शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

'पंढरीची वाट चालतात इंग्लंड-अमेरिकेतली मराठी माणसं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2023 09:22 IST

असाल त्या देशात दररोज जमेल तसे किमान एक ते कमाल तेरा किलोमीटर अंतर हरिनामाचा उच्चार करीत चालायचे ही ग्लोबल वारी' मागची कल्पना!

 - शरद कदम (वॉरीक, यूके)

'वारी' हा महाराष्ट्राचा सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक सोहळा आहे. तोंडाने विठ्ठल नामाचा गजर करीत आणि मनात 'विष्णुमय जग वैष्णवाचा, धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ हा भाव ठेवत दरवर्षी लाखो लोक या सोहळ्यात सामील होतात. यंदाची माझी वारी चुकली, कारण दोन महिन्यांपूर्वी मी माझ्या मुलाकडे इंग्लंडला आलो आहे. इथे बसून 'संविधान समता दिंडी'चे व्हॉट्सअॅपद्वारे संयोजन करतो आहे. अर्थात प्रत्यक्ष सहभागी होऊ शकत नाही याची रुखरुख आहेच. माझी ही धडपड माझा मुंबईतला मित्र आणि सध्या लंडनला राहत असलेला संतोष पारकर सोशल मीडियातून बघत होता. माझी तळमळ बघून त्याने मला एके दिवशी फोन करून ग्लोबल वारीची माहिती दिली आणि इंग्लंडमधून माझी ग्लोबल वारी सुरू झाली.

"एकदा तरी वारी अनुभवावी' असे म्हणतात. मराठी माणूस शिक्षण, नोकरीच्या निमित्ताने घर-गाव सोडून परदेशात जातो, तेव्हा त्याला घरच्या सणावारांचे आणि वारीचे वेध लागतात. दिवाळी, गुढीपाडवा आदी परदेशात साजरे होतातच; पण त्याचबरोबर पंढरपूरच्या दिशेने वारी चालू लागली की परदेशस्थ महाराष्ट्रीय माणसाची तगमग सुरू होते. या तगमगीतूनच पुण्यात असताना आळंदी ते पंढरपूर पायी वारी करणाऱ्या अनिल खेडकर यांच्या मनात ग्लोबल वारीची कल्पना आली आणि इंग्लंडमधल्या आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेत लंडन शहरात चार वर्षापूर्वी ही वारी प्रत्यक्षात सुरूही झाली.

अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील अनिल खेडकर सध्या इंग्लंडमधील 'स्टेंस' येथे राहतात. आयटी क्षेत्रातील डॉ. शिवानंद जाधव पंढरपूरचे ते गेली चार वर्षे ते लंडनमध्ये राहतात. 'संत तुकाराम महाराजांच्या तत्त्वज्ञानाची सद्यकालीन प्रस्तुतता' या विषयावर त्यांनी पुणे विद्यापीठातून पीएच.डी. केलेली आहे. संतोष पारकर मूळचे मुंबईकर. गेली वीस वर्षे लंडनमध्ये राहतात. तेथील महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्षही होते. यांच्या सोबतच लक्ष्मण खाडे, अरुण पालवे, रुस्तम खेडकर, नीलेश देशपांडे आणि इतर समवयस्क मित्रांनी ही ग्लोबल वारी सुरू करण्यात पुढाकार घेतलेला आहे.

जगभरात विखुरलेली मराठी भाषिक माणसे ग्लोबल वारीच्या माध्यमातून वारीच्या काळात चालत असतात. माझ्यासारखी काही काळापुरती परदेशात आलेली माणसेही यात सहभागी होतात. आपापली दररोजची कामे करीत, जिथे असाल त्या देशात, आपल्या परिसरात दररोज जमेल तसे किमान एक ते कमाल तेरा किलोमीटर अंतर हरी मुखे म्हणा' असा हरिनामाचा उच्चार करीत चालायचे ही या ग्लोबल वारी मागची कल्पना यात महिलांची संख्याही लक्षणीय आहे.

पालखी पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या दिवसांपासून मी वॉरीक या शहरात दररोज काही किलोमीटर अंतर चालत आहे. दररोज चालणाऱ्या सदस्यांची नावे आणि त्यांचे अंतर ही आकडेवारी एका एक्सेल शीटमध्ये गोळा केली जाते. आषाढी एकादशीच्या दिवशी इंग्लंडमधील ग्लोबल वारीचे सदस्य प्रत्यक्ष आणि ऑनलाइनच्या माध्यमातून लंडनसारख्या मध्यवर्ती ठिकाणी एकत्र जमून वारीचा समारोप करतात. यावेळी इथे जन्मलेल्या आपल्या मुलांना सोबत आणून संतांच्या समतेचा विचार या तरुण मुलांना समजावून देण्याचा प्रयत्न करतात. संत विचारातील मानवी मूल्ये पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे वारी हे साधन आहे, असे इथल्या बहुसंख्य लोकांना वाटते. 

महाराष्ट्रातील कित्येक वर्षांची वारीची ही परंपरा आता सातासमुद्राच्या पलीकडे नव्या स्वरूपात रुजू पाहतेय. भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे' असे विश्वाचे पसायदान मागणारे ज्ञानदेव, 'सकळांसी आहे येथे अधिकार' असे ठणकावून सांगणारे संत तुकाराम, काय कवे कैलास' म्हणजे काम करीत राहिल्याने मोक्ष मिळतो, असे सांगणारे बसवण्णा, 'स्त्री जन्म म्हणोनी न व्हावे उदास' हा विश्वास देणाऱ्या संत जनाबाई या साऱ्या संतांनी मानवी मूल्यांची जोपासना करण्याचा आग्रह धरला. वारीच्या निमित्ताने या परदेशातील महाराष्ट्रीयन माणसांची उजळणी झाली. इथल्या वैज्ञानिक विचारांची जोड देता आली तरी ही वारी सार्थकी लागली....

टॅग्स :Pandharpurपंढरपूरashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022