शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

मराठी शाळांचा ‘विनोद’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 03:52 IST

राज्य सरकारने १ हजार ३१४ मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आणि मराठीच्या अस्तित्वाच्या मुद्द्याची पुन्हा नव्याने चर्चा सुरू झाली.

राज्य सरकारने १ हजार ३१४ मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आणि मराठीच्या अस्तित्वाच्या मुद्द्याची पुन्हा नव्याने चर्चा सुरू झाली. खरं म्हणजे या शाळा बंद करण्याचा निर्णय तांत्रिक स्वरूपाचा आहे. मराठी शाळांना विद्यार्थी मिळेनासे झाल्याने सरकारला या विचारापर्यंत यावे लागले. त्यामुळे सध्या तरी हा निर्णय तांत्रिक स्वरूपाचा गणला जाईल. तथापि, विद्यार्थी न मिळण्याची स्थिती निर्माण कशामुळे झाली, याचा सखोल विचार होण्याची गरज आहे. वाघिणीचे दूध म्हणून ज्या भाषेचा उल्लेख केला जातो, ती इंग्रजी भाषा जगभर मान्यता पावत आहे. इंग्रजीचे महत्त्व नाकारण्याचेही इथे कारणच नाही. पण मातृभाषेमधील शिक्षण देण्यात सरकारची असमर्थता यामुळे अधोरेखीत होत आहे. इंग्रजीच्या मोहामुळे मराठी शाळांतील पटसंख्या कमी होतेय. पर्यायाने पालकांचा कलदेखील मराठीऐवजी इंग्रजी शाळांकडे वळतोय, ही वस्तुस्थिती आहे. एकीकडे राज्यात इंग्रजी शाळांचे पेव फुटतेय तर पटसंख्येअभावी १,३१४ मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकार घेतेय.खरे तर सध्या मुंबईसह राज्यभरातील असंख्य मराठी शाळा अडचणीत आहेत. अनेक शाळांना टाळे लागत आहे. ते रोखण्यासाठी कोणतेही प्रयत्न सक्षमपणे होताना दिसत नाहीत, ही शोकांतिका आहे. केवळ मराठी दिन व राजभाषा दिन साजरा करून हा प्रश्न सुटणारा नाही. प्रत्येक नागरिकाला मातृभाषेतून शिक्षण घेण्याचा घटनात्मक अधिकार आहे. सीमावर्ती भागातील मराठी शाळांची स्थिती तर अधिक बिकट आहे. या भागातील पालक मराठी माध्यमातून शिक्षण मिळावे, यासाठी राज्य शासनाकडे अक्षरश: याचना करताहेत. पण सरकारला या मराठी बांधवांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठीही वेळ नाही. मुंबई महापालिकेच्या मराठी शाळांचीही स्थिती वेगळी नाही. एका आकडेवारीनुसार पाच वर्षांत पालिका शाळेतील ४० हजार विद्यार्थी गळाले आहेत. खरे तर ही गळती सुरू झाली २०१० पासून. महत्त्वाचे म्हणजे मुंबई महापालिकेच्या मराठी शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यावर वर्षाला ५० हजार खर्च होतो, तर इंग्रजी माध्यमाच्या शाळांतील प्रत्येक विद्यार्थ्यावर १० हजार रुपये पालिका खर्च करते. जगभरातील अनेक उच्च विद्याविभूषित व्यक्तींनी मातृभाषेत शिक्षण घेतल्याच्या कथा सर्वांना माहीत झाल्या आहेत. या विद्वानांची निपुणता आता मराठी कुटुंबांमध्येही रुजवण्याची गरज आहे. मातृभाषेतून शिक्षण घेतल्यानंतर सखोल विचार करण्याची आणि ते मांडण्याची क्षमता विकसित होते, हे संशोधनातून एव्हाना समोर आलेले आहे. त्यामुळे आता शाळा कमी करण्याचा ‘विनोद’ करण्यापेक्षा त्याचे गांभीर्य लक्षात घेतले तरच मायमराठीचे प्रश्न सुटू शकतील.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी