शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

कुपोषित पानगळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2018 00:12 IST

पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने विदर्भातील आणि प्रामुख्याने मेळघाटातील कुपोषणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने विदर्भातील आणि प्रामुख्याने मेळघाटातील कुपोषणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. काही स्वयंसेवी संघटनांनी या गंभीर प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न चालविला आहे. मेळघाटात कुपोषणाची स्थिती अत्यंत गंभीर आहे. या भागात गेल्या २५ वर्षात १४ हजारावर बालकांचा कुपोषणाने जीव गेला. दरदिवशी एक बालक मृत्यूच्या दाढेत जात असल्याचे विदारक चित्र आहे. याशिवाय माता मृत्यूचीही समस्या आहे. हा प्रश्न काही आजचा नाही. गेल्या अनेक वर्षांपासून कुपोषणाने या क्षेत्रात अक्षरश: थैमान घातले आहे. यावर नियंत्रणासाठी शासनाने काहीच केले नाही, असेही म्हणता येणार नाही. अनेक योजना राबविल्या. कोट्यवधींचा निधी दिला. पण तरीही कुपोषणातून मुक्तता मात्र होऊ शकली नाही. उलट त्यात वाढच होत असल्याचे दिसून येते. न्यायालयानेसुद्धा वेळोवेळी याबाबत गंभीर चिंता व्यक्ती करीत राज्य शासनाला निर्देश दिले आहेत, फटकारले आहे. असे असताना एवढ्या वर्षांपासून प्रलंबित हा प्रश्न सुटत नसेल किंवा सुटण्याच्या मार्गावरही नसेल तर शासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष तर करीत नाही ना अथवा नोकरशहांकडून सरकारची दिशाभूल होते आहे का? याबद्दल जनमानसात संशय निर्माण होणे स्वाभाविक आहे. आताही कदाचित ‘नेमेची येतो मग पावसाळा’ या उक्तीप्रमाणे काही दिवस कुपोषणावर विचारमंथन होईल. आकड्यांचा खेळही खेळला जाईल आणि कालांतराने ही समस्या पुन्हा थंडबस्त्यात पडेल. सरकारला खरोखरच कुपोषणावर मात करायची असल्यास या प्रश्नाच्या मुळाशी जावे लागणार आहे. पण दुर्दैवाने अधिकाऱ्यांची अनास्था आणि राजकीय इच्छाशक्तीचा अभाव यात आड येतो आहे. मेळघाटात कुपोषण कमी झाल्याचा दावा केला जात असताना एवढे बालमृत्यू का घडताहेत? आदिवासींसाठी डझनावर योजना राबविल्या जात असताना असे का घडावे? आदिवासींसाठी दिला जाणारा निधी खरोखरच त्यांच्यापर्यंत पोहोचतो की नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. आज वास्तव हे आहे की बहुतांश आदिवासी बांधव दारिद्र्यातच जगत आहेत आणि त्यामुळे वाढते अनारोग्य हा कळीचा मुद्दा आहे. आरोग्य यंत्रणा सक्षम असल्याचा दावा केला जात असला तरी तो किती पोकळ आहे हे सांगायला नको. उपजिल्हा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रांची दैनावस्था कुणापासून लपलेली नाही. अनेक आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टर्स नाहीत. औषधांचा नेहमीच तुटवडा असतो. बालरोगतज्ज्ञ, प्रसूतितज्ज्ञ नाहीत. सोनोग्राफी, रक्तपेढींची सुविधा नाही. येथील बाळंतपणाचे प्रमाण अजूनही दहा ते वीस टक्क्यांवर गेलेले नाही. आदिवासी भागात १० ते १९ वयोगटातील ७२ टक्के मुली कुपोषित असल्याचे २०१३ च्या एका सर्वेक्षणात लक्षात आले होते. पण त्यानंतरही परिस्थितीत फारसा बदल नाही. याला काय म्हणायचे?