शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

मनाचिये गुंथी - नीरक्षीरविवेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2017 00:34 IST

हंस पांढराशुभ्र असतो आणि बगळासुद्धा तसाच शुभ्रधवल असतो. मग त्यांच्यात वेगळेपणा कशात असतो

 हंस श्वेतो बक श्वेतो। को भेद: बकहंसयो:नीरक्षीर विवेकेन। हंसो हंस: बको बक:हंस पांढराशुभ्र असतो आणि बगळासुद्धा तसाच शुभ्रधवल असतो. मग त्यांच्यात वेगळेपणा कशात असतो? दूध आणि पाणी यांना वेगळे करण्याची, निवड करण्याची क्षमता हंसात असते. बाह्याकाराने त्याच्यासारख्याच दिसणाऱ्या बगळ्याजवळ निवडीची ही क्षमता, कुशलता नसते ‘चांचूचेनि सांडसे’ (चिमट्याने), खांडिजे (वेगळे करतो) पयपाणी राजहंसे (ज्ञाने ९.४४)‘देखे ऐके, शिवे हुंगे। खाय, जाय, निजे, श्वसे। बोले, सोडी, धरी। वा पापणी हलवी जरी’ या सगळ्या मूलभूत क्रिया जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंतच्या कोणत्याही माणसात एकसारख्या असतात. मात्र नीरक्षीरविवेक, चांगले-वाईट, योग्य-अयोग्य, श्रेयस आणि प्रेयस यातून निवड करण्याची क्षमता आणि शहाणपण फार दुर्मीळ असते. ज्या माणसाजवळ विवेक असतो त्याची निर्णयशक्ती अचूक असते. राग-द्वेषाने, हा आपला तो परका या विचाराने, त्यांच्या निर्णय घेणाऱ्या बुद्धीवर कोणताही पडदा पडत नाही. कारण त्याची बुद्धी स्वच्छ आरशासारखी असते. ती प्रत्येक वस्तूचे खरेखुरे रूप प्रतिबिंबित करते. ‘शापिती ते आरशांना पाहुनि अपुल्या मुखाते’ अशी स्वत:च्या चुकांसाठी समर्थन किंवा सारवासारव त्यात नसते. सत्संगाने व्यक्तीचा विकास होतो; पण पूर्ण विकास होत नाही. सत्पुरुष आणि विवेकी यात अंतर असते. सत्पुरुषाच्या डोळ्यावर निळा चष्मा असतो त्यामुळे त्याला जगातले सारे चांगले दिसते. सत्पुरुष शुक्ल पक्षाकडेच आकर्षित होतो. दुर्जनांच्या डोळ्यावर काळा चष्मा असतो. त्यांना सर्व दोषास्पद दिसते. दोघांनाही जगाचे खरे स्वरूप कळत नाही. नीरक्षीरविवेकी या साऱ्या पलीकडे जात असतात. विवेकी तटस्थपणे विचार करून अचूक निर्णय देतो. तो द्रष्टा असल्याने भविष्याचे रूप जाणतो. कमाल पातळीवरचे त्याचे निर्णय व्यावहारिक पातळीवरही मानले जातात. त्यात एकांगीपणा नसतो. बाह्य संवेदना नसतात. इच्छा, आकांक्षा नसतात. कठोपनिषदातील मार्मिक रूपकात म्हटले आहे की इंद्र्रियरूपी घोड्यांना बुद्धीरूपी सारथी चालवतो. मनाचे लगाम, सारथी बुद्धीच्या हातीच असतात. नाहीतर इंद्रिये उधळून रथाला कुठे खेचून नेतील सांगणे कठीण आहे. बुद्धीची विलक्षण नेत्रदीपक झेप म्हणजे विज्ञान आणि कोमल भावनांमधून जिचे सृजन होते ती कला यांच्यात विरोध नाही. ते एकमेकांविरुद्ध ठाकले तर मात्र अनर्थ, संकटे, सर्वनाश ! सामंजस्य, समन्वय, नीरक्षीरविवेकच जगाला निरंतर, सुरक्षित ठेवू शकतो. ‘सलिली पय जैसे। एकले होऊन मीनले असे परि निवडुनी राजहंसे। वेगळे की जे’ (ज्ञाने अध्याय २-१२७) - डॉ. सौ. प्रज्ञा आपटे -