शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
Sachin Tendulkar, IND vs ENG: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
4
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
5
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
6
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
7
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
8
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
9
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?
10
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
11
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण: मिडकॅप, स्मॉलकॅपला मोठा फटका; 'या' क्षेत्रात मात्र तेजी!
12
मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे?
13
जुलै २०२५ वर खिळून आहेत इतिहास, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या नजरा; पण का?
14
Mumbai Crime: मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
15
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
16
Ahmedabad Plane Crash : भयंकर! आईच्या डोळ्यादेखत १५ वर्षांचा लेक जिवंत जळाला; काळजात चर्र करणारी घटना
17
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
18
शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये माजी आमदारांसाठी रस्सीखेच; ‘रात्रीस खेळ चाले’चा सिलसिला सुरू
19
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
20
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...

मराठवाड्यात पाण्याऐवजी वाहतो पैसा...पण नेमका जिरतो कुठे ?

By सुधीर महाजन | Updated: November 23, 2018 15:09 IST

आॅक्टोबर २०१४ ते जून २०१७ या काळात पाणी पुरवठा योजनांवर २१५ कोटी रु. खर्च झालेले आहेत आणि आज पुरेसे पाणी मिळणारे एकही गाव मराठवाड्यात नाही.

- सुधीर महाजन

उभा मराठवाडादुष्काळाच्या विळख्यात आहे. अजगराचा विळखा जसा हळुहळु घट्ट होत जातो तसा गेलेला दिवस बरा होता अशी म्हणायची वेळ. काही गाव जात्यात तर काही सुपात इतकाच काय तो फरक. अन्नाची ददात नाही; पण पाण्याचा प्रश्न गंभीर तोंडचे पाणी पळाले आहे, जनावरांना चारा नाही. त्याचे भाव कडाडले; पण प्रशासन म्हणते जानेवारीनंतर टंचाई येईल. चारा आणि पाणी टंचाईमुळे बाजारात जनावरांची गर्दी आहे. भल्याभल्यांच्या दावणी रिकाम्या होण्याची वेळ आली आहे. जिवापाड जपलेल्या जनावरांना बाजाराचा रस्ता दाखवण्याची वेळ येते त्या घरावर मरणकळा उतरते. गोवंश कायद्याच्या बडग्यामुळे जनावारांच्या बाजारात मंदी आहे. मातीमोलाने जनावरे विकावी लागतात. नदी-नाले आटलेलेच होते. विहिरी कोरड्या ठाक पडल्या. कुठे शिवारात डोळ्यात लावायलाही  पाणी नाही. पिण्यासाठी घरून पाणी नेण्याची वेळ आली, सगळा उफराटा खेळ झाला. 

सगळ्या मराठवाड्यावर दुष्काळाचे उदासवाणे सावट पसरले असतांना प्रशासन मात्र पाण्याच्या नियोजनात मश्गुल दिसते. पण त्याचा कारभारही केवळ कागदावर आणि नियोजन शून्य, याची झलक प   हायची तर पाण्याचे सगळे स्त्रोत आटले असल्याने गावोगावच्या नळ योजना बंद पडल्या. अशा वेळी प्रशासनाने मराठवाड्याच्या ४८३ गावांमधील ४८९  नळयोजनांच्या दुरूस्तीसाठी १६ कोटी ४१ लाखाचे प्रस्ताव तयार केले. ज्या नळांमधून पुढेचे ८-१० महिने पाणीच येणार नाही त्यासाठी हे दुष्काळी नियोजन आहे. एका अर्थाने नियोजनाचाच दुष्काळ दिसतो. 

पाण्याचे दुर्भिक्ष आणि दुष्काळ या दोन्ही गोष्टी मराठवाड्यासाठी नव्या नाहीत. म्हणून पाण्यासाठी सतत प्रयत्न चालू असतात याचा गेल्या चार वर्षांच्या खर्चावर नजर टाकली तर पाण्याऐवजी मराठवाड्यात पैसाच वाहत होता असे दिसते. आॅक्टोबर २०१४ ते जून २०१७ या काळात पाणी पुरवठा योजनांवर २१५ कोटी रु. खर्च झालेले आहेत आणि आज पुरेसे पाणी मिळणारे एकही गाव मराठवाड्यात नाही. जलसंधारणाची कामेही झाली; पण दोन कोटी लोकांना पाण्यासाठी दरडोई ५७ रु. खर्च होत आहे. 

तिसरी एक गंमतच आहे. पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर हे मराठवाड्याचेच. त्यांनी विविध घोषणाद्वारे २०१७-१८ मध्ये मराठवाड्यासाठी ३५६ कोटीचा निधी उपलब्ध करून दिला होता. त्यापैकी ३१४ कोटी ६२ लाख रुपये खर्च झाले; पण हा निधी नेमका कुठे गेला हा सुद्धा एक प्रश्नच आहे. कारण पाणी तर कुठेच नाही दुरूस्तीसाठी कोट्यावधीचे प्रस्ताव आहेत. आजच रोज ४०० टँकर चालु आहेत. पाणी पुरवठा आणि स्वच्छता अभियानासाठी १ हजार ४३४ कोटी रुपयाचा निधी दिला होता. यातून मार्च १८ पर्यंत पाणीपुरवठ्याच्या सर्व योजनांचे काम पूर्ण करायचे आहे. सरकारने वॉटर ग्रीडसाठी १५ कोटीची घोषणा केली होती त्याचे नेमके काय झाले असे एक ना अनेक प्रश्न आहेत. मराठवाड्यात पाणी नसले तरी पैसा वाहतो; पण नेमका जिरतो कुठे?

टॅग्स :droughtदुष्काळMarathwadaमराठवाडाWaterपाणीState Governmentराज्य सरकार