शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीच्या कामासाठी चिडचिड अन् नाराजीही; कर्मचारी उपलब्ध करून घेताना नाकीनऊ यावेत? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2024 10:47 IST

महाराष्ट्रात कर्मचारी उपलब्ध करताना निवडणूक विभाग मेटाकुटीला आला आहे. निवडणुकांसाठी सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील मनुष्यबळ घेतले तर गदारोळ माजला व निर्णय रद्द करावा लागला.

रविकिरण देशमुख वृत्तसंपादक

निवडणुकीचा उत्सव सुरू झाला आहे. मतदारराजाने अधिकाधिक सहभाग नोंदवावा म्हणून साकडे घातले जात आहे. पुढची ५ वर्षे हा देश कोणी चालवावा हे ठरवायचे आहे. पण, या उत्सवाचे आयोजन ज्यांनी करायचे, निवडणूक कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पाडण्याची हमी घ्यायची त्या प्रशासनात बऱ्याच कुरबुरी, नाराजी आहे. काहीशी धास्ती, चिडचिड अन् उद्विग्नता आहे. जबाबदारीतून सुटलो तर बरे, अशी भावना आहे. असे का व्हावे?

सध्या सुरू असलेला लोकसभा निवडणूक कार्यक्रम पार पाडण्यासाठी देशात दीड कोटी आणि राज्यात सुमारे साडेपाच लाख सरकारी कर्मचारी आवश्यक आहेत. यासाठी शासकीय, निमशासकीय सेवेत कार्यरत असलेले अधिकारी, कर्मचारी पुरेसे पडत नसल्याने अनुदानित शाळांतील तसेच खासगी शाळांतील शिक्षक, आयुर्विमा महामंडळ, बँकांतील कर्मचारी यांच्याही सेवा घेतल्या आहेत. तरीही समस्या कायम आहेत.

महाराष्ट्रात कर्मचारी उपलब्ध करताना निवडणूक विभाग मेटाकुटीला आला आहे. निवडणुकांसाठी सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील मनुष्यबळ घेतले तर गदारोळ माजला व निर्णय रद्द करावा लागला. धर्मादाय आयुक्त कार्यालयातील कर्मचारी घेतले तर ते थेट हायकोर्टात गेले आणि निर्णय रद्द झाला. जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका शाळांतील शिक्षकांसोबत खासगी शाळांतील शिक्षकांच्या सेवा घेतल्या तर विरोध झाला. मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी तर शिक्षकांनी या कामावर जाऊ नये, अशी गर्जना केली. पण, त्या आधीच ते रुजू झाले होते.मुंबई महापालिकेतील १० हजार कर्मचारी घेतले तर पालिका प्रशासन ठप्प होईल असे म्हटले जाते. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनातले आणि पाणी पुरवठ्याची व्यवस्था सांभाळणारे चावीवालेही घेतले आहेत. या महानगराचा पाणीपुरवठा ठप्प करायचा आहे का, अशी विचारणा ते करत आहेत. 

निवडणूक कामासाठी आयोजित प्रशिक्षणाला हजर का राहिला नाहीत म्हणून मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयाने काही हजार शासकीय कर्मचाऱ्यांना नोटीस बजावल्या आहेत. यात शिक्षकही आहेत. त्यांनी कोर्टात जाण्याची तयारी सुरू केली आहे. हे सारे का होते याचा विचार होतोय का? अर्थातच नाही, कारण याची उघडपणे चर्चा होत नाही. करण्याची कोणाची तयारी नाही. खरे तर दर ५ वर्षांनी निवडणूक ठरलेली आहे. लोकांनी आपल्या पसंतीचे सरकार निवडून द्यावे यासाठी ती आवश्यक आहे. या सरकारकडूनच लोकांचे प्रश्न हाताळण्यासाठी प्रशासन यंत्रणा आवश्यक असते. या अवाढव्य यंत्रणेचे वेतन, भत्ते, पेन्शन यासाठी दरवर्षी अर्थसंकल्पातून तरतूद करून घ्यावी लागते. राज्यात चालू वर्षात कर्मचाऱ्यांच्या वेतनावर राज्याच्या तिजोरीतून १.५९ लाख कोटी रुपये खर्च होणार आहेत. पेन्शनचा खर्च ७४ हजार कोटी आहे. असे खर्च मंजूर करण्यासाठी तरी लोकसभा आणि विधानसभा अन् त्यासाठी निवडणुका आवश्यक असतात. तरीसुद्धा कर्मचारी उपलब्ध करून घेताना नाकीनऊ यावेत? 

आजमितीला आपल्या राज्यात सरकारी कर्मचाऱ्यांची मंजूर पदे ७.१९ लाख आहेत. त्यापैकी सुमारे २ लाख पदे रिक्त आहेत. दरवर्षी साधारणपणे ३ टक्के शासकीय कर्मचारी सेवानिवृत्त होतात. कर्मचारी भरती आणि वाद यात नावीन्य राहिलेले नाही. भरतीत राज्य लोकसेवा आयोगाची भूमिका महत्त्वाची आहे. पण, त्यांच्या मर्यादा स्पष्ट आहेत. खासगी कंपन्यांमार्फतची भरती वादग्रस्त आणि कंत्राटी पद्धतीला प्रचंड विरोध आहे. भरीस म्हणून जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका आणि महानगरपालिकांतील सुमारे ४५ टक्के पदे रिक्त आहेत. मुंबई महानगरपालिकेत सुमारे ९३ हजार कर्मचारी असले तरी वरिष्ठ पदे मर्यादित आणि रिक्त पदांची संख्या खूप मोठी आहे, असे म्हणणे आहे. 

निवडणुकीच्या कामाला नकार का दिला जातो, असे विचारले तर अनेक कारणे दिली जातात. एक तर हे टीमवर्क कमी आणि वैयक्तिक जोखमीचे काम अधिक आहे. एरवी कार्यालयीन कामात कोणी अडचणीत सापडला तर अधिकारी, कर्मचारी संघटना रक्षणार्थ धावतात. निवडणुकीच्या कामात मात्र हस्तक्षेप खपवून घेतला जात नाही. निवडणूक निर्विघ्न आणि निर्दोष पार पाडणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य एकजुटीने पार पाडायचे आहे. पण, मतदान केंद्र भलत्याच ठिकाणचे दिले म्हणूनही तक्रार आहे, सोबत अनेकांचे आरोग्याचे प्रश्न आहेत.  निवडणूक कार्यक्रमात फक्त काटेकोरपणे पाळावयाच्या नियमांची पुस्तिका आहे. कामात कसूर झाली तर थेट निलंबन आणि कारवाई आहे. आपण सारे भारतीय एक आहोत हे ऐकायला खूप छान आहे. पण, साऱ्या काही ‘कंडिशन्स अप्लाय’ आहेत.

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४