शहरं
Join us  
Trending Stories
1
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
2
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
3
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
4
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
5
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
6
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
7
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
8
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
9
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
10
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
11
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
12
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
13
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
14
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
15
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
16
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
17
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
18
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
19
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
20
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल

मल्ल्या सुटणारच!

By admin | Updated: March 11, 2016 03:32 IST

‘प्रेताच्या टाळूवरील लोणी खाणे’, अशी एक म्हण आहे आणि ती अगदी परिस्थितीचा कडेलोट झाल्याशिवाय सहसा वापरली जात नाही.

‘प्रेताच्या टाळूवरील लोणी खाणे’, अशी एक म्हण आहे आणि ती अगदी परिस्थितीचा कडेलोट झाल्याशिवाय सहसा वापरली जात नाही. पण देशातील सर्व राजकारण्यांच्या निर्ढावलेल्या निलाजरेपणाचा कडेलोट विजय मल्ल्या यांच्या प्रकरणात झाल्याचे बघून ही म्हण वापरल्याविना राहावत नाही. हवामानातील बदल आणि आर्थिक चढउतारांमुळे हातची पिके गेल्याने कर्ज परत करता येत नसल्याने महाराष्ट्रासह देशाच्या आणखी काही राज्यात हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्या आहेत. त्यांच्या नावाने सगळे राजकारणी अश्रू ढाळत असतात आणि शेकडो कोटींची ‘पॅकेजेस’ही जाहीर केली जतात. महाराष्ट्रातील सेना-भाजपा युतीचे सरकार तर ‘कर्जमाफी’ नाही, ‘कर्जमुक्ती’वर भर देऊन शेतीतील पेचप्रसंग कायमचा संपवण्याची ग्वाही देत आहे. पण एका पाठोपाठ एक होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या थांबवण्यासाठी तातडीने काही केले जात नाही. मात्र कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी स्वत:चा जीव घेत असलेल्या या देशात राष्ट्रीयीकृत बँकांचे नऊ हजार कोटी बुडवून विजय मल्ल्या परदेशी जाता कामा नये, असे काही कोठल्या राजकारण्याला पोटतिडीकेने वाटत नाही. आत्महत्त्या करणाऱ्या शेतकऱ्यांबाबतचा राजकारण्यांचा कळवळा पुतना मावशीच्या धर्तीचा आहे आणि म्हणूनच हे राजकारणी ‘प्रेताच्या टाळूवरील लोणी खाणारे’ आहेत, असे म्हणणे भाग आहे. या राजकारण्यांचा निर्ढावलेला बनेलपणा इतका पराकोटीचा आहे की, मल्ल्या दोन मार्चलाच परदेशी गेले आणि त्याच दिवशी त्यांना कर्ज देणाऱ्या १९ बँकांनी ‘मल्ल्या यांचा पासपोर्ट