शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

मनाचिये गुंथी - हा प्रवास सुंदर आहे

By admin | Updated: March 31, 2017 00:17 IST

प्रत्येक माणसाला मुक्कामाची ओढ असते. तिथे पोहोचल्यावर काय काय करायचे हे त्याने आधीच ठरवून ठेवलेले असते

प्रत्येक माणसाला मुक्कामाची ओढ असते. तिथे पोहोचल्यावर काय काय करायचे हे त्याने आधीच ठरवून ठेवलेले असते. त्यासाठी तो अनेक स्वप्नेही रंगवत असतो. पण मुक्काम या शब्दाचा नेमका अर्थ काय, हे समजून घेण्याचा प्रयत्न त्याने कधी केलेला असतो काय? माणसाच्या जीवनाचा प्रवास खरे तर निरंतर सुरू असतो. तो कधी संपत नाही की पूर्ण होत नाही. मग मुक्काम या शब्दाला खरोखरच काय अर्थ राहिला?आपल्याला वाटते की आपण एखाद्या ठिकाणी थांबतो, मुक्काम करतो, विश्रांती घेतो; पण तो मुक्काम नसतोच, ती असते पुढच्या प्रवासाची तयारी. ते असते जीवनाच्या प्रदीर्घ प्रवासाचेच एक दुसरे रूप. पण आपल्या ते लक्षातच येत नाही. या विश्वाच्या पसाऱ्याला ब्रह्मांड असे म्हणतात. ब्रह्मांड गोलाकार असते, ते कुठे सुरू होते आणि कुठे संपते हे सांगता येत नाही तसेच आयुष्याच्या प्रवासाचे असते. तो प्रवास कुठून सुरू होणार, कुठे घेऊन जाणार आणि कुठे संपणार, हे कुणालाच माहीत नसते. जसजसे पुढे जावे तसतसे क्षितिजही पुढे पुढे सरकत राहावे तसाच हा प्रकार असतो. अजून थोडा प्रवास बाकी आहे, अजून थोडा, अजून थोडा.. असे म्हणता म्हणता माणसे थकून जातात. मुक्कामी पोहोचल्यावर आराम करू, खाऊ-पिऊ, आनंदात राहू, मौजमजा करू, असे त्यांनी ठरवलेले असते. पण आपल्या या प्रवासात खऱ्या अर्थाने मुक्काम नाही हे त्यांच्या लक्षातच येत नाही. आनंदाने जगण्याचे, जीवनाचा पुरेपूर आनंद घेण्याचे स्वप्न आपण पुढे पुढे ढकलत आहोत हे त्यांना कळत नाही. मुक्कामी पोहोचल्यावर आनंदाने जगू असे म्हणण्याचा वेडेपणा करत बसण्यापेक्षा प्रवास सुरू असताना, या प्रवासातच आपण आनंदाचा उत्सव साजरा करू, आपली स्वप्ने साकार करण्याचा प्रयत्न करू, असे ते का ठरवत नाहीत? असे म्हणण्यातच माणसाचे खरे शहाणपण आहे हे त्यांच्या लक्षात का येत नाही? यश प्रवासाच्या शेवटी नसते, आनंद प्रवासाच्या शेवटी नसतो, समाधान प्रवासाच्या शेवटी नसते, विश्रांती प्रवासाच्या शेवटी नसते, कारण शेवट ही गोष्टच अस्तित्वात नाही. जो काही असतो, तो प्रवास ! शेवट भ्रामक तर, प्रवास हे वास्तव असते. त्यामुळे जे काही समाधान, आनंद, यश, विश्रांती मिळवायची आहे ती या प्रवासातच शोधली पाहिजे, प्रवास करतानाच ती मिळवली पाहिजे. त्यातच माणसाचे मोठेपण दडलेले आहे. हे एकदा माणसाच्या लक्षात आले की मग त्याचा सारा प्रवासच आनंदमय होऊन जाईल यात काय शंका? इतकेच काय, तर नंतरच्या त्या अज्ञात प्रवासासाठीसुद्धा त्याच्या ठायी एक आनंददायी उत्सुकताच जन्माला येऊ लागेल आणि तोच खरा मोक्ष नाही काय?-  प्रल्हाद जाधव -