शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

मराठी शाळांचा ‘विनोद’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 03:52 IST

राज्य सरकारने १ हजार ३१४ मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आणि मराठीच्या अस्तित्वाच्या मुद्द्याची पुन्हा नव्याने चर्चा सुरू झाली.

राज्य सरकारने १ हजार ३१४ मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आणि मराठीच्या अस्तित्वाच्या मुद्द्याची पुन्हा नव्याने चर्चा सुरू झाली. खरं म्हणजे या शाळा बंद करण्याचा निर्णय तांत्रिक स्वरूपाचा आहे. मराठी शाळांना विद्यार्थी मिळेनासे झाल्याने सरकारला या विचारापर्यंत यावे लागले. त्यामुळे सध्या तरी हा निर्णय तांत्रिक स्वरूपाचा गणला जाईल. तथापि, विद्यार्थी न मिळण्याची स्थिती निर्माण कशामुळे झाली, याचा सखोल विचार होण्याची गरज आहे. वाघिणीचे दूध म्हणून ज्या भाषेचा उल्लेख केला जातो, ती इंग्रजी भाषा जगभर मान्यता पावत आहे. इंग्रजीचे महत्त्व नाकारण्याचेही इथे कारणच नाही. पण मातृभाषेमधील शिक्षण देण्यात सरकारची असमर्थता यामुळे अधोरेखीत होत आहे. इंग्रजीच्या मोहामुळे मराठी शाळांतील पटसंख्या कमी होतेय. पर्यायाने पालकांचा कलदेखील मराठीऐवजी इंग्रजी शाळांकडे वळतोय, ही वस्तुस्थिती आहे. एकीकडे राज्यात इंग्रजी शाळांचे पेव फुटतेय तर पटसंख्येअभावी १,३१४ मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकार घेतेय.खरे तर सध्या मुंबईसह राज्यभरातील असंख्य मराठी शाळा अडचणीत आहेत. अनेक शाळांना टाळे लागत आहे. ते रोखण्यासाठी कोणतेही प्रयत्न सक्षमपणे होताना दिसत नाहीत, ही शोकांतिका आहे. केवळ मराठी दिन व राजभाषा दिन साजरा करून हा प्रश्न सुटणारा नाही. प्रत्येक नागरिकाला मातृभाषेतून शिक्षण घेण्याचा घटनात्मक अधिकार आहे. सीमावर्ती भागातील मराठी शाळांची स्थिती तर अधिक बिकट आहे. या भागातील पालक मराठी माध्यमातून शिक्षण मिळावे, यासाठी राज्य शासनाकडे अक्षरश: याचना करताहेत. पण सरकारला या मराठी बांधवांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठीही वेळ नाही. मुंबई महापालिकेच्या मराठी शाळांचीही स्थिती वेगळी नाही. एका आकडेवारीनुसार पाच वर्षांत पालिका शाळेतील ४० हजार विद्यार्थी गळाले आहेत. खरे तर ही गळती सुरू झाली २०१० पासून. महत्त्वाचे म्हणजे मुंबई महापालिकेच्या मराठी शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यावर वर्षाला ५० हजार खर्च होतो, तर इंग्रजी माध्यमाच्या शाळांतील प्रत्येक विद्यार्थ्यावर १० हजार रुपये पालिका खर्च करते. जगभरातील अनेक उच्च विद्याविभूषित व्यक्तींनी मातृभाषेत शिक्षण घेतल्याच्या कथा सर्वांना माहीत झाल्या आहेत. या विद्वानांची निपुणता आता मराठी कुटुंबांमध्येही रुजवण्याची गरज आहे. मातृभाषेतून शिक्षण घेतल्यानंतर सखोल विचार करण्याची आणि ते मांडण्याची क्षमता विकसित होते, हे संशोधनातून एव्हाना समोर आलेले आहे. त्यामुळे आता शाळा कमी करण्याचा ‘विनोद’ करण्यापेक्षा त्याचे गांभीर्य लक्षात घेतले तरच मायमराठीचे प्रश्न सुटू शकतील.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी