शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
2
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
3
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
4
हेडचे टी-२० स्टाईल शतक, पहिल्या ॲशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सनसनाटी विजय
5
मुझम्मिलने ५ लाख रुपयांना AK-47 खरेदी केली, डीप फ्रीजरमध्ये ठेवली स्फोटके; धक्कादायक खुलासे
6
मुक्ता बर्वे ४६ व्या वर्षीही अविवाहित; म्हणाली, "आधी स्थळं यायची अन् आताही येतात पण..."
7
Video - मेलेलं झुरळ, वर कीटकांची पावडर... कॉकरोच कॉफी तुफान व्हायरल, जाणून घ्या किंमत
8
जिथं सगळ्यांनी नांगी टाकली, तिथं ट्रॅविस हेडची ‘तोडफोड’ सेंच्युरी! असा पराक्रम करणारा ठरला जगतातील पहिला फलंदाज
9
टीव्हीवर तुफान गाजलेली विनोदी मालिका, 'भाभीजी घर पर है' आता मोठ्या पडद्यावर करणार धमाल
10
'लोकशाही अशीच असावी; भारतात...', ट्रम्प-ममदानी भेटीवर थरुर यांची पोस्ट; काँग्रेसला टोला?
11
सामुद्रिक शास्त्र: शरीराच्या कुठल्या भागावर 'तिळ' आहे, त्यानुसार समुद्र शास्त्र सांगते तुमचे भाकीत!
12
​​​​​​​Kotak Mahindra Bank Success Story: २ खोल्यांपासून झाली सुरुवात, आज ४ लाख कोटींचा टर्नओव्हर; वाचा कोटक महिंद्रा बँकेची अनटोल्ड स्टोरी
13
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये चीनने पाकिस्तानला शस्त्रे पुरवली, राफेलचीही बदनामी केली; अहवालात खुलासा
14
VIDEO : तिकडं स्टार्कचा अप्रतिम फ्लाइंग कॅच; इकडं नेटकऱ्यांनी KL राहुलची उडवली खिल्ली; कारण...
15
Astro Tips: कुंडलीतील गुरुचे स्थान निश्चित करते, तुम्हाला संसार सुख मिळणार की वैराग्य!
16
भयंकर! चालत्या कारला भीषण आग; जीव वाचवण्यासाठी लोकांनी मारल्या उड्या
17
सॅलरी कमी होणार, PF-ग्रॅच्युईटीमध्ये वाढ होणार? नोकरी करणाऱ्या लोकांसाठी अनेक गोष्टी बदलणार
18
जिल्ह्यातील नगरपालिकांमध्ये तडजोडी, आयात उमेदवार अन् फोडाफोडी; अजितदादांच्या ‘ताकदीच्या मर्यादा’ उघड
19
Video - "मी तुम्हाला आणि तुमच्या मुलीला मारून टाकेन"; प्रिन्सिपलची जीवे मारण्याची धमकी
20
‘या’ सरकारी बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या शर्यतीत दिग्गज बँक; अनेक दिवसांपासून सुरू आहे खासगीकरणाचा विचार
Daily Top 2Weekly Top 5

नरेचि केला हीन किती नर ...?

By किरण अग्रवाल | Updated: December 9, 2021 10:51 IST

Editors View : कौटुंबिक व सामाजिक मर्यादांमुळे तक्रार न करता छळ सहन करणाऱ्या मुलींचे काय असा प्रश्न उपस्थित झाल्याखेरीज राहू नये.

- किरण अग्रवाल

जमाना बदलला आहे असे आपण म्हणतो, ते खरेही आहे. काळ बदलला तसा कालौघात व्यवहार, वर्तन व जीवनमानाच्या पद्धतीतही बदल झाला; पण, हा बदल होताना प्रागतिकतेच्या संदर्भाने मानसिकतेत कितपत बदल घडून आला याचा विचार केला तर, तितकेसे समाधानकारक उत्तर हाती येत नाही. शिक्षणाने मनुष्य शिक्षित झाला, परंतु सुशिक्षित झाला का, असा प्रश्न त्यामुळेच निर्माण होतो. विशेषतः जुन्या धारणा अगर विचारधारा असोत, की, अंधश्रद्धांची जळमटे ; अजूनही मोठ्या प्रमाणातील वर्गातून ती निघालेली दिसत नाहीत. वंशाला दिवा मुलगाच हवा म्हणून पुढे आलेला ‘नकोशी’चा मुद्दा असो, अगर जाती धर्माच्या पलीकडे जाऊन केल्या जाऊ पाहणाऱ्या सहजीवनाला काही ठिकाणी होणारा विरोध व त्यातून घडून येणारे ऑनर किलिंग; अशा काही घटना पाहता वैचारिक मागासलेपण पुरेसे दूर झालेले दिसत नाही. पुढारलेपणाचा डांगोरा पिटणाऱ्या सर्वांनीच या संदर्भात चिंता व चिंतन करणे गरजेचे आहे.