जप्त करा, त्यांना परदेशी जाण्यापासून रोखा’, असा अर्ज सर्वोच्च न्यायालयात केला. त्यानंतर आठवडाभराने हा अर्ज सुनावणीसाठी आला, तेव्हा ‘मल्ल्या दोन मार्चला देश सोडून गेले’, असे भारताच्या अ‍ॅटर्नी जनरल यांनी शांतपणे न्यायालयाला सांगितले. अंमलबजावणी संचालनालय, सीबीआय वगैरे तपास यंत्रणांनी देशातील सर्व बंदरे, विमानतळ व इतर देशाबाहेर पडण्याच्या मार्गावरील ठाण्यांना मल्ल्या यांना देशाबाहेर जाऊ देऊ नका, अशा सूचना दिल्या असतानाही, ते गेले! म्हणजे मल्ल्या यांना ठरवून देशाबाहेर जाऊ द्यायचे आणि ‘आम्ही त्यांना जाऊ देण्यास आडकाठी केली होती, तरीही ते गेले’, असा हतबल पवित्रा घ्यायचा. देशातील एक प्रमुख उद्योगपती उघडपणे प्रवासी विमानाने ११ बॅगा घेऊन देशातील विमानतळावरून लंडनला जाणारे विमान पकडतो आणि कस्टम, इमिग्रेशन वा पोलीस यापैकी कोणालाही त्याचा पत्ता नसतो, यावर एखादा निव्वळ मूर्ख वा सत्ताधाऱ्यांवरील भक्तीने आंधळा झालेला माणूसच विश्वास ठेवेल. उघडच आहे की, मल्ल्या यांना देशाबाहेर जाऊ देण्यासाठी ‘डील’ ठरले आणि त्यांना जाऊ देण्यात आले. येथेच ‘प्रेताच्या टाळूवरील लोणी खाण्या’चा मुद्दा येतो. शेतकऱ्याने कर्ज फेडले नाही, म्हणून त्याच्या घरादारावर टाच आणली जाते, गावात व गोतावळ्यात त्याच्या अब्रूला धक्का बसतो व नैराश्याने तो आत्महत्त्या करतो. पण राष्ट्रीयीकृत बँकांची सहा ते सात लाख कोटींची कर्जे थकविणाऱ्या देशातील प्रमुख बड्या उद्योगपतींपैकी किती जणांच्या घरादारावर व उद्योगांवर टाच आली? येणेही शक्य नाही; कारण या बड्या धेंडांकडे पोत्यांनी पैसा आहे आणि लाखो रूपये फी देऊन बडे वकील नेऊन कायद्याच्या नावाने कज्जेदलाली करण्याची सोय त्यांना आहे. शेतकरी वा सर्वसामान्य कर्जदार हे करू शकत नाही. तरीही काँगे्रस म्हणणार ‘काँगे्रसका हात आम आदमीके साथ’ आणि भाजपा घोषणा देणार ‘सबका साथ, सबका विकास’. त्यांना गरीब हे फक्त मतांसाठी हवे असतात. बोफोर्स प्रकरणातील एक आरोपी आॅक्तोवियो क्वात्रोच्ची यांना नरसिंह राव सरकारने देशाबाहेर जाऊ दिले, म्हणून भाजपाने किती आकांडतांडव केले होते? सोनिया गांधी यांच्या नावाने तर भाजपाने गरळ ओकले होते. आज भाजपाच्या हातात सत्ता आहे आणि मल्ल्या यांना परदेशी जाऊ देण्यात आले. मग दोष कोणाचा? याला पंतप्रधान मोदी जबाबदार नाहीत? संघ परिवार साधनशुचितेच्या गप्पा मारतो, मग आता सांगणार काय मोदी यांना की हे घडले, त्याबद्दल देशाची माफी मागा? ‘आयपीएल’ म्हणजे सट्टेबाजी असल्याचे सारेच खाजगीत मान्य करतात. या सट्ट्यात हजारो कोटी कमावून इतरांना गंडा घालणाऱ्या ललित मोदी नावाच्या ‘सफेद बदमाषा’ला ‘संपुआ’ सरकारने परदेशी जाऊ दिले व मोदी सरकारातील परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी त्याला सोडवण्यासाठी ब्रिटिश प्रशासनाला साकडे घातले. अशी एक ना अनेक प्रकरणे आहेत. परस्परांवर कुरघोडी करण्यासाठी ती प्रसार माध्यमांचा वापर करून प्रकाशात आणली जातात, ती मतदारांच्या भावनांना हात घालण्याच्या उद्देशाने. एकदा सत्ता मिळाली की, अशी प्रकरणे तितक्याच निर्ढावलेल्या निलाजरेपणाने ‘चुनावी जुमला’ ठरवली जातात. म्हणूनच मल्ल्या परदेशी जाणारच होते व शेवटी अनेक वर्षे कज्जेदलाली झाल्यावर ते सुटणारही आहेत!