शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
2
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
3
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
4
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
5
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
6
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
7
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
8
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
9
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
10
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
11
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
12
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
13
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
14
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
15
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
16
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
17
Video: बॉडीबिल्डर्सनी आधी सफाई कामगाराची उडवली खिल्ली, मग पठ्ठ्याने जे केलं ते पाहून...
18
Viral Video: ई- रिक्षा शोरूमबाहेर नेली अन् पेट्रोल टाकून पेटवून दिली; तरुणानं असं का केलं?
19
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
20
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यत्वाची जेथ प्रचिती...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 12:55 IST

मिलिंद कुलकर्णी पंचवार्षिक निवडणुकांचा हंगाम काही महिन्यांवर आलेला असताना जळगाव जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रातील दोन ऋषीतुल्य व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड जाणे ...

मिलिंद कुलकर्णीपंचवार्षिक निवडणुकांचा हंगाम काही महिन्यांवर आलेला असताना जळगाव जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रातील दोन ऋषीतुल्य व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड जाणे हे संपूर्ण राजकारणाचे मोठे नुकसान आहे. राजकीय क्षेत्र केवळ निसरडे नाहीतर अतीशय गढूळ झाल्याच्या वातावरणात ज्यांच्याकडे पाहून राजकारण आणि राजकीय नेत्यांवरील श्रध्दा आणि विश्वास काही अंशी टिकून राहत होता, तीच पटलावरुन दूर झाल्याने जनतेला हे क्षेत्र निर्नायकी वाटू लागेल.शिक्षकी पेशातून राजकारणात आलेले वाय.जी.महाजन आणि वैद्यकीय व्यवसायातून राजकारणात आलेले डॉ.गुणवंतराव सरोदे या दोन निगर्वी, सालस आणि ऋषीतुल्य व्यक्तीमत्वांचे निधन हे सर्वसामान्य जनतेला चटका लावून जाणारे आहे. दोन्ही नेते सत्ताधारी भाजपाचे असल्याने त्यांच्या मार्गदर्शनाची नितांत गरज आजच्या भाजपाला आहे. भाजपा सत्तेत असल्याने मोठ्या संघर्षाचा अनुभव पक्ष घेत आहे. सत्ता राबवित असताना विविध समाजघटकांची वाढलेली अपेक्षा, वर्षानुवर्षे उपेक्षित व वंचित राहिलेल्या घटकांना या सरकारकडून असलेली आशा, २०१४ मध्ये सत्तेत येण्यापूर्वी भाजपाने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करताना होणारी ओढाताण, पक्षातील निष्ठावंत आणि पक्षाबाहेरुन आलेली नेते-कार्यकर्ते यांच्यातील अंतर्विरोध अशा पार्श्वभूमीवर महाजन, सरोदे यांच्यासारख्या समंजस, समन्वयवादी नेत्यांची आवश्यकता होती. परंतु, त्यांच्या निधनाने भाजपाला मोठा धक्का बसला आहे.दोन्ही नेत्यांचे विचार, आचरण आणि कार्यशैली ही कार्यकर्त्यांसाठी आदर्श आणि अनुकरणीय राहिली आहे. राजकारण हे जनतेच्या सेवेचे एक साधन आहे, अशा विचारसरणीच्या दिनदयाल उपाध्याय, डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी, नानाजी देशमुख, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांच्या साखळीतील हे दोन्ही नेते एक धागा होते. वैद्यकीय व शिक्षकी पेशा सांभाळून त्यांनी राजकारण केले. पक्षाने जबाबदारी दिली, ती सांभाळली. यशस्वीपणे पेलली. पक्षाने थांबायला सांगितले, तेव्हा थांबले आणि मार्गदर्शकाच्या भूमिकेत आजीवन कार्य केले. कोठेही खळखळ नाही, असंतोष नाही, उद्वीग्नता नाही की अस्वस्थता नाही. शांत, संयमी आणि समाधानी असे आयुष्य दोन्ही नेते जगले.डॉ.सरोदे हे रावेरसारख्या कॉंग्रेसी विचारधारेच्या मतदारसंघातून निवडून आले. सर्वोदयी विचारसरणीतून ते भाजपामध्ये स्थिरावले. जळगाव जिल्ह्यातील भाजपाचे पहिले आमदार आणि खासदार बनण्याचा मान त्यांच्या नावे जमा असला तरी कधीही त्यांनी अहंकार बाळगला नाही. किंवा त्याचा सतत उच्चार केला नाही. त्यांच्यानंतर पक्षात आलेले आणि पक्षाने सगळी पदे दिल्यानंतरही काही काळ सत्तेपासून दूर होताच अन्यायाची भाषा करु लागतात. ४० वर्षे पक्षासाठी दिली, पक्ष वाढवला असा दावा करीत असताना महाजन, सरोदे, मेंडकी, फडके, पालवे, करमरकर ही नावे सोयीस्कर बाजूला ठेवली जातात. पण इतिहास बदलता येत नाही आणि व्यक्तींच्या हृदयातील नावे पुसता येत नाही, हे त्यांना कोण सांगेल.वाय.जी.महाजन यांची जिल्हा परिषदेच्या अध्यक्षापासून तर खासदारकीपर्यंत कारकिर्द राहिली. धिप्पाड देह, पीळदार मिशा असलेला हा माणूस मनमोकळा आणि दिलदार होता. लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी लाच मागितल्याच्या आरोपावरुन त्यांची खासदारकी गेली; महाजन सर सक्रीय राजकारणातून स्वत:हून बाजूला गेले. सर असे करणार नाही, असा विश्वास सर्वसामान्य जनतेला आणि कार्यकर्त्यांना होता, त्यामुळे त्यांच्याप्रती लोभ कायम होता.दुसऱ्यांच्या ताब्यातील संस्था बळकाविण्याचा उद्योग करणारी मंडळी असताना महाजन, सरोदे यांना इतर पक्षीय, विचारसरणीची मंडळी आवर्जून संस्थांमध्ये आमंत्रित करीत असत. फैजपूरच्या मधुकर सहकारी साखर कारखान्याशी सरोदे यांचा स्रेह शेवटच्या आठवड्यापर्यंत कायम होता. नशिराबादचे वाचनालय असो की, जळगावचे मॉडर्न गर्ल्स हायस्कूल असो, महाजन यांच्या शब्दाला तिथे मान होता.राजकारण आणि पक्षात काळानुसार बदल होत असतात, परिस्थिती आपण बदलू शकत नाही, हे लक्षात घेऊन स्वत:हून दूर होण्याची दूरदृष्टी आणि समंजसपणा या दोघा नेत्यांमध्ये होता. त्यामुळे राजकारण्यांमध्ये विरळा आढळणारा शांत, समाधानीपणा या दोघांमध्ये आकंठ भरलेला दिसला. कधीही खाजगीत उखाळ्यापाखाळ्या करणार नाही. त्यांची भेट आणि सहवास हा उर्जा देणारा आणि दिशादर्शक असाच राहिले आहे. पक्षाने, नेत्यांनी उपेक्षा केली तरीही ‘इदं न मम्’ असे म्हणत मी निष्ठावंत सैनिक आहे, समाजाने मला खूप दिले अशीच भावना त्यांच्या उक्ती आणि कृतीतून सतत झिरपत असे.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव