शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
2
'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
3
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
4
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
5
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
6
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
7
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
8
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
9
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
10
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
11
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
12
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
13
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
14
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
15
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
16
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
17
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
18
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
19
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
20
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा

मनाचिये गुंथी - हा प्रवास सुंदर आहे

By admin | Updated: March 31, 2017 00:17 IST

प्रत्येक माणसाला मुक्कामाची ओढ असते. तिथे पोहोचल्यावर काय काय करायचे हे त्याने आधीच ठरवून ठेवलेले असते

प्रत्येक माणसाला मुक्कामाची ओढ असते. तिथे पोहोचल्यावर काय काय करायचे हे त्याने आधीच ठरवून ठेवलेले असते. त्यासाठी तो अनेक स्वप्नेही रंगवत असतो. पण मुक्काम या शब्दाचा नेमका अर्थ काय, हे समजून घेण्याचा प्रयत्न त्याने कधी केलेला असतो काय? माणसाच्या जीवनाचा प्रवास खरे तर निरंतर सुरू असतो. तो कधी संपत नाही की पूर्ण होत नाही. मग मुक्काम या शब्दाला खरोखरच काय अर्थ राहिला?आपल्याला वाटते की आपण एखाद्या ठिकाणी थांबतो, मुक्काम करतो, विश्रांती घेतो; पण तो मुक्काम नसतोच, ती असते पुढच्या प्रवासाची तयारी. ते असते जीवनाच्या प्रदीर्घ प्रवासाचेच एक दुसरे रूप. पण आपल्या ते लक्षातच येत नाही. या विश्वाच्या पसाऱ्याला ब्रह्मांड असे म्हणतात. ब्रह्मांड गोलाकार असते, ते कुठे सुरू होते आणि कुठे संपते हे सांगता येत नाही तसेच आयुष्याच्या प्रवासाचे असते. तो प्रवास कुठून सुरू होणार, कुठे घेऊन जाणार आणि कुठे संपणार, हे कुणालाच माहीत नसते. जसजसे पुढे जावे तसतसे क्षितिजही पुढे पुढे सरकत राहावे तसाच हा प्रकार असतो. अजून थोडा प्रवास बाकी आहे, अजून थोडा, अजून थोडा.. असे म्हणता म्हणता माणसे थकून जातात. मुक्कामी पोहोचल्यावर आराम करू, खाऊ-पिऊ, आनंदात राहू, मौजमजा करू, असे त्यांनी ठरवलेले असते. पण आपल्या या प्रवासात खऱ्या अर्थाने मुक्काम नाही हे त्यांच्या लक्षातच येत नाही. आनंदाने जगण्याचे, जीवनाचा पुरेपूर आनंद घेण्याचे स्वप्न आपण पुढे पुढे ढकलत आहोत हे त्यांना कळत नाही. मुक्कामी पोहोचल्यावर आनंदाने जगू असे म्हणण्याचा वेडेपणा करत बसण्यापेक्षा प्रवास सुरू असताना, या प्रवासातच आपण आनंदाचा उत्सव साजरा करू, आपली स्वप्ने साकार करण्याचा प्रयत्न करू, असे ते का ठरवत नाहीत? असे म्हणण्यातच माणसाचे खरे शहाणपण आहे हे त्यांच्या लक्षात का येत नाही? यश प्रवासाच्या शेवटी नसते, आनंद प्रवासाच्या शेवटी नसतो, समाधान प्रवासाच्या शेवटी नसते, विश्रांती प्रवासाच्या शेवटी नसते, कारण शेवट ही गोष्टच अस्तित्वात नाही. जो काही असतो, तो प्रवास ! शेवट भ्रामक तर, प्रवास हे वास्तव असते. त्यामुळे जे काही समाधान, आनंद, यश, विश्रांती मिळवायची आहे ती या प्रवासातच शोधली पाहिजे, प्रवास करतानाच ती मिळवली पाहिजे. त्यातच माणसाचे मोठेपण दडलेले आहे. हे एकदा माणसाच्या लक्षात आले की मग त्याचा सारा प्रवासच आनंदमय होऊन जाईल यात काय शंका? इतकेच काय, तर नंतरच्या त्या अज्ञात प्रवासासाठीसुद्धा त्याच्या ठायी एक आनंददायी उत्सुकताच जन्माला येऊ लागेल आणि तोच खरा मोक्ष नाही काय?-  प्रल्हाद जाधव -