शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
4
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
5
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
6
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
7
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
8
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
9
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
10
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
11
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
12
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?
13
ज्येष्ठ योगिनी एकादशी: ‘असे’ करा व्रतपूजन, समस्यांतून व्हाल मुक्त; अपार यश-प्रगती लाभेल!
14
४० जणांच्या जमावाकडून घरावर हल्ला, दगडविटांचा केला वर्षाव, महिला, लहान मुले कुणालाच सोडलं नाही  
15
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
16
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
17
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
18
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
19
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
20
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?

हे तर मराठीचे मारेकरीच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2018 02:45 IST

सगळ्या सरकारी व खासगी शाळांमध्ये मराठी भाषा शिकविणे आवश्यक केले जाणार असल्याची आपली घोषणा राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना लगेचच मागे घेऊन गिळावी लागली, या एवढे त्यांचे, त्यांच्या सरकारचे व महाराष्ट्राचे दुर्दैव दुसरे नाही.

सगळ्या सरकारी व खासगी शाळांमध्ये मराठी भाषा शिकविणे आवश्यक केले जाणार असल्याची आपली घोषणा राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना लगेचच मागे घेऊन गिळावी लागली, या एवढे त्यांचे, त्यांच्या सरकारचे व महाराष्ट्राचे दुर्दैव दुसरे नाही. मातृभाषेबाबतची ही माघार तामिळनाडू, आंध्र वा कर्नाटकाच्या मंत्र्याने केली असती, तर तेथील जनतेने त्यांना रस्त्यावर फिरूही दिले नसते. मराठी या आपल्याच मातृभाषेबद्दल महाराष्ट्र सरकारने आजवर घेतलेले पवित्रे व त्यातली वळणे पाहिली की, या सरकारला त्या भाषेविषयीची मातृभावना आहे की नाही, असाच प्रश्न आपल्याला पडावा.

मराठी भाषिकांचे वेगळे राज्य व्हावे, म्हणून मराठी जनतेने केलेला त्याग मोठा आहे. त्यासाठी एकट्या मुंबईत १०८ माणसांनी हौतात्म्य पत्करले आहे. मराठवाडा त्यात स्वेच्छेने सहभागी झाला. विदर्भाने काही अटी पुढे करून व अकोला आणि नागपूर हे दोन करार करून ते राज्य पूर्ण केले. देशी भाषांना व विशेषत: मोठ्या प्रादेशिक भाषांना त्यांच्या प्रदेशात अग्रेसरत्वाचा मान मिळावा, ही भूमिका तावड्यांच्या हाती मंत्रिपद येण्याच्या किमान दहा दशके आधीच काँग्रेसने घेतली. १९२१ मध्ये म. गांधींनी स्वातंत्र्यलढ्याची सूत्रे हाती घेतली, तेव्हाच प्रादेशिक भाषांचा सन्मान व बूज राखली जाईल, असे आश्वासन त्यांनी देशाला दिले. स्वातंत्र्य दूर असताना व देशावर ब्रिटिशांचे राज्य असताना, गांधीजी व काँग्रेसने हा धाडसी निर्णय तेव्हा घेतला व त्याला देशानेही उत्साहाने साथ दिली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशात भाषावार प्रांतरचना झाली आणि ती करण्यासाठी पं. हृदयनाथ कुंझरू यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली गेली. तेव्हा गांधींचे ते स्वप्न साकार होईल आणि आपल्या मातृभाषांना राजभाषांचा दर्जा मिळेल, अशा आनंदात सारे होते. प्रत्यक्षात तसे काही घडले नाही, देशातील इतर भाषांना तो मान क्रमाने मिळत गेला. मराठी मात्र दरबाराच्या दाराशीच आपला हक्क मागत उभी राहिली. त्यासाठी राजकीय पक्षांनी आंदोलने केली, साहित्यिकांनी मागण्या केल्या व तेवढ्यासाठी राज्यात राजकीय पक्ष उभे राहिले. मात्र, आंदोलन, उपोषण व प्रचंड गदारोळ हे सारे होऊनही मराठी भाषा दरबाराच्या दाराबाहेरच राहिली. कधी सरकारचे निर्णय मराठीत असतील, कधी प्रशासनाने आदेश मराठीत असतील, तर कधी न्यायालयात ती वापरली जाईल, असे म्हटले गेले, पण प्रत्यक्षात मात्र ती साऱ्या क्षेत्रातून हद्दपारच होताना दिसली.

एके काळी हैदराबादच्या निजामाला त्यांचे शालेयच नव्हे, तर अभियांत्रिकी व वैद्यकीय शिक्षणही उर्दू भाषेत आणता आले, पण यशवंतराव ते फडणवीस या मराठी पुढाºयांना उर्दूला निजामशाहीत मिळाला, तो दर्जा मराठीला महाराष्टÑात देता आला नाही. आता तर सामान्य मराठी कुटुंबेदेखील आपली मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळांत पाठवितात. जिल्हा परिषदा व नगर परिषदांनीही त्यांच्या शाळांत इंग्रजी माध्यम आणले. वास्तविक मराठीतही नोकºया आहेत. संगणकावरही मराठी आहे आणि राज्यातही ८० टक्क्यांहून अधिक लोक मराठीच बोलतात; तरीही मराठीचा असा प्राण घेण्यास कोण जबाबदार आहे? प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन स्तर ते व्यावसायिक अभ्यासक्रमातील पुस्तके मराठीत आणायला कुणी कुणाला अडविले? एवढ्या वर्षांत त्यासंबंधीच्या पुस्तकांचे अनुवाद का झाले नाहीत? सरकारने त्यांना प्रोत्साहन व अनुदान का दिले नाही? मराठी माणसांचे व नेत्यांचे पुतळे बांधणाºयांना त्यांच्या मातृभाषेला का जगविता येऊ नये? आता तर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, अशी मागणी होत आहे. मात्र, ती होत असतानाच शिक्षणमंत्री तावडे मराठी भाषा गुंडाळून ठेवण्याची भाषा बोलत आहेत. तिच्याविषयीचे आश्वासन गिळत आहेत. सरकारचे तोंड आणि करणी यातील हा फरक साठ वर्षांहून अधिक जुना आहे, याचे एक कारण हितसंबंधात दडले आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे संचालक व उद्योगपती यांचा दबावच सरकारला मराठीचा गळा आवळायला लावत आहे. कारण त्यांना शिक्षणाचे इंग्रजीकरण हवे आहे आणि सरकार? ते तर त्यांच्या तालावर नाचायला तयारच आहे. या स्थितीत मराठीला कोण वाचविणार? ज्यांनी वाचवायचे, तेच तिच्या जिवावर उठले असतील तर?

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडेmarathiमराठी