शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

मनाचिये गुंथी - हा प्रवास सुंदर आहे

By admin | Updated: March 31, 2017 00:17 IST

प्रत्येक माणसाला मुक्कामाची ओढ असते. तिथे पोहोचल्यावर काय काय करायचे हे त्याने आधीच ठरवून ठेवलेले असते

प्रत्येक माणसाला मुक्कामाची ओढ असते. तिथे पोहोचल्यावर काय काय करायचे हे त्याने आधीच ठरवून ठेवलेले असते. त्यासाठी तो अनेक स्वप्नेही रंगवत असतो. पण मुक्काम या शब्दाचा नेमका अर्थ काय, हे समजून घेण्याचा प्रयत्न त्याने कधी केलेला असतो काय? माणसाच्या जीवनाचा प्रवास खरे तर निरंतर सुरू असतो. तो कधी संपत नाही की पूर्ण होत नाही. मग मुक्काम या शब्दाला खरोखरच काय अर्थ राहिला?आपल्याला वाटते की आपण एखाद्या ठिकाणी थांबतो, मुक्काम करतो, विश्रांती घेतो; पण तो मुक्काम नसतोच, ती असते पुढच्या प्रवासाची तयारी. ते असते जीवनाच्या प्रदीर्घ प्रवासाचेच एक दुसरे रूप. पण आपल्या ते लक्षातच येत नाही. या विश्वाच्या पसाऱ्याला ब्रह्मांड असे म्हणतात. ब्रह्मांड गोलाकार असते, ते कुठे सुरू होते आणि कुठे संपते हे सांगता येत नाही तसेच आयुष्याच्या प्रवासाचे असते. तो प्रवास कुठून सुरू होणार, कुठे घेऊन जाणार आणि कुठे संपणार, हे कुणालाच माहीत नसते. जसजसे पुढे जावे तसतसे क्षितिजही पुढे पुढे सरकत राहावे तसाच हा प्रकार असतो. अजून थोडा प्रवास बाकी आहे, अजून थोडा, अजून थोडा.. असे म्हणता म्हणता माणसे थकून जातात. मुक्कामी पोहोचल्यावर आराम करू, खाऊ-पिऊ, आनंदात राहू, मौजमजा करू, असे त्यांनी ठरवलेले असते. पण आपल्या या प्रवासात खऱ्या अर्थाने मुक्काम नाही हे त्यांच्या लक्षातच येत नाही. आनंदाने जगण्याचे, जीवनाचा पुरेपूर आनंद घेण्याचे स्वप्न आपण पुढे पुढे ढकलत आहोत हे त्यांना कळत नाही. मुक्कामी पोहोचल्यावर आनंदाने जगू असे म्हणण्याचा वेडेपणा करत बसण्यापेक्षा प्रवास सुरू असताना, या प्रवासातच आपण आनंदाचा उत्सव साजरा करू, आपली स्वप्ने साकार करण्याचा प्रयत्न करू, असे ते का ठरवत नाहीत? असे म्हणण्यातच माणसाचे खरे शहाणपण आहे हे त्यांच्या लक्षात का येत नाही? यश प्रवासाच्या शेवटी नसते, आनंद प्रवासाच्या शेवटी नसतो, समाधान प्रवासाच्या शेवटी नसते, विश्रांती प्रवासाच्या शेवटी नसते, कारण शेवट ही गोष्टच अस्तित्वात नाही. जो काही असतो, तो प्रवास ! शेवट भ्रामक तर, प्रवास हे वास्तव असते. त्यामुळे जे काही समाधान, आनंद, यश, विश्रांती मिळवायची आहे ती या प्रवासातच शोधली पाहिजे, प्रवास करतानाच ती मिळवली पाहिजे. त्यातच माणसाचे मोठेपण दडलेले आहे. हे एकदा माणसाच्या लक्षात आले की मग त्याचा सारा प्रवासच आनंदमय होऊन जाईल यात काय शंका? इतकेच काय, तर नंतरच्या त्या अज्ञात प्रवासासाठीसुद्धा त्याच्या ठायी एक आनंददायी उत्सुकताच जन्माला येऊ लागेल आणि तोच खरा मोक्ष नाही काय?-  प्रल्हाद जाधव -