शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यत्वाची जेथ प्रचिती...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 12:55 IST

मिलिंद कुलकर्णी पंचवार्षिक निवडणुकांचा हंगाम काही महिन्यांवर आलेला असताना जळगाव जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रातील दोन ऋषीतुल्य व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड जाणे ...

मिलिंद कुलकर्णीपंचवार्षिक निवडणुकांचा हंगाम काही महिन्यांवर आलेला असताना जळगाव जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रातील दोन ऋषीतुल्य व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड जाणे हे संपूर्ण राजकारणाचे मोठे नुकसान आहे. राजकीय क्षेत्र केवळ निसरडे नाहीतर अतीशय गढूळ झाल्याच्या वातावरणात ज्यांच्याकडे पाहून राजकारण आणि राजकीय नेत्यांवरील श्रध्दा आणि विश्वास काही अंशी टिकून राहत होता, तीच पटलावरुन दूर झाल्याने जनतेला हे क्षेत्र निर्नायकी वाटू लागेल.शिक्षकी पेशातून राजकारणात आलेले वाय.जी.महाजन आणि वैद्यकीय व्यवसायातून राजकारणात आलेले डॉ.गुणवंतराव सरोदे या दोन निगर्वी, सालस आणि ऋषीतुल्य व्यक्तीमत्वांचे निधन हे सर्वसामान्य जनतेला चटका लावून जाणारे आहे. दोन्ही नेते सत्ताधारी भाजपाचे असल्याने त्यांच्या मार्गदर्शनाची नितांत गरज आजच्या भाजपाला आहे. भाजपा सत्तेत असल्याने मोठ्या संघर्षाचा अनुभव पक्ष घेत आहे. सत्ता राबवित असताना विविध समाजघटकांची वाढलेली अपेक्षा, वर्षानुवर्षे उपेक्षित व वंचित राहिलेल्या घटकांना या सरकारकडून असलेली आशा, २०१४ मध्ये सत्तेत येण्यापूर्वी भाजपाने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करताना होणारी ओढाताण, पक्षातील निष्ठावंत आणि पक्षाबाहेरुन आलेली नेते-कार्यकर्ते यांच्यातील अंतर्विरोध अशा पार्श्वभूमीवर महाजन, सरोदे यांच्यासारख्या समंजस, समन्वयवादी नेत्यांची आवश्यकता होती. परंतु, त्यांच्या निधनाने भाजपाला मोठा धक्का बसला आहे.दोन्ही नेत्यांचे विचार, आचरण आणि कार्यशैली ही कार्यकर्त्यांसाठी आदर्श आणि अनुकरणीय राहिली आहे. राजकारण हे जनतेच्या सेवेचे एक साधन आहे, अशा विचारसरणीच्या दिनदयाल उपाध्याय, डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी, नानाजी देशमुख, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांच्या साखळीतील हे दोन्ही नेते एक धागा होते. वैद्यकीय व शिक्षकी पेशा सांभाळून त्यांनी राजकारण केले. पक्षाने जबाबदारी दिली, ती सांभाळली. यशस्वीपणे पेलली. पक्षाने थांबायला सांगितले, तेव्हा थांबले आणि मार्गदर्शकाच्या भूमिकेत आजीवन कार्य केले. कोठेही खळखळ नाही, असंतोष नाही, उद्वीग्नता नाही की अस्वस्थता नाही. शांत, संयमी आणि समाधानी असे आयुष्य दोन्ही नेते जगले.डॉ.सरोदे हे रावेरसारख्या कॉंग्रेसी विचारधारेच्या मतदारसंघातून निवडून आले. सर्वोदयी विचारसरणीतून ते भाजपामध्ये स्थिरावले. जळगाव जिल्ह्यातील भाजपाचे पहिले आमदार आणि खासदार बनण्याचा मान त्यांच्या नावे जमा असला तरी कधीही त्यांनी अहंकार बाळगला नाही. किंवा त्याचा सतत उच्चार केला नाही. त्यांच्यानंतर पक्षात आलेले आणि पक्षाने सगळी पदे दिल्यानंतरही काही काळ सत्तेपासून दूर होताच अन्यायाची भाषा करु लागतात. ४० वर्षे पक्षासाठी दिली, पक्ष वाढवला असा दावा करीत असताना महाजन, सरोदे, मेंडकी, फडके, पालवे, करमरकर ही नावे सोयीस्कर बाजूला ठेवली जातात. पण इतिहास बदलता येत नाही आणि व्यक्तींच्या हृदयातील नावे पुसता येत नाही, हे त्यांना कोण सांगेल.वाय.जी.महाजन यांची जिल्हा परिषदेच्या अध्यक्षापासून तर खासदारकीपर्यंत कारकिर्द राहिली. धिप्पाड देह, पीळदार मिशा असलेला हा माणूस मनमोकळा आणि दिलदार होता. लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी लाच मागितल्याच्या आरोपावरुन त्यांची खासदारकी गेली; महाजन सर सक्रीय राजकारणातून स्वत:हून बाजूला गेले. सर असे करणार नाही, असा विश्वास सर्वसामान्य जनतेला आणि कार्यकर्त्यांना होता, त्यामुळे त्यांच्याप्रती लोभ कायम होता.दुसऱ्यांच्या ताब्यातील संस्था बळकाविण्याचा उद्योग करणारी मंडळी असताना महाजन, सरोदे यांना इतर पक्षीय, विचारसरणीची मंडळी आवर्जून संस्थांमध्ये आमंत्रित करीत असत. फैजपूरच्या मधुकर सहकारी साखर कारखान्याशी सरोदे यांचा स्रेह शेवटच्या आठवड्यापर्यंत कायम होता. नशिराबादचे वाचनालय असो की, जळगावचे मॉडर्न गर्ल्स हायस्कूल असो, महाजन यांच्या शब्दाला तिथे मान होता.राजकारण आणि पक्षात काळानुसार बदल होत असतात, परिस्थिती आपण बदलू शकत नाही, हे लक्षात घेऊन स्वत:हून दूर होण्याची दूरदृष्टी आणि समंजसपणा या दोघा नेत्यांमध्ये होता. त्यामुळे राजकारण्यांमध्ये विरळा आढळणारा शांत, समाधानीपणा या दोघांमध्ये आकंठ भरलेला दिसला. कधीही खाजगीत उखाळ्यापाखाळ्या करणार नाही. त्यांची भेट आणि सहवास हा उर्जा देणारा आणि दिशादर्शक असाच राहिले आहे. पक्षाने, नेत्यांनी उपेक्षा केली तरीही ‘इदं न मम्’ असे म्हणत मी निष्ठावंत सैनिक आहे, समाजाने मला खूप दिले अशीच भावना त्यांच्या उक्ती आणि कृतीतून सतत झिरपत असे.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव