अनिरुद्ध जाधव यांनी डिसेंबर २०१६ मध्ये यासंदर्भातील याचिका उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली होती़ पालक डॉ़ शैलेश वैद्य, डॉ़ नरेंद्र पाटील यांच्यासह पालकांनीही न्यायालयात धाव घेतली़ राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी शासनाची बाजू मांडली आहे़ लोकसंख्येच्या आधारावर प्रतिनिधित्व दिल्याचे सांगण्यात आले आहे़ परंतु, थेट गुणवत्तेचा निकष लावला तर दरवर्षी आणखी जवळपास २०० विद्यार्थी मराठवाड्यातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवू शकतात, असे शिक्षक-पालक संघटनेला वाटते़ त्यामुळे घटनात्मक व कायद्याच्या दृष्टीने मराठवाड्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचे आक्षेप पालकांनी नोंदविले आहेत़ ७०:३० च्या निकषांमध्येही ज्या विभागातील विद्यार्थी ७० टक्क्यांमध्ये प्रवेश मिळवितात त्यांना पुन्हा राज्य गुणवत्ता यादीनुसार ३० टक्क्यांमध्येही प्रवेश घेता येतो़ हा नियमही अन्यायकारक ठरला आहे़ अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी त्या त्या विभागातील विद्यार्थ्यांना ३० टक्क्यांमध्ये प्रवेश घेता येत नाही़ तोच नियम वैद्यकीय प्रवेशासाठी का असू नये, असा सवाल आहे़ दरम्यान, प्रणव बसापुरे या विद्यार्थ्यानेही सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती़ त्यावरील सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयातच दाद मागण्याचे निर्देशित केले़े दरम्यान, २०१७ च्या प्रवेश प्रक्रियेपर्यंत हजारो विद्यार्थी निकालाकडे डोळे लावून बसले होते, अजूनही ती प्रतीक्षा संपलेली नाही़ एकंदर वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेतली तर जिल्हानिहाय मराठवाड्यातील संख्या अधिक आहे़ शेवटी मुळात महाविद्यालयांची संख्या कमी असलेल्या अन् मागास भागांच्या अनुशेषात अडकलेल्या मराठवाड्याला न्याय कधी मिळणार, हा प्रश्न आहे़    

टॅग्स :educationशैक्षणिक