शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

'पंढरीची वाट चालतात इंग्लंड-अमेरिकेतली मराठी माणसं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2023 09:22 IST

असाल त्या देशात दररोज जमेल तसे किमान एक ते कमाल तेरा किलोमीटर अंतर हरिनामाचा उच्चार करीत चालायचे ही ग्लोबल वारी' मागची कल्पना!

 - शरद कदम (वॉरीक, यूके)

'वारी' हा महाराष्ट्राचा सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक सोहळा आहे. तोंडाने विठ्ठल नामाचा गजर करीत आणि मनात 'विष्णुमय जग वैष्णवाचा, धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ हा भाव ठेवत दरवर्षी लाखो लोक या सोहळ्यात सामील होतात. यंदाची माझी वारी चुकली, कारण दोन महिन्यांपूर्वी मी माझ्या मुलाकडे इंग्लंडला आलो आहे. इथे बसून 'संविधान समता दिंडी'चे व्हॉट्सअॅपद्वारे संयोजन करतो आहे. अर्थात प्रत्यक्ष सहभागी होऊ शकत नाही याची रुखरुख आहेच. माझी ही धडपड माझा मुंबईतला मित्र आणि सध्या लंडनला राहत असलेला संतोष पारकर सोशल मीडियातून बघत होता. माझी तळमळ बघून त्याने मला एके दिवशी फोन करून ग्लोबल वारीची माहिती दिली आणि इंग्लंडमधून माझी ग्लोबल वारी सुरू झाली.

"एकदा तरी वारी अनुभवावी' असे म्हणतात. मराठी माणूस शिक्षण, नोकरीच्या निमित्ताने घर-गाव सोडून परदेशात जातो, तेव्हा त्याला घरच्या सणावारांचे आणि वारीचे वेध लागतात. दिवाळी, गुढीपाडवा आदी परदेशात साजरे होतातच; पण त्याचबरोबर पंढरपूरच्या दिशेने वारी चालू लागली की परदेशस्थ महाराष्ट्रीय माणसाची तगमग सुरू होते. या तगमगीतूनच पुण्यात असताना आळंदी ते पंढरपूर पायी वारी करणाऱ्या अनिल खेडकर यांच्या मनात ग्लोबल वारीची कल्पना आली आणि इंग्लंडमधल्या आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेत लंडन शहरात चार वर्षापूर्वी ही वारी प्रत्यक्षात सुरूही झाली.

अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील अनिल खेडकर सध्या इंग्लंडमधील 'स्टेंस' येथे राहतात. आयटी क्षेत्रातील डॉ. शिवानंद जाधव पंढरपूरचे ते गेली चार वर्षे ते लंडनमध्ये राहतात. 'संत तुकाराम महाराजांच्या तत्त्वज्ञानाची सद्यकालीन प्रस्तुतता' या विषयावर त्यांनी पुणे विद्यापीठातून पीएच.डी. केलेली आहे. संतोष पारकर मूळचे मुंबईकर. गेली वीस वर्षे लंडनमध्ये राहतात. तेथील महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्षही होते. यांच्या सोबतच लक्ष्मण खाडे, अरुण पालवे, रुस्तम खेडकर, नीलेश देशपांडे आणि इतर समवयस्क मित्रांनी ही ग्लोबल वारी सुरू करण्यात पुढाकार घेतलेला आहे.

जगभरात विखुरलेली मराठी भाषिक माणसे ग्लोबल वारीच्या माध्यमातून वारीच्या काळात चालत असतात. माझ्यासारखी काही काळापुरती परदेशात आलेली माणसेही यात सहभागी होतात. आपापली दररोजची कामे करीत, जिथे असाल त्या देशात, आपल्या परिसरात दररोज जमेल तसे किमान एक ते कमाल तेरा किलोमीटर अंतर हरी मुखे म्हणा' असा हरिनामाचा उच्चार करीत चालायचे ही या ग्लोबल वारी मागची कल्पना यात महिलांची संख्याही लक्षणीय आहे.

पालखी पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या दिवसांपासून मी वॉरीक या शहरात दररोज काही किलोमीटर अंतर चालत आहे. दररोज चालणाऱ्या सदस्यांची नावे आणि त्यांचे अंतर ही आकडेवारी एका एक्सेल शीटमध्ये गोळा केली जाते. आषाढी एकादशीच्या दिवशी इंग्लंडमधील ग्लोबल वारीचे सदस्य प्रत्यक्ष आणि ऑनलाइनच्या माध्यमातून लंडनसारख्या मध्यवर्ती ठिकाणी एकत्र जमून वारीचा समारोप करतात. यावेळी इथे जन्मलेल्या आपल्या मुलांना सोबत आणून संतांच्या समतेचा विचार या तरुण मुलांना समजावून देण्याचा प्रयत्न करतात. संत विचारातील मानवी मूल्ये पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे वारी हे साधन आहे, असे इथल्या बहुसंख्य लोकांना वाटते. 

महाराष्ट्रातील कित्येक वर्षांची वारीची ही परंपरा आता सातासमुद्राच्या पलीकडे नव्या स्वरूपात रुजू पाहतेय. भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे' असे विश्वाचे पसायदान मागणारे ज्ञानदेव, 'सकळांसी आहे येथे अधिकार' असे ठणकावून सांगणारे संत तुकाराम, काय कवे कैलास' म्हणजे काम करीत राहिल्याने मोक्ष मिळतो, असे सांगणारे बसवण्णा, 'स्त्री जन्म म्हणोनी न व्हावे उदास' हा विश्वास देणाऱ्या संत जनाबाई या साऱ्या संतांनी मानवी मूल्यांची जोपासना करण्याचा आग्रह धरला. वारीच्या निमित्ताने या परदेशातील महाराष्ट्रीयन माणसांची उजळणी झाली. इथल्या वैज्ञानिक विचारांची जोड देता आली तरी ही वारी सार्थकी लागली....

टॅग्स :Pandharpurपंढरपूरashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022