शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात पाण्याऐवजी वाहतो पैसा...पण नेमका जिरतो कुठे ?

By सुधीर महाजन | Updated: November 23, 2018 15:09 IST

आॅक्टोबर २०१४ ते जून २०१७ या काळात पाणी पुरवठा योजनांवर २१५ कोटी रु. खर्च झालेले आहेत आणि आज पुरेसे पाणी मिळणारे एकही गाव मराठवाड्यात नाही.

- सुधीर महाजन

उभा मराठवाडादुष्काळाच्या विळख्यात आहे. अजगराचा विळखा जसा हळुहळु घट्ट होत जातो तसा गेलेला दिवस बरा होता अशी म्हणायची वेळ. काही गाव जात्यात तर काही सुपात इतकाच काय तो फरक. अन्नाची ददात नाही; पण पाण्याचा प्रश्न गंभीर तोंडचे पाणी पळाले आहे, जनावरांना चारा नाही. त्याचे भाव कडाडले; पण प्रशासन म्हणते जानेवारीनंतर टंचाई येईल. चारा आणि पाणी टंचाईमुळे बाजारात जनावरांची गर्दी आहे. भल्याभल्यांच्या दावणी रिकाम्या होण्याची वेळ आली आहे. जिवापाड जपलेल्या जनावरांना बाजाराचा रस्ता दाखवण्याची वेळ येते त्या घरावर मरणकळा उतरते. गोवंश कायद्याच्या बडग्यामुळे जनावारांच्या बाजारात मंदी आहे. मातीमोलाने जनावरे विकावी लागतात. नदी-नाले आटलेलेच होते. विहिरी कोरड्या ठाक पडल्या. कुठे शिवारात डोळ्यात लावायलाही  पाणी नाही. पिण्यासाठी घरून पाणी नेण्याची वेळ आली, सगळा उफराटा खेळ झाला. 

सगळ्या मराठवाड्यावर दुष्काळाचे उदासवाणे सावट पसरले असतांना प्रशासन मात्र पाण्याच्या नियोजनात मश्गुल दिसते. पण त्याचा कारभारही केवळ कागदावर आणि नियोजन शून्य, याची झलक प   हायची तर पाण्याचे सगळे स्त्रोत आटले असल्याने गावोगावच्या नळ योजना बंद पडल्या. अशा वेळी प्रशासनाने मराठवाड्याच्या ४८३ गावांमधील ४८९  नळयोजनांच्या दुरूस्तीसाठी १६ कोटी ४१ लाखाचे प्रस्ताव तयार केले. ज्या नळांमधून पुढेचे ८-१० महिने पाणीच येणार नाही त्यासाठी हे दुष्काळी नियोजन आहे. एका अर्थाने नियोजनाचाच दुष्काळ दिसतो. 

पाण्याचे दुर्भिक्ष आणि दुष्काळ या दोन्ही गोष्टी मराठवाड्यासाठी नव्या नाहीत. म्हणून पाण्यासाठी सतत प्रयत्न चालू असतात याचा गेल्या चार वर्षांच्या खर्चावर नजर टाकली तर पाण्याऐवजी मराठवाड्यात पैसाच वाहत होता असे दिसते. आॅक्टोबर २०१४ ते जून २०१७ या काळात पाणी पुरवठा योजनांवर २१५ कोटी रु. खर्च झालेले आहेत आणि आज पुरेसे पाणी मिळणारे एकही गाव मराठवाड्यात नाही. जलसंधारणाची कामेही झाली; पण दोन कोटी लोकांना पाण्यासाठी दरडोई ५७ रु. खर्च होत आहे. 

तिसरी एक गंमतच आहे. पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर हे मराठवाड्याचेच. त्यांनी विविध घोषणाद्वारे २०१७-१८ मध्ये मराठवाड्यासाठी ३५६ कोटीचा निधी उपलब्ध करून दिला होता. त्यापैकी ३१४ कोटी ६२ लाख रुपये खर्च झाले; पण हा निधी नेमका कुठे गेला हा सुद्धा एक प्रश्नच आहे. कारण पाणी तर कुठेच नाही दुरूस्तीसाठी कोट्यावधीचे प्रस्ताव आहेत. आजच रोज ४०० टँकर चालु आहेत. पाणी पुरवठा आणि स्वच्छता अभियानासाठी १ हजार ४३४ कोटी रुपयाचा निधी दिला होता. यातून मार्च १८ पर्यंत पाणीपुरवठ्याच्या सर्व योजनांचे काम पूर्ण करायचे आहे. सरकारने वॉटर ग्रीडसाठी १५ कोटीची घोषणा केली होती त्याचे नेमके काय झाले असे एक ना अनेक प्रश्न आहेत. मराठवाड्यात पाणी नसले तरी पैसा वाहतो; पण नेमका जिरतो कुठे?

टॅग्स :droughtदुष्काळMarathwadaमराठवाडाWaterपाणीState Governmentराज्य सरकार