शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

कोरोना, भारतीय समाज आणि ‘सोशल कनेक्ट’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2020 05:21 IST

संकटकाळी आपणही समाजाचे काही देणे लागतो, ही जाणीव ठेवून सर्व स्तरांतील लोक जमेल तशी मदत करताहेत. कुठलाही जातीभेद, धर्मभेद अथवा पंथभेद न मानता. कोरोनासारखेच.

- सविता देव हरकरे, उप वृत्तसंपादक, लोकमत, नागपूरकोरोनाशी लढा देत असताना यावर नियंत्रणासाठी सर्वाधिक प्रभावी उपाय ठरत असलेल्या लॉकडाऊनमुळे या देशातील लोकांच्या जीवनशैलीत अनेक बदल घडवून आणलेत. गत अनेक वर्षांपासून आपल्याच विश्वात गाढ झोपलेल्यांना एका विषाणूने जागे केले. अशांना सत्ता, संपत्ती किती मिथ्या आहे, याची जाणीवच करून दिली नाही, तर कमी गरजांमध्ये दैनंदिन जीवन कसे जगता येऊ शकते, याचा धडाही दिला. महत्त्वाचे म्हणजे सामाजिक भान. जे कुठेतरी कमी होत चालले होते, पुन्हा निर्माण होत असल्याचे चित्र गेल्या पंधरवड्यात बघायला मिळाले.या संकटकाळी आपणही समाजाचे काही देणे लागतो, ही जाणीव ठेवून सर्व स्तरांतील लोक जमेल तशी मदत करताहेत. कुठलाही जातीभेद, धर्मभेद अथवा पंथभेद न मानता. कोरोनासारखेच. कारण, त्यालाही कोण कुणाचा शत्रू, कुणाचा मित्र यांच्याशी काही देणे-घेणे नाही. त्याच्यासाठी सर्व सारखेच. असो, पण लोकांनी लग्नासारख्या आयुष्यातील सर्वोच्च आनंदाच्या क्षणाशीसुद्धा तडजोड केल्याचे दिसून आले. काहींनी विवाह पुढे ढकलले, तर काहींनी कुटुंबातच विधी उरकला. याच शृंखलेत एका प्रेमीयुगुलाने ऑनलाईन विवाह करून नवा पायंडा घालून दिला. खरं तर गत सहा महिन्यांपासून त्यांनी लग्नाची जय्यत तयारी केली होती. ती कोरोनात वाहून गेली, पण या समजदार युगुलाने आनंदात मिठाचा खडा पडू द्यायचा नाही असे ठरवले आणि करून दाखवले. सामाजिक बांधीलकीचे आणखी एक उदाहरण दिल्लीत बघायला मिळाले. तेथील मराठी प्रतिष्ठानने अडकून पडलेल्या मराठी विद्यार्थ्यांच्या जेवणाची जबाबदारी घेतली. स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी राज्यातून अनेक मुलं-मुली तिथे जातात. लॉकडाऊनमुळे ते अडचणीत सापडले होते. प्रतिष्ठानने त्यांना दिलासा दिला.

नागपूरमध्ये काही तरुणांनी सोशल कनेक्ट नावाचा देशव्यापी सेतू तयार केला आहे. भुकेलेल्यांना अन्न, आजारींना औषधोपचार, ज्येष्ठांना हवे ते सहकार्य दिले जातेय. यानिमित्ताने मदतीचे असंख्य हात पुढे येत आहेत. महिला बचत गटही मास्क निर्मितीत महत्त्वाचे योगदान देत आहे. त्याच्या सहभागाने देशात दीड कोटीवर मास्क तयार झाले. आरोग्य कर्मचारी व सामान्यांच्या उपयोगात ते येत आहेत. शहर व गावपातळीवरही लोक ‘फुल ना फुलाची पाकळी’ जमेल तशी मदत करताहेत. विविध स्तरांतून येणाऱ्या अशा बातम्या या संकटसमयीही उत्साह वाढविणाºया आणि आशावर्धक आहेत. हा समाज जिवंत असल्याचे हे द्योतक आहे. या काळात घराबाहेर न पडणे हीसुद्धा समाजसेवाच ठरणार आहे. अनेक सूज्ञ नागरिकांनी संचारबंदीच्या काळात घरातच स्वत:ला गुंतवून ठेवलंय. घरातील स्वच्छता, दैनंदिन कामे, वाचन, लिखाण, व्यायाम संगीत यात रममाण होताहेत. हा सकारात्मक बदल आहे.
सामाजिक शिस्त नावाचा प्रकार तसा आपल्या येथे दुर्मीळच, पण या काळात तोही बघायला मिळतोय. कोरोनाच्या भीतीने असो वा पोलिसांच्या, लोक शिस्त पाळायला लागलेत. त्यामुळे कोरोना संकट विरल्यानंतर नेमके काय घडणार? या जीवघेण्या विषाणूच्या संसर्गाचे भय व खबरदारी म्हणून केलेल्या लॉकडाऊनची मुदतही लवकरच संपेल. त्यानंतर काय? आज लोकांनी आपल्या जीवनशैलीत, सवयींमध्ये जो बदल केलाय तो ते कायम ठेवणार की ‘येरे माझ्या मागल्या’ अशी स्थिती होणार हे सांगणे कठीण आहे, पण यासंदर्भात विनोबाजींचा कारागृहातील अनुभव प्रेरणादायक आहे. त्यांना इंग्रजांनी अंधाºया कोठडीची शिक्षा दिली होती. अशा वातावरणात ते खचतील, त्यांची प्रकृती ढासळेल व ते क्षमा मागतील अशी इंग्रज सरकारला अपेक्षा होती, पण त्यानंतर जे घडले ते आश्चर्यकारक होते. दिवसागणिक ते अधिक तजेलदार दिसायला लागले होते. विनोबांनी २४ तासांचे नियोजन केले. लहानशा खोलीतच ते अनेक मैलांचे अंतर चालत. योग, ध्यानधारणा सुरू होतीच. त्यांच्यासाठी जेवण घेऊन येणाºया पहारेकºयाच्या समस्या जाणून त्याला सल्ला देऊ लागले. जेलमधील इतर लोकांची समस्या निवारणासाठी गर्दी होऊ लागली. हा प्रकार बघून इंग्रज जेलरही चकित झाला. पुढे तर जेलमध्ये कैद्यांसाठी गीतेच्या प्रवचनाचे वर्ग सुरू झाले. स्वत: अंधार कोठडीत असतानाही समाजासाठी काय करता येईल, याचा विचार त्यामागे होता. आपल्याला स्वत:च्या घरात राहून ते शक्य नाही का?

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या