शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
3
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
4
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
5
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
6
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
7
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
8
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
9
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
10
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
11
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
12
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी
13
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
14
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
15
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
16
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
17
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
18
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
19
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
20
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?

मनाचिये गुंथी - नाटक आणि लोकसंपादणी

By admin | Updated: June 1, 2017 00:18 IST

नाटक आणि रंगभूमी हे मानवी भावभावनांच्या अभिव्यक्तीला लाभलेले एक सांस्कृतिक परिमाण आहे. भरताने नाट्यशास्त्रात

नाटक आणि रंगभूमी हे मानवी भावभावनांच्या अभिव्यक्तीला लाभलेले एक सांस्कृतिक परिमाण आहे. भरताने नाट्यशास्त्रात नाटकाविषयी ‘नाट्यमित्यभिधीयते...’, असे म्हणत जी नाटकांची व्याख्या केली आहे. या जगात सुख-दु:खांनीयुक्त असा लोकस्वभाव दिसून येतो. तोच अंगादी अभिनयांनीयुक्त असला म्हणजे त्याला नाट्य असे म्हणतात. प्रसिद्ध रंगकर्मी आणि नाट्यविषयाच्या अभ्यासक विजया मेहता यांनी रत्नागिरी येथे त्यांच्या शिष्य परिवाराने केलेल्या सत्कार समारंभात म्हटले होते की, रंगमंचावरील मिथ्या जगात वावरत घेतलेला सत्याचा शोध म्हणजे नाट्यकला. कल्पनेचा खोटा फुलवरा निर्माण करून सत्याचा आभास येथे उभा केला जातो आणि मानवी गुण व संवेदना यामध्ये रूपांतरित होतात. नाटक ही भाव आणि अवस्था यांची अनुभूती आहे. या अनुभूतीत सौंदर्य व्यापारही अभिप्रेत आहे. लोकवृत्तीत दिसून येणाऱ्या भाव आणि अवस्था जेव्हा सौंदर्य व्यापारातून अभिव्यक्त होतात तेव्हा ते नाट्य होते. ही अभिव्यक्ती अभिनयाच्या साधनाने होते. हे सांगताना भरताने लोकधर्मी व नाट्यधर्मी अशा दोन धर्मी सांगितल्या आहेत. लोकधर्मी ही अनुभवांच्या अभिनयाशी निगडित आहे तर नाट्यधर्मी ही नाट्यागत सौंदर्य व्यापाराशी निगडित आहे. नाटकाच्या अभिव्यक्तीला आणि सादरीकरणाला कारणीभूत असणारे दोन महत्त्वाचे घटक म्हणजे नट आणि नाटककार. नाटक हा या दोघांचाही व्यापार आहे. नाटककार हा भावाचे अनुकीकरण करण्यासाठी लौकिक प्रवृत्तीचे दर्शन नाटकाच्या कथानकातून घडवतो. नाट्यातील कथावस्तूचा जो भाग लोकवार्ता क्रियेने युक्त होतो त्यालाच लोकधर्मी म्हणायचे. नाटककाराने लिहिलेली उत्तम शब्दकृती उत्तम अभिनयाने ठसविण्याचे काम नटाला करावे लागते. नाटकात संवाद लिहावे लागतात आणि संवाद वठवावे लागतात. संवाद हे नाट्याचे शरीर आहे. ते शब्दसंवादातून जन्म घेते आणि अभिनय संवादातून उभे राहाते. आंगिक, आहार्य आणि सात्त्विक असे तीन प्रकारचे अभिनय असतात. या भूमिकेतून शंभू मित्रा यांचे वाक्य महत्त्वपूर्ण वाटते. ते म्हणतात, ‘नट हा वाद्यही असतो आणि वादकही असतो. तो स्वत:चे वास्तव जीवन विसरून रंगभूमीच्या विश्वासी एकरूपी झालेला असतो. बहुरूपी विविध सोंगे घेतो. त्यात स्त्री-पुरुषांचीही रूपे असतात. ज्ञानदेव म्हणतात; पण तो बहुरूपी स्त्री-पुरुष भाव विसरून ‘लोकसंपादणी तैसीच करतो’ लोकसंपादणी करीत उभा असतो. ही लोकसंपादणीच रंगभूमीवरील नटरंग खुलवीत जातो आणि मानवी भावभावनांचे दर्शन घडवितो.- डॉ. रामचंद्र देखणे -