शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

मनाचिये गुंथी - नीरक्षीरविवेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2017 00:34 IST

हंस पांढराशुभ्र असतो आणि बगळासुद्धा तसाच शुभ्रधवल असतो. मग त्यांच्यात वेगळेपणा कशात असतो

 हंस श्वेतो बक श्वेतो। को भेद: बकहंसयो:नीरक्षीर विवेकेन। हंसो हंस: बको बक:हंस पांढराशुभ्र असतो आणि बगळासुद्धा तसाच शुभ्रधवल असतो. मग त्यांच्यात वेगळेपणा कशात असतो? दूध आणि पाणी यांना वेगळे करण्याची, निवड करण्याची क्षमता हंसात असते. बाह्याकाराने त्याच्यासारख्याच दिसणाऱ्या बगळ्याजवळ निवडीची ही क्षमता, कुशलता नसते ‘चांचूचेनि सांडसे’ (चिमट्याने), खांडिजे (वेगळे करतो) पयपाणी राजहंसे (ज्ञाने ९.४४)‘देखे ऐके, शिवे हुंगे। खाय, जाय, निजे, श्वसे। बोले, सोडी, धरी। वा पापणी हलवी जरी’ या सगळ्या मूलभूत क्रिया जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंतच्या कोणत्याही माणसात एकसारख्या असतात. मात्र नीरक्षीरविवेक, चांगले-वाईट, योग्य-अयोग्य, श्रेयस आणि प्रेयस यातून निवड करण्याची क्षमता आणि शहाणपण फार दुर्मीळ असते. ज्या माणसाजवळ विवेक असतो त्याची निर्णयशक्ती अचूक असते. राग-द्वेषाने, हा आपला तो परका या विचाराने, त्यांच्या निर्णय घेणाऱ्या बुद्धीवर कोणताही पडदा पडत नाही. कारण त्याची बुद्धी स्वच्छ आरशासारखी असते. ती प्रत्येक वस्तूचे खरेखुरे रूप प्रतिबिंबित करते. ‘शापिती ते आरशांना पाहुनि अपुल्या मुखाते’ अशी स्वत:च्या चुकांसाठी समर्थन किंवा सारवासारव त्यात नसते. सत्संगाने व्यक्तीचा विकास होतो; पण पूर्ण विकास होत नाही. सत्पुरुष आणि विवेकी यात अंतर असते. सत्पुरुषाच्या डोळ्यावर निळा चष्मा असतो त्यामुळे त्याला जगातले सारे चांगले दिसते. सत्पुरुष शुक्ल पक्षाकडेच आकर्षित होतो. दुर्जनांच्या डोळ्यावर काळा चष्मा असतो. त्यांना सर्व दोषास्पद दिसते. दोघांनाही जगाचे खरे स्वरूप कळत नाही. नीरक्षीरविवेकी या साऱ्या पलीकडे जात असतात. विवेकी तटस्थपणे विचार करून अचूक निर्णय देतो. तो द्रष्टा असल्याने भविष्याचे रूप जाणतो. कमाल पातळीवरचे त्याचे निर्णय व्यावहारिक पातळीवरही मानले जातात. त्यात एकांगीपणा नसतो. बाह्य संवेदना नसतात. इच्छा, आकांक्षा नसतात. कठोपनिषदातील मार्मिक रूपकात म्हटले आहे की इंद्र्रियरूपी घोड्यांना बुद्धीरूपी सारथी चालवतो. मनाचे लगाम, सारथी बुद्धीच्या हातीच असतात. नाहीतर इंद्रिये उधळून रथाला कुठे खेचून नेतील सांगणे कठीण आहे. बुद्धीची विलक्षण नेत्रदीपक झेप म्हणजे विज्ञान आणि कोमल भावनांमधून जिचे सृजन होते ती कला यांच्यात विरोध नाही. ते एकमेकांविरुद्ध ठाकले तर मात्र अनर्थ, संकटे, सर्वनाश ! सामंजस्य, समन्वय, नीरक्षीरविवेकच जगाला निरंतर, सुरक्षित ठेवू शकतो. ‘सलिली पय जैसे। एकले होऊन मीनले असे परि निवडुनी राजहंसे। वेगळे की जे’ (ज्ञाने अध्याय २-१२७) - डॉ. सौ. प्रज्ञा आपटे -