बदलत्या काळानुरूप आंतरधर्मीय विवाह सोहळे आता होऊ लागले आहेत. लपतछपत नव्हे तर, उजळ माथ्याने, धूमधडाक्यात उभय पक्षांच्या साक्षीने असे सोहळे होत आहेत ही समाधानाचीच बाब आहे, पण, दुसरीकडे ग्रामीण भागात उच्च नीचता पाळली जाऊन आंतरजातीय विवाहांना अजूनही विरोध होताना दिसून येतो तेव्हा मानसिक मागासलेपण टिकून असल्याचे अधोरेखित होऊन जाते. बरे, हा विरोध फक्त नाराजीपर्यंत न राहता तो थेट खून खराब्यापर्यंत पोहोचताना दिसतो. सैराट या मराठी चित्रपटाद्वारे तेच वास्तव दर्शकांपुढे मांडले गेले. औरंगाबाद जिल्ह्याच्या वैजापूर तालुक्यात गोयगाव येथे अलीकडेच घडलेल्या अशातल्या एका घटनेतूनही तेच पुढे आले. या घटनेतील भीषणता अशी की, प्रेम विवाह केलेल्या गर्भवती बहिणीचे शीर तिच्या आईच्या मदतीने भावानेच धडावेगळे केले व ते शीर घराच्या ओट्यावर ठेवून पोलीस ठाणे गाठले. मनाची निबरता, निर्दयता किंवा निर्ममता किती टोकाची असू शकते हे तर, यातून लक्षात यावेच, पण, आपल्या संतापापुढे कायद्याची भीतीही बाळगली जात नसल्याचे स्पष्ट व्हावे.

 

कोणत्याही मुला-मुलींसाठी आई हीच त्यांची सर्वात जवळची मैत्रीण म्हटली जाते. मन कुणाजवळ मोकळे करावे तर, त्यासाठी आई वा, बहिणीखेरीज दुसरी तितक्या हक्काची जागा नसते, पण, असे असताना एखादी माताच आपल्या मुलीच्या जीवावर उठते तेव्हा भावनांनाच धक्के बसून गेल्याशिवाय राहत नाही. मुलाच्या हव्यासापोटी मुलीचा गर्भातच जीव घेणाऱ्या किंवा अनिच्छेने जन्माला आलेल्या मुलीला ‘नकोशी’ची वागणूक देणाऱ्या मातांबद्दलही आश्चर्य वाटून जाते ते त्याचमुळे. विशेष म्हणजे अशा मानसिकतेतूनच काही छळाच्या घटना घडून जातात, ज्या चीड आणणाऱ्या ठरतात. जालना जिल्ह्यातील भोकरदनमध्ये एका मातेने आपल्या अल्पवयीन मुलीचा तीन वेळा विवाह लावून पुन्हा चौथ्यांदा तिच्या लग्नाची तयारी केल्याचा जो प्रकार पुढे आला तो असाच आहे. याप्रकरणी मुलीच्या तक्रारीवरून तिची आई व दोन भावांसह बारा जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला गेला आहे, त्यामुळे या प्रकरणाचा जो सोक्षमोक्ष लागायचा तो यथावकाश लागेलच, परंतु कौटुंबिक व सामाजिक मर्यादांमुळे तक्रार न करता छळ सहन करणाऱ्या मुलींचे काय असा प्रश्न उपस्थित झाल्याखेरीज राहू नये.

 

अशा घटनांकडे अपवाद म्हणूनच पाहता यावे, पण, वैचारिक बुरसटलेपणाचा अंश टिकून असल्याचे त्यातून लक्षात घेता, दुर्लक्षही करता येऊ नये. भौतिक सुख सोयी व प्रगतीच्या मागे लागताना ग्राम पातळी व तळागाळापर्यंतच्या व्यक्तींचे पूर्णतः मानसिक उन्नयन अजून साधले गेलेले नसल्याची जी बाब यातून पुढे येते, त्यासाठी कुणाला काय करता येईल याचा विचार यानिमित्ताने होणे गरजेचे आहे. आज आधुनिक साधनांमुळे माणूस जवळ आला आहे, पण, तरी माणूस माणसाला पारखा होतो आहे. संवेदना शाबूत असलेल्या माणसांकडून माणुसकीचा प्रत्यय येतोच, परंतु हीन, दीनत्व कायम असलेल्या व्यक्तींच्या मनाची मशागत करण्यासाठी सामाजिक पुढाकार घेतला जायला हवा. एकीकडे चंद्रावर वस्ती करण्याची व मंगळावर पाणी किंवा जीव शोधण्याची धडपड, आणि दुसरीकडे अविवेकी मागासलेपणा; या दोन पातळ्यांमधील अंतर शक्य तितके कमी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न व्हायला हवेत आणि असे प्रयत्न केवळ शासकीय पातळीवरून होऊन चालणार नाही तर, सामाजिक संस्थांच्या माध्यमातूनही त्याला बळ लाभणे गरजेचे आहे इतकेच यानिमित्ताने.